India vs England 3rd Test | बॅटिंगसाठी खेळपट्टी चांगली होती, पीचबाबत टीका करणाऱ्यांना विराट कोहलीने सुनावलं

टीम इंडियाने इंग्लंडवर तिसऱ्या कसोटीत (india vs england 3rd test) 10 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. ही तिसरी कसोटी अवघ्या दुसऱ्या दिवसातील तिसऱ्या सत्रातच निकाली निघाली.

India vs England 3rd Test | बॅटिंगसाठी खेळपट्टी चांगली होती, पीचबाबत टीका करणाऱ्यांना विराट कोहलीने सुनावलं
टीम इंडियाने इंग्लंडवर तिसऱ्या कसोटीत (india vs england 3rd test) 10 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. ही तिसरी कसोटी अवघ्या दुसऱ्या दिवसातील तिसऱ्या सत्रातच निकाली निघाली.
Follow us
| Updated on: Feb 26, 2021 | 12:44 PM

अहमदाबाद : टीम इंडियाने पाहुण्या इंग्लंडवर तिसऱ्या कसोटीत (India vs England 3 rd Test) 10 विकेट्सने शानदार विजय मिळवला. या विजयासह भारताने 4 सामन्यांच्या मालिकेत भारताने 2-1 ने आघाडी घेतली. ही तिसरी कसोटी अवघ्या दुसऱ्या दिवसातील तिसऱ्या सत्रात निकाली निघाली. 12 तासांमध्ये सामन्याचा निकाल लागला. या पीचवर फिरकी गोलंदाजांची चलती पाहायला मिळाली. यामुळे या खेळपट्टीबाबत अनेक दिग्गजांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच टीकाही केली. दरम्यान भारताचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) या पिचबाबत प्रतिक्रिया दिली आहे. (india vs england 3rd test captain virat kohli says good pitch from batting ahmedabad test)

विराट काय म्हणाला?

“खेळपट्टी बॅटिंग करण्यासाठी चांगली होती. पीच खराब नसून दोन्ही संघाच्या फलंदाजांची कामगिरी खराब होती”, अशी रोखठोक प्रतिक्रिया विराटने दिली. विराटने तिसऱ्या कसोटी सामन्यानंतर ही प्रतिक्रिया दिली. “कोणत्याही बॅट्समनने पीचवर टिकून खेळण्याचा प्रयत्नच केला नाही. नाहीतर या खेळपट्टीवर खेळणं इतकं अवघडं नव्हतं. खेळपट्टीचा यामध्ये काहीच दोष नव्हता. पहिल्या डावात फक्त मोजकेच चेंडू टर्न होत होते. बॅटिंगचा स्तर फार वाईट होता. पहिल्या डावात 100 बाद 3 अशी आमची धावसंख्या होती. पण आम्ही 150 धावांच्या आत ऑलआऊट झालो. पहिल्या डावात फलंदाजासाठी खेळपट्टी फार पोषक होती. दोन्ही संघांनी या पीचवर तग धरुन फलंदाजी करण्याचा प्रयत्न केलाच नाही, असं विराटने स्पष्ट केलं.

अक्षर आणि अश्विनचं कौतुक

विराटने मॅचविनर ठरलेल्या लोकल बॉय अक्सर पटेल आणि रवीचंद्रन अश्विन या फिरकी जोडीचे कौतुक केलं. अक्षर पटेलने या सामन्यातील दोन्ही डावात मिळून एकूण 11 विकेट्स घेतल्या. तर अश्विननेही एकूण 7 विकेट्स घेतल्या.

चौथा कसोटी सामना 4 मार्चपासून

दरम्यान या मालिकेतील चौथा आणि अखेरचा कसोटी सामना 4 ते 8 मार्चदरम्यान खेळवण्यात येणार आहे. हा सामना याच नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. या सामन्याला सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. हा सामना जिंकून इंग्लंडचा एकतर्फी मालिका पराभव करण्याचा मानस टीम इंडियाचा असेल.

संबंधित बातम्या :

84 धावांवर गुंडाळला कांगारुंचा डाव, 8 विकेट्स घेत ‘या’ गोलंदाजाने ऑस्ट्रेलियाची उडवली दाणादाण

28 वर्षांपूर्वी 1 वाजून 51 मिनिटांनी ‘लिटील मास्टर’ सुनील गावसकर यांना ‘या’ खेळाडूमुळे ‘जोर का झटका’, नक्की काय घडलं?

(india vs england 3rd test captain virat kohli says good pitch from batting ahmedabad test)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.