AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs NZ: पावसाला दोष देऊ नका, टीम इंडिया स्वत:च्या 5 चुकांमुळे हरली

IND vs NZ: टीम इंडियाने या वनडे सीरीजमध्ये काय चूका केल्या? ते जाणून घ्या....

IND vs NZ: पावसाला दोष देऊ नका, टीम इंडिया स्वत:च्या 5 चुकांमुळे हरली
ind vs nz Image Credit source: bcci twitter
| Updated on: Nov 30, 2022 | 3:52 PM
Share

ख्राइस्टचर्च: वनडे सीरीजमध्ये न्यूझीलंडने टीम इंडियाचा 1-0 ने पराभव केला. पहिला सामना भारताने 7 विकेटने गमावला होता. पण त्यानंतर पावसाने टीम इंडियाला पुनरागमनाची एकही संधी दिली नाही. दुसरा आणि तिसरा सामना पावसामुळे रद्द झाला. दुसऱ्या वनडेत टीम इंडियाला 12.5 ओव्हर्स फलंदाजी करण्याची संधी मिळाली. तिसऱ्या वनडेत टीम इंडियाचा डाव 47.3 ओव्हर्समध्ये 219 धावात आटोपला. भारताच्या पराभवाच सर्वात मोठं कारण पावसाला मानल जातय. त्यामुळे टीमला पुनरागमनाची संधी मिळाली नाही. प्रत्यक्षात टीम इंडियाने स्वत:च्या चूकांमुळे ही सीरीज गमावली.

  1. वनडे सीरीज दरम्यान पावसाचा अंदाज आधीच वर्तवण्यात आला होता. हॅमिल्टन आणि ख्राइस्टचर्चच्या हवामानाची प्रत्येकाला कल्पना होती. पहिल्या सामन्यात विजय मिळवणं हा टीम इंडियाचा उद्देश हवा होता. टी 20 सीरीजमधून भारताने धडा घ्यायला हवा होता.
  2. पहिल्या वनडेत भारताने 306 धावा केल्या होत्या. मात्र तरीही मोठ्या फरकाने टीम इंडियाचा पराभव झाला. जुन्या चेंडूने वेगवान गोलंदाजांची खराब कामगिरी हे पराभवाच मुख्य कारण आहे. टॉम लॅथमने याचा फायदा उचलला. त्याने नाबाद शतकी खेळी केली. तिसऱ्या वनडेत दीपक चाहर आणि अर्शदीपने चांगली सुरुवात दिली. पण 5-6 ओव्हर्सनंतर त्यांची लय बिघडली.
  3. पहिल्या सामन्यात सहाव्या गोलंदाजाची कमतरता भारतीय टीमला जाणवली होती. ही चूक सुधारली. दुसऱ्या वनडेत दीपक हुड्डाला संधी दिली. त्यासाठी संजू सॅमसनला बाहेर बसवलं. जो चांगल्या फॉर्ममध्ये होता. या बदलाचा टीम इंडियाला काही विशेष फायदा झाला नाही. कारण पावसामुळे सामना रद्द झाला.
  4. न्यूझीलंडच्या फलंदाजांची जबरदस्त बॅटिंग हे सुद्धा भारताच्या पराभवाच एक कारण आहे. टॉम लॅथमने पहिल्या मॅचमध्ये नाबाद 145 धावा फटकावल्या. त्याशिवाय केन विलयम्सनने 94 धावा केल्या. तिसऱ्या वनडेत फिन एलन आणि डेवॉन कॉनवे यांनी पहिल्या विकेटसाठी 97 धावांची भागीदारी केली. तिसऱ्या वनडेतही न्यूझीलंडचे फलंदाज जबरदस्त बॅटिंग करत होते.
  5. ऋषभ पंतही भारताच्या पराभवाच कारण ठरला. गरजेच्यावेळी त्याची बॅट शांत राहिली. पहिल्या वनडेमध्ये त्याने फक्त 15 धावा केल्या होत्या. तिसऱ्या वनडेत फक्त 10 धावा केल्या. मीडिल ऑर्डरमध्ये तो डाव संभाळू शकला नाही.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.