AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs NZ: पावसाला दोष देऊ नका, टीम इंडिया स्वत:च्या 5 चुकांमुळे हरली

IND vs NZ: टीम इंडियाने या वनडे सीरीजमध्ये काय चूका केल्या? ते जाणून घ्या....

IND vs NZ: पावसाला दोष देऊ नका, टीम इंडिया स्वत:च्या 5 चुकांमुळे हरली
ind vs nz Image Credit source: bcci twitter
| Updated on: Nov 30, 2022 | 3:52 PM
Share

ख्राइस्टचर्च: वनडे सीरीजमध्ये न्यूझीलंडने टीम इंडियाचा 1-0 ने पराभव केला. पहिला सामना भारताने 7 विकेटने गमावला होता. पण त्यानंतर पावसाने टीम इंडियाला पुनरागमनाची एकही संधी दिली नाही. दुसरा आणि तिसरा सामना पावसामुळे रद्द झाला. दुसऱ्या वनडेत टीम इंडियाला 12.5 ओव्हर्स फलंदाजी करण्याची संधी मिळाली. तिसऱ्या वनडेत टीम इंडियाचा डाव 47.3 ओव्हर्समध्ये 219 धावात आटोपला. भारताच्या पराभवाच सर्वात मोठं कारण पावसाला मानल जातय. त्यामुळे टीमला पुनरागमनाची संधी मिळाली नाही. प्रत्यक्षात टीम इंडियाने स्वत:च्या चूकांमुळे ही सीरीज गमावली.

  1. वनडे सीरीज दरम्यान पावसाचा अंदाज आधीच वर्तवण्यात आला होता. हॅमिल्टन आणि ख्राइस्टचर्चच्या हवामानाची प्रत्येकाला कल्पना होती. पहिल्या सामन्यात विजय मिळवणं हा टीम इंडियाचा उद्देश हवा होता. टी 20 सीरीजमधून भारताने धडा घ्यायला हवा होता.
  2. पहिल्या वनडेत भारताने 306 धावा केल्या होत्या. मात्र तरीही मोठ्या फरकाने टीम इंडियाचा पराभव झाला. जुन्या चेंडूने वेगवान गोलंदाजांची खराब कामगिरी हे पराभवाच मुख्य कारण आहे. टॉम लॅथमने याचा फायदा उचलला. त्याने नाबाद शतकी खेळी केली. तिसऱ्या वनडेत दीपक चाहर आणि अर्शदीपने चांगली सुरुवात दिली. पण 5-6 ओव्हर्सनंतर त्यांची लय बिघडली.
  3. पहिल्या सामन्यात सहाव्या गोलंदाजाची कमतरता भारतीय टीमला जाणवली होती. ही चूक सुधारली. दुसऱ्या वनडेत दीपक हुड्डाला संधी दिली. त्यासाठी संजू सॅमसनला बाहेर बसवलं. जो चांगल्या फॉर्ममध्ये होता. या बदलाचा टीम इंडियाला काही विशेष फायदा झाला नाही. कारण पावसामुळे सामना रद्द झाला.
  4. न्यूझीलंडच्या फलंदाजांची जबरदस्त बॅटिंग हे सुद्धा भारताच्या पराभवाच एक कारण आहे. टॉम लॅथमने पहिल्या मॅचमध्ये नाबाद 145 धावा फटकावल्या. त्याशिवाय केन विलयम्सनने 94 धावा केल्या. तिसऱ्या वनडेत फिन एलन आणि डेवॉन कॉनवे यांनी पहिल्या विकेटसाठी 97 धावांची भागीदारी केली. तिसऱ्या वनडेतही न्यूझीलंडचे फलंदाज जबरदस्त बॅटिंग करत होते.
  5. ऋषभ पंतही भारताच्या पराभवाच कारण ठरला. गरजेच्यावेळी त्याची बॅट शांत राहिली. पहिल्या वनडेमध्ये त्याने फक्त 15 धावा केल्या होत्या. तिसऱ्या वनडेत फक्त 10 धावा केल्या. मीडिल ऑर्डरमध्ये तो डाव संभाळू शकला नाही.

Follow Us
मोदी बागेत पवार कुटुंब एकत्र, स्नेहभोजनाचा कार्यक्रम; सुनेत्रा पवार जा
मोदी बागेत पवार कुटुंब एकत्र, स्नेहभोजनाचा कार्यक्रम; सुनेत्रा पवार जा.
मोठी बातमी! शिंदेंच्या कार्यकाळात सुरु केलेलं प्रकल्प पंकजा मुंडेंकडून
मोठी बातमी! शिंदेंच्या कार्यकाळात सुरु केलेलं प्रकल्प पंकजा मुंडेंकडून.
कलिंगड प्रकरणात सस्पेन्स, बिर्याणीने मृत्यू नाही? तपास सुरु
कलिंगड प्रकरणात सस्पेन्स, बिर्याणीने मृत्यू नाही? तपास सुरु.
मंत्रालयातील पाणी प्यायल्याने कर्मचाऱ्यांंना उलट्या, पाण्याच्या टाकीत
मंत्रालयातील पाणी प्यायल्याने कर्मचाऱ्यांंना उलट्या, पाण्याच्या टाकीत.
विदर्भात उष्णतेचा कहर; गडचिरोलीत ४२°C पार, गडचिरोली-हैदराबाद....
विदर्भात उष्णतेचा कहर; गडचिरोलीत ४२°C पार, गडचिरोली-हैदराबाद.....
केईएम हॉस्पिटलच्या नामांतराला प्रशासनाकडून हिरवा कंदील? पालिका आयुक्ता
केईएम हॉस्पिटलच्या नामांतराला प्रशासनाकडून हिरवा कंदील? पालिका आयुक्ता.
उद्धव ठाकरे मोठे नेते नाहीत; संजय निरुपमांचा टोला, विधान परिषद.....
उद्धव ठाकरे मोठे नेते नाहीत; संजय निरुपमांचा टोला, विधान परिषद......
मोठी अपडेट! अजित दादांच्या अपघाताच्या दिवशी ९ कोटी विमान कंपनी मालकाला
मोठी अपडेट! अजित दादांच्या अपघाताच्या दिवशी ९ कोटी विमान कंपनी मालकाला.
मराठी सक्तीवर सरकारचा मवाळ पवित्रा; रिक्षा-टॅक्सी चालकांना....
मराठी सक्तीवर सरकारचा मवाळ पवित्रा; रिक्षा-टॅक्सी चालकांना.....
चक्क मुंबईत पहलगामसारखी घटना! तू हिंदु आहेस? तु नमाज पठण करतोस? विचारल
चक्क मुंबईत पहलगामसारखी घटना! तू हिंदु आहेस? तु नमाज पठण करतोस? विचारल.