AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India vs England 1st T20 | नरेंद्र मोदी मैदानाच्या खेळपट्टीवर विराट कोहलीचं मोठं भाष्य

टीम इंडियाला पहिल्या टी 20 सामन्यात इंग्लंडकडून 8 विकेट्सने (india vs england 1st t20i) पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यात कर्णधार विराट कोहली सपशेल अपयशी ठरला. विराटने या (virat kohli on pitch) पराभवासाठी खेळपट्टीला जबाबदार ठरवण्याचा प्रयत्न केला आहे.

India vs England 1st T20 | नरेंद्र मोदी मैदानाच्या खेळपट्टीवर विराट कोहलीचं मोठं भाष्य
Virat kohli
| Updated on: Mar 13, 2021 | 4:15 PM
Share

अहमदाबाद : “खेळपट्टीमुळे आम्हाला नीट खेळता आलं नाही. या पीचवर आम्हाला नक्की काय करायचंय, याबाबत माहिती नव्हतं. आम्ही आमची चूक मान्य करतो, असं म्हणत टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने खेळपट्टीवर पराभवाचं खापर फोडलं आहे. तसेच पुढील सामन्यात आम्ही जोरदार कमॅबॅक करु’, असा आशावादही कोहलीने व्यक्त केला. टीम इंडियाला इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या टी 20 सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे टीम इंडिया 5 सामन्यांच्या मालिकेत 0-1 ने पिछाडीवर आहे. (india vs england 1st t20i captain virat kohli reaction on pitch)

आम्ही वाईट फलंदाजी केली – विराट

“आमची फलंदाजी फार वाईट राहिली. आम्ही काही गोष्टी करण्याचा प्रयत्न केला. मात्र आता सत्य परिस्थिती स्वीकारावी लागेल. जर खेळपट्टी पोषक असेल तर तुम्ही पहिल्या चेंडूपासून फटकेबाजी करु शकता. खेळपट्टी जाणून घेण्यासाठी आम्ही फार वेळ दवडला नाही. मात्र श्रेयस अय्यरने तो प्रयत्न केला. मात्र त्यांनंतरही आम्ही 150 पेक्षा अधिक धावा करु शकलो नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असे चढ उतार येतात. आपलं भाग्य जोरदार असतं त्या दिवशी आपण मोठी धावसंख्या उभारतो. पण नेहमीच असं होत नाही”, असंही विराटने स्पष्ट केलं.

“आगामी वर्ल्ड कपच्या दृष्टीने प्रयोग करायचेत”

आम्ही मागील काही टी 20 मालिका जिंकल्या आहेत. टी 20 वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर इंग्लंड विरुद्धच्या 5 सामन्यांच्या मालिकेत आम्ही असंख्य प्रयोग करायचे आहेत. पण आम्ही इंग्लंड विरुद्ध कोणत्याही बाबतीत हलक्यात घेण्याची चूक करणार नाहीत,असं विराटने नमूद केलं.

टीम इंडियाची पहिल्या सामन्यात निराशाजनक कामगिरी

पहिल्या टी 20 मध्ये टीम इंडियाच्या खेळाडूंनी सपशेल निराशा केली. इंग्लंडने टॉस जिंकून भारताला फलंदाजीसाठी भाग पाडले. केएल राहुल, विराट कोहली आणि शिखर धवन या टॉपच्या 3 फलंदाजांना विशेष काही करता आले नाही. यामुळे भारताची खराब सुरुवात झाली. मात्र त्यानंतर रिषभ पंत आणि श्रेयस अय्यरने फटकेबाजी केली. अय्यरने 67 तर पंतने 21 धावांची खेळी केली. या जोरावर भारताने इंग्लंडला विजयासाठी 125 धावांचे आव्हान दिले.

हे विजयी आव्हान इंग्लंडने 2 विकेट्सच्या मोबदल्यात 15.3 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. इंग्लंडकडून जेसन रॉयने सर्वाधिक 49 धावांची खेळी केली. जोस बटलरने 28 तर जॉनी बेयरस्टोने नाबाद 26 धावा केल्या. टीम इंडियाकडून युजवेंद्र चहल आणि वॉशिंग्टन सुंदरने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

दुसरी टी-20 मॅच 14 मार्चला

दरम्यान उभय संघातील दुसरा टी 20 सामना 14 मार्चला खेळवण्यात येणार आहे. या मॅचचे आयोजन अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये करण्यात आले आहे. या मॅचला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. या सामन्यात विजय मिळवून जोरदार पुनरागमन करण्याचा मानस टीम इंडियाचा असेल. त्यामुळे भारतीय संघ दुसऱ्या सामन्यात कशी कामगिरी करते, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

संबंधित बातम्या :

तर माझा टीव्ही बंद राहील, ‘हिटमॅनला’ डच्चू दिल्याने ‘सुलतान’ विराटवर भडकला

पहिल्या टी ट्वेण्टीत पराभव, भारतापेक्षा मुंबई इंडियन्स भारी, डिवचणाऱ्या इंग्लंडच्या माजी कर्णधाराला जाफरचं उत्तर

(india vs england 1st t20i captain virat kohli on pitch)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.