AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारत पाकिस्तान सामन्याची तिकीट व्रिकी थंडावली, नेमकं काय झालं?

आशिया कप स्पर्धेपेक्षा क्रीडाप्रेमींना वेध लागले आहेत ते भारत पाकिस्तान सामन्यांचे... हा सामना 14 सप्टेबरला होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या सामन्याची चर्चा होत होती. अखेर ती वेळ जवळ आली आहे. पण आश्चर्यकारक बाब म्हणजे या सामन्याची तिकीट अजूनही शिल्लक आहेत. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.

भारत पाकिस्तान सामन्याची तिकीट व्रिकी थंडावली, नेमकं काय झालं?
भारत पाकिस्तान सामन्याची तिकीट व्रिकी थंडावली, नेमकं काय झालं की प्रेक्षकांनी फिरवली?Image Credit source: PTI
| Updated on: Sep 09, 2025 | 9:24 PM
Share

आशिया कप स्पर्धेला धुमधडाक्यात सुरुवात झाली आहे. पहिला सामना अफगाणिस्तान आणि हाँगकाँग यांच्यात सुरु आहे. आशिया कप स्पर्धा 28 सप्टेंबरपर्यंत असणार आहे. पण सर्वांचं लक्ष हे पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या भारत आणि पाकिस्तान सामन्याकडे लागून आहे. कारण हे दोन्ही संघ आशिया कप आणि आयसीसी स्पर्धांमध्येच आमनेसामने येतात. त्यामुळे या सामन्याची उत्सुकता वाढली आहे. त्यामुळे मैदानातून सामना पाहण्यासाठी झुंबड उडते. काही तासातच तिकीट विक्री होते अशी स्थिती असते. पण आशिया कप स्पर्धेच्या सामन्याची तिकीट विक्री अजून पूर्ण झालेली नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. असं का म्हणून क्रीडाप्रेमींना प्रश्न पडला. भारत पाकिस्तान सामन्याची प्रिमियम तिकीट आतापर्यंत विकली गेलेली नाहीत.

रिपोर्टनुसार, व्हिआयपी सुइट्स ईस्टमध्ये अजूनही तिकीट शिल्लक आहेत. टिकटिंग पोर्टल्स वियागोगो आणि प्लॅटिनमलिस्टवर दोन सीट्सची किंमत 2 लाख 57 हजार 815 रुपये आहे. या पॅकेजमध्ये अमर्यादीत खाणं आणि पेये, पार्किंग पास, व्हिआयपी क्लब/लाउंजमध्ये प्रवेश आणि खासगी प्रवेश समाविष्ट आहे. रॉयल बॉक्समध्येदेखील तिकीटे शिल्लक आहेत. याची किंमत दोन लोकांसाठी 2 लाख 30 हजार 700 रुपये आहे. तर स्काय बॉक्स ईस्टची किंमत 1 लाख 67 हजार 851 रुपये आहे.

आयोजकांनी तिकीट प्रणालीत बदल केल्याने गोंधळ उडाला आहे. कारण यावेळी तिकीट विकत घेणं वाटतं तितकं सोपं नाही. यापूर्वी भारत-पाकिस्तान सामन्यासाठी थेट तिकिटे खरेदी करता येत होती. पण यावेळी ग्रुप पॅकेज खरेदी करावे लागेल. त्यामुळे भारत-पाकिस्तान सामना पाहण्यासाठी चाहत्यांना एकूण सात सामन्यांची तिकिटे रेदी करावी लागतील. त्यामुळे ग्रुप पॅकेज खरेदी करणं महाग पडत आहे. क्रिकेटप्रेमींना ही प्रणाली आवडली नाही. अनेक चाहत्यांचे फक्त भारत-पाकिस्तान सामना पहायचा आहे आणि इतर सामन्यांमध्ये रस नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, विमान आणि हॉटेल्सच्या किमतीही गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे चाहत्यांनी पाठ फिरवल्याची चर्चा आहे. पण येत्या दोन तीन दिवसात तिकीट विक्री होईल असा विश्वास आयोजकांना आहे.

Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.