AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Team India: विश्व विजेता टीम इंडिया मायदेशी, नवी दिल्ली विमानतळावर जंगी स्वागत

Welcome Team India: टीम इंडिया 15 तासांच्या प्रवासानंतर भारतात दाखल झाली आहे. टीम इंडियाचं नवी दिल्ली विमानतळावर जंगी स्वागत करण्यात आलं आहे.

Team India: विश्व विजेता टीम इंडिया मायदेशी, नवी दिल्ली विमानतळावर जंगी स्वागत
| Updated on: Jul 04, 2024 | 7:28 AM
Share

आयसीसी टी 20 वर्ल्ड कप विजयानंतर टीम इंडिया मायदेशी पोहचली आहे. टीम इंडियाचे खेळाडू हे नवी दिल्ली विमानतळावर दाखल झाले आहेत. टीम इंडियाने बारबाडोस ते नवी दिल्ली हा 15 तासांचा प्रवास केला. टीम इंडियासाठी बीसीसीआयने प्रायव्हेट जेट पाठवला होता. या जेटने भारतीय संघ भारताच्या दिशेने रवाना झाला. टीम इंडिया विमानतळावर कधी पोहचतेय, याची क्रिकेट चाहते मध्यरात्रीपासून वाट पाहत होते, अखेर टीम इंडिया विमानतळावर पोहचली आहे. टीम इंडियाच्या खेळाडूंनी चाहत्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या. त्यानंतर आता टीम इंडिया विमानतळावरुन हॉटेलच्या दिशेने रवाना झाली आहे. हॉटेलमध्ये टीम इंडियांच स्वागत केलं जाणार आहे. हॉटेलमधून तयार होऊन टीम इंडिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटायला जाणार आहे.

विमानतळावरुन थेट हॉटेलला रवाना

टीम इंडियाला बारबाडोसहून घेऊन आलेलं खासगी जेट पहाटे भारतात आलं.त्यानंतर भारतीय खेळाडू व्हीआयपी गेटने विमानतळावर पोहचले. टर्मिनल 3 वर असलेल्या बसमध्ये एकएक करुन सर्व खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ चढले. त्यानंतर बस निघाली. काही सेकंदात बस विमानतळावरील त्या ठिकाणी पोहचली जिथे क्रिकेट चाहत्यांनी गर्दी केली होती. असंख्य क्रिकेट चाहते पोस्टर्स घेऊन टीम इंडियाच्या स्वागतासाठी हजर होते. “इंडिया इंडिया”, अशा जयघोषात टीम इंडियाच्या खेळाडूंचं स्वागत करण्यात आलं आहे. बसमध्ये असलेल्या खेळाडूंनी चाहत्यांच्या शुभेच्छा स्वीकारत त्यांचे आभार मानले.

टीम इंडिया विमानतळावरुन आयटीसी मोर्या या हॉटेलमध्ये जाणार आहे. या हॉटेलमध्ये टीम इंडियाचं पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात येणार आहे. टीम इंडियाचे खेळाडू या हॉटेलमध्ये तयार होऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला जाणार आहे. त्यामुळे आता दिवसभर साऱ्यांचंच लक्ष हे टीम इंडियाकडेच असणार आहे.

विराट कोहलीचा व्हीडिओ व्हायरल

टीम इंडियाला टी 20 वर्ल्ड कप जिंकून देणारे खेळाडू : रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल , अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.