AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ind vs WI 3rd ODI : तिसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये ‘या’ खेळाडूंना मिळणार डच्चू? विराट, रोहितची एन्ट्री!

Ind vs WI 3rd ODI : कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना विश्रांती देत बसण्यात आलं होतं. मात्र संघाला याचा मोठा फटका बसला होता. युवा खेळाडू अपयशी ठरल्याने टीम इंडियाला हा सामना गमवावा लागला होता.

Ind vs WI 3rd ODI : तिसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये 'या' खेळाडूंना मिळणार डच्चू? विराट, रोहितची एन्ट्री!
| Updated on: Jul 31, 2023 | 7:22 PM
Share

 मुंबई : टीम इंडिया आणि वेस्ट इंडिजमधील एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना उद्या बुधवारी संध्याकाळी होणार आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा असून जो संघ जिंकेल तो मालिका जिंकणार आहे. टीम इंडियाचा दुसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये पराभव झाला होता. टीम मॅनेजमेंटल प्रयोग करणं महागात पडलं होतं. कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना विश्रांती देत बसण्यात आलं होतं. मात्र संघाला याचा मोठा फटका बसला होता. युवा खेळाडू अपयशी ठरल्याने टीम इंडियाला हा सामना गमवावा लागला होता.

तिसऱ्या आणि अंतिम सामन्यामध्ये टीम इंडियाचे मुख्य खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहली हे संघात परतणार असल्याचं मुख्य कोच राहुल द्रविड यांनी स्पष्ट केलं आहे. मात्र संघामधील काही खेळाडूंना डच्चू मिळण्याची शक्यता आहे. कारण टीम इंडियाला हा सामना गमावणं परवडणार नाही. मालिका हातातून जाऊ शकते त्यासाठी टीम इंडियाची टीम मॅनेजमेंट खाली दिलेल्या खेळाडूंना संघातून डच्चू देण्याची शक्यता आहे.

या खेळाडूंना मिळणार डच्चू?

संजू सॅमसन याला संधी देऊनही त्याला सोनं करता आलं नाही. त्यानंतर एकदिवसीय फॉरमॅटमध्ये अपयशी ठरत असलेल्या सूर्यकुमार यादवलाही दोन सामन्यांमध्ये काही विशेष कामगिरी करता आली नाही. त्यामुळे या दोन खेळाडूंना बाहेर काढण्याची जास्त शक्यता आहे. यासोबतच मागील सामन्यामधील पदार्पणवीर मुकेश कुमार याच्या जागी जयदेव उनाडकट यासा संधी दिली जावू शकते. दोन्ही संघ आपली सर्व ताकद पणाला लावतील आणि सामना जिंकण्याचा पूर्ण प्रयत्न करतील.

दरम्यान, यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये पात्र न झालेल्या विंडिज संघाकडून झालेल्या पराभवामुळे क्रिकेट चाहत्यांनी जोरदार टीका केली आहे. टीम इंडियासाठी हा सामना जिंकणं गरजेचं आहे. वर्ल्ड कपला काही दिवस बाकी असताना अशा प्रकारे पराभव होणं भारतासाठी चिंतेची बाब आहे.

Follow Us
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ....
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ.....
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक.
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली.
रिलायन्स इंडस्ट्रीची अमेरिकेत गुंतवणूक, संजय राऊत यांचा हल्लाबोल
रिलायन्स इंडस्ट्रीची अमेरिकेत गुंतवणूक, संजय राऊत यांचा हल्लाबोल.
व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा; हॉटेल व्यवसाय आणि उद्योग अडचणीत
व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा; हॉटेल व्यवसाय आणि उद्योग अडचणीत.
मिठी नदीच्या नाल्यातून गॅस निर्मितीचा प्रकल्प उभारा, उद्घाटनाला...
मिठी नदीच्या नाल्यातून गॅस निर्मितीचा प्रकल्प उभारा, उद्घाटनाला....
मध्यपूर्वेतील युद्धाचा इंधन पुरवठ्यावर परिणाम; ESMA कायदा लागू
मध्यपूर्वेतील युद्धाचा इंधन पुरवठ्यावर परिणाम; ESMA कायदा लागू.
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.