AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

4 वर्षांनंतर टीम इंडिया आयर्लंड दौऱ्यावर, IPL 2022 नंतर T20 सिरीजचं आयोजन

श्रीलंकेविरुद्धची टी-20 मालिका जिंकल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ (Indian Cricket Team) आता कसोटी मालिकेसाठी तयारी करत आहे. यानंतर, भारतीय संघ जूनमध्ये थेट आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतेल, ज्यामध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मर्यादित षटकांची मालिका खेळवली जाईल.

4 वर्षांनंतर टीम इंडिया आयर्लंड दौऱ्यावर, IPL 2022 नंतर T20 सिरीजचं आयोजन
4 वर्षांनंतर टीम इंडिया आयर्लंड दौऱ्यावर जाणारImage Credit source: File/Cricket Ireland
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Mar 02, 2022 | 11:03 AM
Share

मुंबई : श्रीलंकेविरुद्धची टी-20 मालिका जिंकल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ (Indian Cricket Team) आता कसोटी मालिकेसाठी तयारी करत आहे. यानंतर, भारतीय संघ जूनमध्ये थेट आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतेल, ज्यामध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मर्यादित षटकांची मालिका खेळवली जाईल. टीम इंडियाच्या या वेळापत्रकात आयर्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेचाही समावेश आहे (India vs Ireland Schedule) आणि आता त्याच्या तारखा अधिकृतपणे जाहीर करण्यात आल्या आहेत. क्रिकेट आयर्लंडने (Cricket Ireland) भारताविरुद्धच्या T20 मालिकेपासून सुरू होणार्‍या या वर्षीच्या आंतरराष्ट्रीय सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे.

क्रिकेट आयर्लंडने 1 मार्च रोजी (मंगळवारी) त्यांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कॅलेंडरबद्दल माहिती जाहीर केली आहे. त्यानुसार जूनच्या शेवटच्या आठवड्यात भारतीय संघ आयर्लंडचा दौरा करणार आहे. यादरम्यान भारतीय संघ दोन टी-20 सामने खेळणार आहे. हे दोन्ही सामने 26 आणि 28 जून रोजी मॅलाहाइड येथे होणार आहेत. भारतीय संघ 4 वर्षांनंतर आयर्लंडचा दौरा करणार आहे. याआधी 2018 मध्येही भारतीय संघाने टी-20 मालिकेसाठी आयर्लंडचा दौरा केला होता आणि मॅलाहाइडमध्येच सामने खेळवण्यात आले होते.

भारत राखीव संघ पाठवणार?

या मालिकेपूर्वी भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 5 सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे, ज्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. हे सामने 9 जून ते 15 जून दरम्यान खेळवले जातील. मात्र, या मालिकेसाठी टीम इंडिया आपला मुख्य संघ पाठवणार की आपल्या राखीव खेळाडूंचा संघ तयार करून पाठवणार हे अद्याप ठरलेले नाही. कारण आयपीएल 2022 च्या सीझननंतर पुन्हा एकदा भारतीय खेळाडू थेट टी-20 मालिकेत सहभागी होणार आहेत आणि अशा परिस्थितीत अनेक मोठ्या खेळाडूंना आयर्लंड दौऱ्यावेळी विश्रांती दिली जाऊ शकते.

याआधी भारत इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका खेळत असताना शिखर धवनच्या नेतृत्वाखाली बीसीसीआयने आणखी एक संघ तयार करुन श्रीलंकेला पाठवला होता. उभय संघांमध्ये एकदिवसीय आणि टी-20 मालिका खेळवण्यात आली होती. अनेक युवा खेळाडूंनी या मालिकेद्वारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवलं होतं.

इतर बातम्या

Rohit Sharma: ‘रोहित शर्मा आज संघात आहे कारण…’ एका मोठ्या क्रिकेटपटूने उपस्थित केलं प्रश्नचिन्ह

Salil Ankola: 28 व्या वर्षी क्रिकेटमधून निवृत्ती, मग बॉलिवूड गाजवलं, आता मुंबई क्रिकेटमध्ये मोठी जबाबदारी

Russia Ukraine War: रशियन फौजांच्या हल्ल्यातून थोडक्यात बचावलं केविन पीटरसनचं कुटुंब

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली