AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA: दक्षिण आफ्रिकेचं जोरदार प्रत्युत्तर, भारतीय गोलंदाज ठरले निष्प्रभ

जोहान्सबर्गमधील वाँडर्स मैदानाचा इतिहास अलीकडच्या काही वर्षात भारताच्या बाजूने आहे. त्यामुळे उद्या वाँडर्सच्या मैदानात काय घडणार? त्याची उत्सुक्ता आहे.

IND vs SA: दक्षिण आफ्रिकेचं जोरदार प्रत्युत्तर, भारतीय गोलंदाज ठरले निष्प्रभ
| Edited By: | Updated on: Jan 05, 2022 | 9:53 PM
Share

डरबन: जोहान्सबर्ग कसोटीच्या आजच्या तिसऱ्या दिवसाच्या खेळावर दक्षिण आफ्रिकेचा दबदबा दिसून आला. गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्ही विभागात त्यांनी भारतापेक्षा सरस कामगिरी केली. ज्यावेळी विकेट मिळवण्याची गरज होती, तेव्हा दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करुन विकेट मिळवल्या व जेव्हा खेळपट्टीवर टिकून फलंदाजी गरजेची होती, तेव्हा तशा पद्धतीची फलंदाजी करुन भारतीय गोलंदाजांना नामोहरम केलं. उद्या कसोटीचा चौथा दिवस असून ही कसोटी निकाली निघणार हे निश्चित आहे. फक्त आजच्या सारखाच खेळ उद्याही आफ्रिकी संघाने दाखवला तर मात्र मालिका पुन्हा बरोबरीत येईल. (india vs south africa 2nd test match day 3 Johannesburg Wanderers Stadium South Africa dominant performance)

जोहान्सबर्गमधील वाँडर्स मैदानाचा इतिहास अलीकडच्या काही वर्षात भारताच्या बाजूने आहे. त्यामुळे उद्या वाँडर्सच्या मैदानात काय घडणार? त्याची उत्सुक्ता आहे. भारताने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 240 धावांच आव्हान दिलं आहे. दिवसअखेर त्यांच्या दोन बाद 118 धावा झाल्या आहेत. त्यामुळे पारडं त्यांच्या बाजूने झुकलेलं आहे.

रहाणे-पुजाराकडून स्पेशल खेळीची गरज होती आज भारताने दोन बाद 85 वरुन डाव पुढे सुरु केल्यानंतर सुरुवातीचा तासभर अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजाराने अपेक्षा उंचावणारा खेळ केला. पण रहाणे (58) आणि पुजारा (53) धावांवर बाद झाल्यानंतर भारताचा डाव पुन्हा गडगडला. फक्त शार्दुल ठाकूर (28) आणि हनुमा विहारीने नाबाद (40) प्रतिकार केला व भारताची धावसंख्या 266 पर्यंत पोहोचवली. ऋषभ पंतकडून जबाबदार खेळीची अपेक्षा असताना, त्याने तर आपली विकेट बहाल केली. या डावातही फलंदाजीच भारताची डोकेदुखी ठरली. पुजारा आणि रहाणेने अर्धशतक झळकवून टीकाकारांना प्रत्युत्तर दिलं असलं तरी, आज स्पेशल खेळीची गरज होती. कारण हे दोघे बाद झाल्यानंतर अन्य फलंदाज फक्त हजेरीवीर ठरले.

भारतीय गोलंदाजांना दाद दिली नाही दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या डावात खूप चांगली फलंदाजी केली आहे. मालिकेला सुरुवात झाल्यापासून भारतीय गोलंदाजांनी आफ्रिकन फलंदाजांवर वर्चस्व गाजवलं आहे. पण आज आफ्रिकन फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांना दाद दिली नाही. विकेट मिळवण्यासाठी भारतीय गोलंदाजांना संघर्ष करावा लागला. सलामीवीर मार्कराम (31) आणि पीटरसनला (28) अनुक्रमे ठाकूर आणि अश्विनने बाद केले. पण या विकेट सुद्धा सहजासहजी मिळाल्या नाहीत. कॅप्टन एल्गर आणि डुसेची जोडी मैदानावर आहे. आठ विकेट आणि दोन दिवस शिल्लक असल्याने पारडं आफ्रिकेचं जड आहे.

संबंधित बातम्या: 

IND vs SA: ‘तरी अजिंक्य रहाणेला संघाबाहेर काढा’, गौतम गंभीरचं रोखठोक मत ICC Rankings: केएल राहुल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमीची रँकिंग सुधारली Yuzvendra Chahal: चहलच्या बायकोने काश्मीरमध्ये दाखवल्या वेगळ्या अदा, पाहा खास PHOTOS

(india vs south africa 2nd test match day 3 Johannesburg Wanderers Stadium South Africa dominant performance)

Follow Us
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?.
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल.
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?.
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?.
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.