AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs NED : स्मृती मंधानाचं सलग दुसरं शतक, हरमनप्रीत कौरचा महारेकॉर्ड उद्धवस्त

Most Fifty By India in Womens T20i World Cup : स्मृती मंधाना हीने आयसीसी वुमन्स टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत सलग दुसरं अर्धशतक झळकावलं. स्मृतीने यासह भारतासाठी मोठा विक्रम केला. जाणून घ्या.

IND vs NED : स्मृती मंधानाचं सलग दुसरं शतक, हरमनप्रीत कौरचा महारेकॉर्ड उद्धवस्त
Smriti Mandhana Team IndiaImage Credit source: bcci women X Account
| Updated on: Jun 17, 2026 | 10:36 PM
Share

वुमन्स टीम इंडियाची स्टार ओपनर बॅट्समन आणि उपकर्णधार स्मृती मंधाना हीने आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील आपल्या सलग दुसऱ्या सामन्यात धमाका कायम ठेवत चाबूक खेळी केली आहे. स्मृतीने हेडिंग्ले लीड्समध्ये आयोजित सामन्यात खणखणीत खेळी केली. स्मृतीने भारतासाठी सर्वाधिक 74 धावा केल्या. स्मृतीने या दरम्यान अर्धशतक लगावताच मोठा रेकॉर्ड ब्रेक केला. स्मृतीने सहकारी-कर्णधार हरमनप्रीत कौर आणि माजी फलंदाज मिताली राज या दोघींचा विक्रम मोडीत काढला.

भारताची जबरदस्त सुरुवात

शफाली वर्मा आणि स्मृती या दोघींनी भारताला जबरदस्त सुरुवात मिळवून दिली. दोघींनी 11.4 ओव्हरमध्ये 115 रन्सची ओपनिंग पार्टनरशीप केली. शफाली वर्माच्या रुपात भारताने पहिली विकेट गमावली. शफालीने 55 धावा केल्या. शफालीनंतर स्मृतीने वर्ल्ड कप स्पर्धेच्या 10 व्या पर्वातील सलग दुसरं अर्धशतक पूर्ण केलं. स्मृतीने 36 बॉलमध्ये 6 फोर आणि 1 सिक्सच्या मदतीने हे अर्धशतक झळकावलं. स्मृतीचं हे टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेतील एकूण सहावं अर्धशतक ठरलं. स्मृती यासह भारताकडून या स्पर्धेत सर्वाधिक अर्धशतकं करणारी महिला फलंदाज ठरली. स्मृतीने याबाबत हरमनप्रीत आणि मिताली या दोघींना मागे टाकलं.

पाकिस्तान विरुद्ध अर्धशतक

स्मृतीने 14 जूनला पाकिस्तान विरुद्ध 44 चेंडूत 68 धावा केल्या होत्या. स्मृतीने यासह हरमनप्रीत आणि मितालीच्या विक्रमाची बरोबरी केली होती. तर आता स्मृतीने टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत भारताकडून सर्वाधिक अर्धशतकं करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

स्मृती मंधाना हीची शतकाची संधी हुकली

स्मृतीची सलग दुसऱ्या सामन्यात शतक करण्याची संधी हुकली. स्मृती दोन्ही सामन्यात अर्धशतकाचं रुपांतर शतकात करण्यात अपयशी ठरली. स्मृती पाकिस्तान विरुद्ध 68 धावांवर बाद झाली. तर स्मृतीने नेदरलँड्स विरुद्ध 74 धावा केल्या. स्मृतीने या खेळीत 11 चौकारांसह आणि 1 षटकारही लगावला.

उपकर्णधार स्मृती मंधानाचं सलग दुसरं अर्धशतक

स्मृतीच्या भारताकडून सर्वाधिक धावा

दरम्यान स्मृती वर्ल्ड कप स्पर्धेच्या 10 व्या पर्वात भारताकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत पहिल्या स्थानी विराजमान आहे. स्मृतीच्या नावावर 2 सामन्यांनंतर एकूण 142 धावा आहेत.

Follow Us
चंद्रपूरमध्ये विजय वडेट्टीवार गटाला जबर धक्का, तो अधिकृत आदेश येताच...
चंद्रपूरमध्ये विजय वडेट्टीवार गटाला जबर धक्का, तो अधिकृत आदेश येताच मोठी खळबळ; महापालिकेत काय घडलं?
सांभाळून बोला अन्यथा फोडायचं कसं...शिंदे गटातील महिला नेत्याचा प्रचंड
सांभाळून बोला अन्यथा फोडायचं कसं...शिंदे गटातील महिला नेत्याचा प्रचंड संताप; नाव न घेता राऊतांना थेट इशारा?
आता काही खऱं नाही! लोकशाहीचं... ठाकरे गटातील फुटीबाबत तज्ज्ञांचा मोठा
आता काही खऱं नाही! लोकशाहीचं... ठाकरे गटातील फुटीबाबत तज्ज्ञांचा मोठा इशारा, काय म्हणाले?
ठाकरेंचे आणखी दोन खासदार....बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ, खासदर फुट
ठाकरेंचे आणखी दोन खासदार....बड्या नेत्याच्या दाव्याने  खळबळ, खासदर फुटीनंतर आणखी मोठा धक्का!
अजितदादांच्या पक्षाने व्हीप काढला पण...त्या उल्लेखानंतर मोठी खळबळ
मोठी बातमी! अजितदादांच्या पक्षाने व्हीप काढला पण...त्या उल्लेखानंतर मोठी खळबळ; सोलापुरात नेमकं काय घडतंय?
तर त्यांना गाडीसकट पेटवू...बंड करणाऱ्या खासदाराविरोधात वातावरण तापलं;
तर त्यांना गाडीसकट पेटवू...बंड करणाऱ्या खासदाराविरोधात वातावरण तापलं; थेट इशाराच दिला!
मुंबईत पोलीस तैनात! दिना पाटील यांच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त!
Operation Tiger | दिल्लीत बंड, मुंबईत पोलीस तैनात! संजय दिना पाटील यांच्या घराबाहेर अचानक वाढवला पोलिस बंदोबस्त!
दिल्लीहून आल्यानंतर ओमराजे 3 तास विमानतळावरच बसून; नंतर दुसऱ्या...
दिल्लीहून आल्यानंतर ओमराजे 3 तास विमानतळावरच बसून; नंतर दुसऱ्या... नेमकं कारण काय?
ठाकरेंना दुसरा मोठा धक्का! 6 खासदारांच्या बंडानंतर व्हीपही ठरला अवैध?
Sushma Andhare | ठाकरेंना दुसरा मोठा धक्का! 6 खासदारांच्या बंडानंतर व्हीपही ठरला अवैध?
6 खासदार कुठे गेले?; सामंतांच्या एका वक्तव्याने राजकारणत खळबळ!
Uday Samant | 6 खासदार कुठे गेले?; उदय सामंतांच्या एका वक्तव्याने राज्याच्या राजकारणात खळबळ!