AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND v ENG: वर्षभरानंतर भारतीय संघात मिळेल संधी, ‘या’ गोलंदाजाच्या पुनरागमनाने इंग्लंडचा संघ अडचणीत

या धुरंदर खेळाडेने शेवटचा कसोटी सामना डिसेंबर 2020 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता. 48 कसोटी सामन्यांचा अनुभव असणाऱ्या या खेळाडूने केवळ एकच सामना इंग्लंडमध्ये खेळला आहे.

IND v ENG: वर्षभरानंतर भारतीय संघात मिळेल संधी, 'या' गोलंदाजाच्या पुनरागमनाने इंग्लंडचा संघ अडचणीत
भारतीय कसोटी संघ
| Edited By: | Updated on: Aug 12, 2021 | 12:18 PM
Share

लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना अवघ्या काही तासांत सुरु होणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या आगामी पर्वातील पहिलीच कसोटी मालिका असलेल्या या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना  पावसाच्या व्यत्ययामुळे अनिर्णीत सुटला होता. आता आज (12 ऑगस्ट) भारतीय वेळेनुसार दुपारी 3.30 वाजता दुसरा सामना सुरु होणार आहे. सामन्यापूर्वी भारतीय संघात काही महत्त्वाचे बदल होण्याची दाट शक्यता आहे. अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) दुखापतग्रस्त झाल्याने भारतीय संघात त्याच्या जागी कोणाला संधी मिळणार? हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. दरम्यान आपल्या स्पीडसाठी प्रसिद्ध असलेला एक धुरंदर भारतीय गोलंदाजाला यावेळी संधी मिळून शकते. उमेश यादव (Umesh Yadav) असं त्याच नाव असून तो जवळपास वर्षभरानंतर कसोटी सामना खेळेल.

पहिल्या कसोटी सामन्यात 4 विकेट घेणाऱ्या शार्दुल ठाकुरच्या पायाला हॅमस्ट्रिंग इंजरी झाल्याने त्याला लॉर्ड्समधील दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळता येणार नाही. पण पहिल्या सामन्यात भारतीय संघाने 4 वेगवान गोलंदाज खेळवत चांगली कामगिरी केली होती. त्यानुसारच दुसऱ्या सामन्यातही जर शार्दूल नसताना भारतीय संघ 4 वेगवान गोलंदाज खेळवण्याचा निर्णय घेतो तर उमेश यादवची जागा पक्की होऊ शकते. उमेशच्या गोलंदाजीत स्पीड आहे, इतर भारतीय गोलंदाजाच्या तुलनेत त्याची ही जमेची बाजू असल्याने त्याला लॉर्ड्सच्या मैदानात मदत होईल. ज्यामुळे त्याला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.

इंग्लंडविरुद्ध उमेश यादव

उमेश यादवने डिसेंबर, 2020 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्द शेवटचा कसोटी सामना भारतीय संघातून खेळला होता. त्यानंतर त्याने एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. दुखापतींमुळे संघाबाहेर असणाऱ्या यादवला आजच्या सामन्यात पुन्हा संधी मिळू शकते. त्याने भारतीय संघातून 48 कसोटी सामने खेळले आहे. ज्यातील एक सामना इंग्लंडमध्ये खेळला आहे. ज्यात त्याने 3 विकेट्स घेतले होते. 2018 च्या इंग्लंड दौऱ्यावेळी त्याने हा सामना खेळला होता. तर आतापर्यंत इंग्लंडविरुद्ध त्याने 7 कसोटी सामने खेळले असून त्यात 15 विकेट्स घेतले आहेत.

हे ही वाचा

IND v ENG Live Streaming: भारत विरुद्ध इंग्लंड दुसरा कसोटी सामना, Live Match कधी, कुठे?

IND vs ENG : भारताचा हातातोंडाशी आलेला विजय पावसाने हिरावला, पाचव्या दिवसाचा खेळ रद्द, पहिली कसोटी अनिर्णित

IND vs ENG : सामना अनिर्णीत सुटल्यानंतर इंग्लंडचा कर्णधार जो रुट म्हणतो, आणखी 40 ओव्हर मिळाले असते तर…

(Indian Fast Bowler Umesh Yadav may include in Team indias final 11 for india vs england second test)

चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...