AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG : भारतीय खेळाडू हाताला काळी फित बांधत उतरले मैदानात, ‘हे’ आहे कारण

भारत आणि इंग्लंड दोन्ही संघ कसोटी मालिकेत 1-1 च्या बरोबरीत आहेत. सध्या सुरु असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात दोन्ही संघ जिंकण्यासाठी मैदानात उतरले असताना भारतीय खेळाडूंनी मात्र हाताला काळी फित बांधली आहे.

IND vs ENG : भारतीय खेळाडू हाताला काळी फित बांधत उतरले मैदानात, 'हे' आहे कारण
भारतीय क्रिकेट संघ
| Edited By: | Updated on: Sep 02, 2021 | 4:20 PM
Share

लंडन : भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. इंग्लंडचा कर्णधार जो रुटने (Joe Root) नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. दरम्यान या सामन्यात भारतीय खेळाडू हाताला काळी फित बांधून उतरले आहेत. भारताचे  दिग्गज क्रिकेटपटू आणि नंतर दिग्गज प्रशिक्षक असणारे वासु परांजपे (Vasoo Paranjape) यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी टीम इंडियाने असे केले आहे. वासू यांचे सोमवारी (30 ऑगस्ट) मुंबई येथे निधन झाले.

पाच सामन्यांची कसोटी मालिका सध्या अतिशय रंगतदार स्थितीत आली आहे. मालिकेतील पहिला सामना अनिर्णीत सुटला. त्यानंतर भारतीय संघाने दुसऱ्या कसोटी सामन्यात तर तिसऱ्या सामन्यात इंग्लंडने विजय मिळवला. त्यामुळे दोन्ही संघ 1-1 अशा बरोबरीत असल्याने चौथा सामना दोघांसाठी महत्त्वाचा आहे. दरम्यान भारतीय खेळाडूंनी काळी फित बांधत मैदानात उतरल्यानंतर त्यांचा फोटो बीसीसीआयने ट्विट केला आहे. त्याला कॅप्शन दिलं आहे की,’भारतीय संघ महान क्रिकेटपटू वासु परांजपे यांना श्रद्धांजली देण्यासाठी हातावर काळी पट्टी बांधून उतरत आहे.’

कोण होते वासु परांजपे?

भारतीय संघाला मुंबईने अनेक हिरे दिले. यात सुनिल गावस्करांपासून तेंडुलकर ते आता रोहित शर्मा अशा अनेकांचा समावेश आहे. यातीलच एक सर्वात जुने खेळाडू म्हणजे वासु परांजपे. मैदानातून निवृत्ती घेतल्यानंतर प्रशिक्षक म्हणून काम करत अनेक क्रिकेटपटूंचं भविष्य घडवलं. यामध्ये सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर, दिलीप वेंगसरकर, राहुल द्रविड आणि रोहित शर्मा सारखी नावं सामिल आहेत. अनेक संघाचे प्रशिक्षक म्हणून वासु यांनी काम पाहिलं असून ते राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रशिक्षकही राहिले आहेत.

दोन्ही संघात दोन बदल

चौथ्या कसोटी सामन्यासाठी दोन्ही संघानी दोन-दोन बदल केले आहेत. भारतीय संघात मोहम्मद शमी आणि इशांत शर्मा यांना विश्रांती देण्यात आली आहे. त्यांच्या जागी शार्दूल ठाकूर आणि उमेश यादवला संधी दिली आहे. तर इंग्लंडच्या संघात सॅम करनच्या जागी ख्रिस वोक्स आणि जोस बटलरच्या जागी ओली पोप खेळणार आहे.

हे ही वाचा :

सुनिल गावस्कर ते सचिन तेंडुलकर पर्यंत अनेकांना घडवणारे वासु परांजपे कालवश, मुंबईत घेतला अखेरचा श्वास

IND vs ENG: मोईन अलीने घेतल्या 9 विकेट्स, भारतावर पराभवाची नामुष्की, इंग्लंडच्या ‘त्या’ विजयाची पुनरावृत्ती?

ICC Test Rankings: जो रूट फलंदाजीचा नवा बादशाह, जागतिक क्रमवारीत रोहितची ऐतिहासिक भरारी, विराट मात्र पिछाडीवर

(Indian Players wore black band in 4th test at oval against england to give tribute to Vasoo Paranjape)

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.