AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आशिया कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारत पाकिस्तान, असे होणार सामने

अंडर 19 आशिया कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीचा थरार आता रंगणार आहे. भारताने साखळी फेरीतील तिन्ही सामने जिंकून उपांत्य फेरी गाठली आहे. आता जेतेपदासाठी दोन विजय महत्त्वाचे आहेत.

आशिया कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारत पाकिस्तान, असे होणार सामने
आशिया कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारत पाकिस्तान, असे होणार सामनेImage Credit source: ACC Twitter
| Updated on: Dec 17, 2025 | 8:13 PM
Share

अंडर 19 आशिया कप स्पर्धेतील साखळी फेरीचे सामना आता संपले असून उपांत्य फेरीतील चारही संघांची नावे निश्चित झाली आहेत. भारताना साखळी फेरीतील तिन्ही सामने जिंकत उपांत्य फेरीचं स्थान गाठलं आहे. भारताने पहिल्या सामन्यात युएईला, दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानला आणि तिसऱ्या सामन्यात मलेशियाला पराभवाची धूळ चारली. भारत, पाकिस्तान, बांग्लादेश आणि श्रीलंका यांनी उपांत्य फेरीत स्थान पक्कं केलं आहे. त्यामुळे भारत पाकिस्तान सामना उपांत्य फेरीत होईल का? असा प्रश्न क्रीडाप्रेमींना पडला आहे. भारत पाकिस्तान सामना उपांत्य फेरीत होणार नाही. कारण दोन्ही संघ एकाच गटात होते. त्यामुळे उपांत्य फेरीत भारताचा सामना दुसऱ्या गटातील दुसऱ्या स्थानावर असलेल्या संघाशी होईल. तर पाकिस्तानचा सामना दुसऱ्या गटातील पहिल्या स्थानावर असलेल्या संघाशी होईल.

उपांत्य फेरीत भारत आणि श्रीलंका , तर पाकिस्तान आणि बांग्लादेश यांच्यात सामना होणार आहे. भारत आणि पाकिस्तान आशिया कपच्या उपांत्य फेरीत आमनेसामने आले नसले तरी, अंतिम फेरीत भिडू शकतात. यासाठी भारताला श्रीलंकेला आणि पाकिस्तानने बांगलादेशला पराभूत करणं आवश्यक आहे. उपांत्य फेरीचे दोन्ही सामने 19 डिसेंबरला होणार आहेत. तर अंतिम फेरीचा सामना 21 डिसेंबरला होणार आहे. भारत जेतेपदापासून दोन विजय दूर आहे. भारताने या स्पर्धेत आतापर्यंत जबरदस्त कामगिरी केली आहे. वैभव सूर्यवंशी फॉर्मात आहे. तर अभिज्ञान कुंडूने द्विशतकी खेळी करून आपला फॉर्म दाखवून दिला आहे. त्यामुळे भारतीय संघ या स्पर्धेत मजबूत स्थितीत आहे.

अ गटात भारताने तीन पैकी तीन सामने जिंकले असून 6 गुणांसह नेट रनरेट +4.260 आहे. तर पाकिस्तानने तीन पैकी दोन सामन्यात विजय मिळवला असून 4 गुणांसह नेट रनरेट हा +1.847 आहे. ब गटात बांगलादेशने साखळी फेरीत तीन पैकी तीन सामने जिंकले असून 6 गुणांसह नेट रनरेट हा +1.214 आहे. तर श्रीलंकेने तीन पैकी दोन सामन्यात विजय मिळवला असून 4 गुण आहेत. तर नेट रनरेट +0.836 आहे. दुसरीकडे या स्पर्धेतून अफगाणिस्तान, नेपाळ, युएई आणि मलेशिया यांचं आव्हान संपुष्टात आलं आहे.

Follow Us
सर्वात मोठी बातमी! या पक्षाच्या पाठिंब्यामुळे थलपती विजयचा सत्तास्थापन
सर्वात मोठी बातमी! या पक्षाच्या पाठिंब्यामुळे थलपती विजयचा सत्तास्थापन.
पंतप्रधान नरेंद्र मोदी जनते समोर नतमस्तक... शपथविधी सोहळ्यातील व्हिडीओ
पंतप्रधान नरेंद्र मोदी जनते समोर नतमस्तक... शपथविधी सोहळ्यातील व्हिडीओ.
मोठी बातमी! ठाकरेंवरील टीका भोवली; सदावर्तेंच्या गाडीवर मनसेकडून.....
मोठी बातमी! ठाकरेंवरील टीका भोवली; सदावर्तेंच्या गाडीवर मनसेकडून......
निदा खानला फरार असताना कोणी कोणी मदत केली? SIT कडून चौकशीला सुरुवात
निदा खानला फरार असताना कोणी कोणी मदत केली? SIT कडून चौकशीला सुरुवात.
निदा खान प्रकरणावर ओवैसींचे मोठे विधान, म्हणाले, तिच्यावरील आरोप...
निदा खान प्रकरणावर ओवैसींचे मोठे विधान, म्हणाले, तिच्यावरील आरोप....
राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संतापले, लवांडेंचा समर्थकांकाडून दुग्धाभिषेक
राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संतापले, लवांडेंचा समर्थकांकाडून दुग्धाभिषेक.
FIR दाखल होण्याआधीच निदाचं ट्रान्सफर अन्... एमआयएम नेते ओवेसी नेमकं
FIR दाखल होण्याआधीच निदाचं ट्रान्सफर अन्... एमआयएम नेते ओवेसी नेमकं.
संग्राम भंडारेंच्या गुंडांनी रिव्हॉल्व्हर दाखवत... विकास लवांडेंनी काळ
संग्राम भंडारेंच्या गुंडांनी रिव्हॉल्व्हर दाखवत... विकास लवांडेंनी काळ.
राज्यासमोर नवं संकट उभं? बँकेत पैशांचा पुरवठा कमी... 'कॅश' टंचाईमुळे
राज्यासमोर नवं संकट उभं? बँकेत पैशांचा पुरवठा कमी... 'कॅश' टंचाईमुळे.
काळ आला होता पण वेळ आली नव्हती;रेल्वे समोर आली अन् महिला ट्रॅकवर झोपली
काळ आला होता पण वेळ आली नव्हती;रेल्वे समोर आली अन् महिला ट्रॅकवर झोपली.