AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video: ऋषभ पंतला Live सामन्यात मागावी लागली माफी, चेन्नई कसोटीच्या दुसऱ्या नेमकं काय घडलं?

भारत आणि बांग्लादेश यांच्यात पहिला कसोटी सामना सुरु आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघ मजबूत स्थितीत आहे. भारताने पहिल्या डावात 376 धावा केल्या होत्या. तर बांगलादेशचा संघ 149 धावांवर सर्वबाद झाला. भारताकडे 227 धावांची आघाडी आहे. असं असताना ऋषभ पंतवर लाईव्ह सामन्यात माफी मागण्याची वेळ आली.

Video: ऋषभ पंतला Live सामन्यात मागावी लागली माफी, चेन्नई कसोटीच्या दुसऱ्या नेमकं काय घडलं?
Image Credit source: PTI
| Updated on: Sep 20, 2024 | 4:04 PM
Share

भारत आणि बांग्लादेश कसोटी सामना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने खूपच महत्त्वाचा आहे. या सामन्यावर भारताची विजयी टक्केवारी आणि अव्वल स्थान टिकणार आहे. असं असताना पहिल्या कसोटीचा दुसरा दिवस भारतीय गोलंदाजांनी गाजवला. पहिल्या डावात भारताने 376 धावा केल्या. तर या धावांचा पाठलाग करताना बांगलादेशचा संघ 149 धावांवर तंबूत परतला. त्यामुळे भारताला 227 धावांची मजबूत आघाडी मिळाली. असं बांगलादेशच्या डावात विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतवर माफी मागण्याची वेळ आली. मोहम्मद सिराजची माफी मागावी लागली. बांगलादेशच्या डावातील चौथ्या षटकात ऋषभ पंतकडून गडबड झाली. टीम इंडियाकडून चौथं षटक टाकण्यासाठी मोहम्मद सिराज आला होता. या षटकाच्या पाचव्या चेंडूवर डावखुऱ्या जाकिर हसनला पायचीत करण्यासाठी जोरदार अपली केली. यावेळी मोहम्मद सिराज आऊट असल्याबाबत निश्चिंत होता. पण पंचांनी नाबाद दिलं. त्यामुळे मोहम्मद सिराजसह इतर खेळाडूंना आश्चर्याचा धक्का बसला. त्यामुळे टीम इंडियाकडे डीआरएस घेण्याशिवाय पर्याय नव्हता.

निश्चित असलेल्या मोहम्मद सिराजने डीआरएससाठी कर्णधार रोहित शर्माकडे विनवणी केली. पण त्याने त्याचं म्हणणं न ऐकता विकेटकीपर ऋषभ पंतकडे मोर्चा वळवला. विकेटकीपर ऋषभ पंतने डीआरएस घेण्यास नकार दिला. त्याच्या म्हणण्यांनुसार चेंडू लेग स्टंपच्या बाहेर जात होता. त्यामुळे त्याने सांगितलं की आऊट नाही आणि डीआरएस वाया जाईल. त्याचं एकूण रोहित शर्माने डीआरएस घेतला नाही. पण काही वेळानंतर स्टेडियमवरील मोठ्या स्क्रिनवर रिप्ले दाखवला गेला. यात चेंडू स्पष्टपणे लेग स्टंपला लागला होता. जर डीआरएस घेतला असता तर जाकीर बाद झाला असता.

ईएसपीएन क्रिकइंफोच्या रिपोर्टनुसार, जशी ही चूक दृष्टीक्षेपात पडली तेव्हा सिराजने पंतला इशाऱ्यातून दाखवून दिलं. तेव्हा विकेटकीपिंग करणाऱ्या पंतला चूक लक्षात आली आणि त्यानेही माफी मागितली. दुसरीकडे, जाकीर हसन जास्त तग धरू शकला नाही. आकाश दीपने त्याला पुढच्या षटकात त्रिफळाचीत केलं. बांगलादेशचा संपूर्ण संघ फक्त 149 धावा करू शकला. त्यामुळे टीम इंडियाला 227 धावाची आघाडी मिळाली आहे. भारताने दुसऱ्या डावात फलंदाजी करताना रोहित शर्माची विकेट गमावली आहे. अवघ्या 5 धावांवर तस्किन अहमदने त्याला बाद केलं.

Follow Us
युद्धाचा मोठा फटका; LPG टंचाईच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या रांगा
युद्धाचा मोठा फटका; LPG टंचाईच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या रांगा.
गडचिरोली : अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना दणका, पिकांचे मोठे नुकसान
गडचिरोली : अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना दणका, पिकांचे मोठे नुकसान.
धनंजय मुंडेंचा गंभीर आरोप; मोठे नेते मला संपवण्याच्या प्रयत्नात होते
धनंजय मुंडेंचा गंभीर आरोप; मोठे नेते मला संपवण्याच्या प्रयत्नात होते.
चाकणकर यांचा राजीनामा घ्या, संभाजीराजेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
चाकणकर यांचा राजीनामा घ्या, संभाजीराजेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी.
भोंदूबाबा अशोक खरात यांच्या मालमत्तेवर पोलिसांचा छापा
भोंदूबाबा अशोक खरात यांच्या मालमत्तेवर पोलिसांचा छापा.
खरात यांना नाशिक पोलिसांकडून अटक; समर्थकांकडून पत्रकारांना दमदाटी
खरात यांना नाशिक पोलिसांकडून अटक; समर्थकांकडून पत्रकारांना दमदाटी.
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर APMC मार्केटमध्ये आंब्याच्या पेट्या दाखल
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर APMC मार्केटमध्ये आंब्याच्या पेट्या दाखल.
मुंबईतील गिरगावात शोभायात्रेचा उत्साह, तरूणाईचा उत्साह शिगेला
मुंबईतील गिरगावात शोभायात्रेचा उत्साह, तरूणाईचा उत्साह शिगेला.
गुढीपाडव्याचा उत्सव; राज ठाकरे आणि कुटुंबियांकडून गुढीचं पूजन
गुढीपाडव्याचा उत्सव; राज ठाकरे आणि कुटुंबियांकडून गुढीचं पूजन.
चाकणकर मूर्ख, खोट बोलत आहेत, चाकणकरांवर संजय राऊत यांचा जोरदार हल्ला
चाकणकर मूर्ख, खोट बोलत आहेत, चाकणकरांवर संजय राऊत यांचा जोरदार हल्ला.