AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs AUS : 26 वनडे सामन्यांपासूनचा ऑस्ट्रेलियाचा विजयरथ रोखण्यात भारतीय संघ यशस्वी, झुलन, शेफाली, स्नेह राणा चमकल्या

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलेल्या भारताच्या महिला क्रिकेट संघानेही एकदिवसीय मालिका अखेरच्या सामन्यात विजय मिळवत संपवली आहे.

IND vs AUS : 26 वनडे सामन्यांपासूनचा ऑस्ट्रेलियाचा विजयरथ रोखण्यात भारतीय संघ यशस्वी, झुलन, शेफाली, स्नेह राणा चमकल्या
| Edited By: | Updated on: Sep 26, 2021 | 3:41 PM
Share

मुंबई : असे म्हटले जाते की जर शेवट चांगला असेल तर सर्व काही ठीक आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलेल्या भारताच्या महिला क्रिकेट संघानेही एकदिवसीय मालिका अखेरच्या सामन्यात विजय मिळवत संपवली. मात्र, 1-2 ने पिछाडीवर पडल्यामुळे संघाला 3 वनडे सामन्यांची ही मालिका काबीज करता आली नाही. पण या मालिकेत भारतीय महिला संघाने एक महान काम केले आहे. त्यांनी गेल्या 26 एकदिवसीय सामन्यांपासून ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाची विजयी मालिका खंडित केली आहे. ऑस्ट्रेलियन महिला संघाचा विजयरथ रोखल्यानंतर भारतीय संघाचा आत्मविश्वास नक्कीच वाढेल. (India Women End Australia Women’s 26-Match ODI Winning Streak With 2-Wicket Win)

एकदिवसीय मालिकेतील पहिले दोन सामने गमावलेल्या भारतीय संघाने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात प्रथम गोलंदाजी केली. प्रथम खेळताना यजमानांनी 9 फलंदाजांच्या बदल्यात 264 धावा केल्या आणि भारतासमोर विजयासाठी 265 धावांचे लक्ष्य ठेवले. या सामन्यात ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली. अनुभवी वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीने रसेल आणि लेनिंगला लवकर पव्हेलियनचा रस्ता दाखवला.

100 धावांच्या आत ऑस्ट्रेलियन टॉप ऑर्डरचे चार बॅटर्स माघारी परतले. ज्यात एलिसा हिली आणि एलिस पेरी सारख्या फलंदाजांची नावे आहेत. मात्र, यानंतर मुने आणि गार्डनर या दोघींनी ऑस्ट्रेलियाचा कोसळणारा डाव सावरला. दोघाींमध्ये झालेली भागीदारी भारतासाठी धोकादायक ठरत होती. ही भागीदारी फोडण्याचे काम स्नेह राणाने केले. तिने 52 या वैयक्तिक धावसंख्येवर असलेल्या मुनेला त्रिफळाचित केलं. त्यानंतर गार्डनरही पूजाचा बळी ठरली, तिने 67 धावा केल्या. अखेरच्या षटकात फटकेबाजी करुन मॅक्ग्राने 32 चेंडूत 47 धावा केल्या. या सामन्यात झुलन गोस्वामी भारतासाठी सर्वात किफायतशीर गोलंदाज ठरली, तिने 10 षटकांत 37 धावा देऊन 3 बळी घेतले.

2 विकेट राखून जिंकला शेवटचा एकदिवसीय सामना

265 धावांचे लक्ष्य घेऊन भारतीय सलामीवीर मैदानात उतरल्या. पहिल्या विकेटसाठी सलामीवीरांनी 50 धावांची भागीदारी केलीच होती, तोच स्मृती मांधना बाद झाली. तिच्यानंतर आलेल्या यास्तिका भाटियाने शेफालीला सोबत घेऊन मोर्चा सांभाळला. दोघाींमध्ये दुसऱ्या विकेटसाठी 101 धावांची भागीदारी झाली, ज्यामुळे भारताच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला. 56 धावा करणारी शेफाली बाद झाल्याने ही जोडी फुटली. यास्तिका भाटियाने 69 चेंडूत 64 धावा केल्या. तथापि, 180 धावांवर दोन सेट फलंदाज बाद झाल्याने भारतीय संघ अडचणीत आला होता. तेव्हा दीप्ती शर्मा आणि स्नेह राणा यांनी भारताचा डाव पुन्हा रुळावर आणण्याचे काम केले. दीप्तीने 30 चेंडूत 31 धावा केल्या तर स्नेह राणाने 27 चेंडूत 30 धावा केल्या.

भारताला विजयासाठी शेवटच्या 4 चेंडूत 3 धावांची गरज होती. पण झुलन गोस्वामीने एक सणसणीत चौकार मारला आणि सामना 3 चेंडू आधीच 2 गडी राखून जिंकला. झुलन गोस्वामी भारताच्या या विजयाची हिरो ठरली, त्यामुळे तिला प्लेअर ऑफ द मॅच पुरस्काराना गौरवण्यात आले.

इतर बातम्या

रवीचंद्रन अश्विनची मोठ्या विक्रमाला गवसणी, ‘अशी’ कामगिरी करणारा तिसरा भारतीय खेळाडू ठरला!

माझ्या भावाने विराट कोहलीविरुद्ध स्क्रिप्ट लिहिली, धोनीची मोठी प्रतिक्रिया

IPL 2021 Purple Cap: हर्षल पटेल अव्वल स्थानी कायम, अशी आहे नवी यादी

(India Women End Australia Women’s 26-Match ODI Winning Streak With 2-Wicket Win)

Follow Us
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड.
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?.