AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काहीही झालं तरी विराटला IPL ट्रॉफी जिंकवून द्यायचीच, RCB खेळाडू करतायत जीवाचं रान, प्लॅन ठरला!

IPL चा यंदाचा हंगाम (IPL 2021) RCB कर्णधार विराट कोहलीसाठी खूप खास आहे. कर्णधार म्हणून त्याचा हा शेवटचा हंगाम आहे. यूएईमध्ये लीगचा दुसरा हंगाम सुरु होण्यापूर्वीच विराट कोहलीने यंदाच्या वर्षानंतर भारतीय संघाचे नेतृत्व करणार नसल्याचे जाहीर केले होते.

काहीही झालं तरी विराटला IPL ट्रॉफी जिंकवून द्यायचीच, RCB खेळाडू करतायत जीवाचं रान, प्लॅन ठरला!
विराट कोहली
| Edited By: Akshay Adhav | Updated on: Oct 10, 2021 | 1:49 PM
Share

दुबई : IPL चा यंदाचा हंगाम (IPL 2021) RCB कर्णधार विराट कोहलीसाठी खूप खास आहे. कर्णधार म्हणून त्याचा हा शेवटचा हंगाम आहे. यूएईमध्ये लीगचा दुसरा हंगाम सुरु होण्यापूर्वीच विराट कोहलीने यंदाच्या वर्षानंतर भारतीय संघाचे नेतृत्व करणार नसल्याचे जाहीर केले होते. त्याचबरोबर त्याने हे देखील स्पष्ट केले होते की जोपर्यंत तो आयपीएलमध्ये खेळतो तोपर्यंत तो फक्त आरसीबीकडून खेळेल.

विराट कोहली बरीच वर्षे आरसीबीचा कर्णधार आहे. आतापर्यंत आरसीबीचा संघ कधीही विजेतेपद मिळवू शकला नाही. गेल्या दोन हंगामात आयरीबी संघ चांगला खेळला पण जेतेपद मिळवण्यात अपयशी ठरला. आरसीबीच्या खेळाडूंना आता या स्टार कर्णधाराला विजयासह निरोप द्यायचा आहे. साखळी फेरीच्या शेवटच्या सामन्यात विजयी षटकार मारणारा के एस भरतने यासंबंधीचा खुलासा केलाय.

विराट कोहलीसाठी ट्रॉफी जिंकण्याची इच्छा, त्यासाठी काहीही करण्याची तयारी

संपूर्ण टीमला विराट कोहलीसाठी जेतेपदाची ट्रॉफी उंचवायचीय. याबद्दल बोलताना यष्टीरक्षक फलंदाज भरत म्हणाला, ‘अर्थातच आम्हाला विराट भाईसाठी यंदाची आयपीएल ट्रॉफी जिंकण्याची इच्छा आहे. यंदा जर आम्ही ट्रॉफी जिंकण्यात यशस्वी झालो तर याच्याहून चांगली काहीच नसेल. या विजयासाठी संपूर्ण टीम जीवतोड मेहनत करत आहे. पण खरं सांगायचं तर विराटसोबत खेळणं ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. तो तरुण खेळाडूंवर प्रेम करतो आणि त्यांना प्रेरणा देतो. तो खूप मेहनत करतो. तो खूप व्यावसायिक आहे आणि त्याच्याबरोबर खेळणे मला आत्मविश्वास देते. तो खूप प्रोफेशनल आहे, तो नेहमी आम्हाला मदत करण्यास तयार असतो.

कोणत्याही क्रमाने फलंदाजी करण्यास तयार

भरत आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात तिसऱ्या क्रमांकावर खेळत राहिला पण संघ व्यवस्थापनाने त्याला सांगितले की फलंदाजीची क्रमवारी कधीही बदलली जाऊ शकते. त्यावर त्याला प्रश्न विचारला असता, तो म्हणाला, ‘मी कोणत्याही क्रमांकावर खेळण्यास तयार आहे. याबद्दल मी संघ व्यवस्थापनाला स्पष्टपणे सांगितलं आहे. प्रत्येकजण आव्हानासाठी सज्ज आहे. मला असं वाटत नाही की आमच्या संवादामध्ये कोणतीही कमी आहे. जेव्हा तुम्हाला संधी दिली जाते, तेव्हा तुम्हाला चांगली कामगिरी करून संघाला विजयाकडे नेण्याची इच्छा असते.

गेल्या दोन-तीन वर्षांत त्याच्या फलंदाजीच्या शैलीत झालेल्या बदलाबद्दल बोलताना भरत म्हणाला की, या वेळी मला जाणवलं की तो प्रत्येक चेंडू सीमारेषेपलीकडे आपण धाडू शकत नाही. ‘मी माझी ताकद आणि कमतरता जाणून घेण्याचा प्रयत्न करत होतो. मी 2018-19 (होम सीझन) मध्ये प्रत्येक चेंडू मारण्याच्या उद्देशाने खेळायचो पण नंतर मी माझी एकूण रणनीती सुधारली.

(IPL 2021 Virat Kohli RCB title will cherry on Cake Says KS Bharat)

हे ही वाचा :

IPL 2021 : चेन्नई की दिल्ली, फायनलमध्ये पहिल्यांदा कोण एन्ट्री करणार? या 5 खेळाडूंच्या हातात सामन्याचा निकाल!

उम्रान मलिक T20 Worldcup मध्ये भारतीय संघासोबत, IPL 2021 मध्ये सर्वात वेगवान चेंडू फेकल्याबद्दल मिळाली संधी

Follow Us
पंढरीकडे पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
Pandharpur Wari 2026 | पंढरीकडे संतांच्या पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
मोठी बातमी! ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर..
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर...
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक; द हिंदूचा मोठा दावा
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक, 25 वर्षीय तरुण जखमी; द हिंदूचा मोठा दावा
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
Dharmendra Pradhan | 22 दिवसांच्या आंदोलनानंतरही धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
New Delhi Metro | दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?.

उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?

मुंबईत भाजपचं आंदोलन पेटलं, अमित साटम रस्त्यावर, कार्यकर्ते काँग्रेसविरोधात आक्रमक.

मुंबईत भाजपचं आंदोलन पेटलं, अमित साटम रस्त्यावर, कार्यकर्ते काँग्रेसविरोधात आक्रमक

कॉकरोजांच्या निशाण्यावर धर्मेंद्र प्रधान यांची मुलगी, थेट निमिषा प्रधान हिच्या कॉलेजपर्यंत पोहोचले आंदोलन.

कॉकरोजांच्या निशाण्यावर धर्मेंद्र प्रधान यांची मुलगी, थेट निमिषा प्रधान हिच्या कॉलेजपर्यंत पोहोचले आंदोलन

Uddhav Thackeray : अभिजीत दीपकेच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी घेतला अजून एक महत्वाचा निर्णय.

Uddhav Thackeray : अभिजीत दीपकेच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी घेतला अजून एक महत्वाचा निर्णय

VBA Maharashtra Bandh : डावे, बेस्ट संघटना ते कोचिंग क्लासेस, वंचितच्या ‘महाराष्ट्र बंद’ला नेमका कोणाचा पाठिंबा, प्रकाश आंबेडकरांनी A टू Z सांगितलं!.

VBA Maharashtra Bandh : डावे, बेस्ट संघटना ते कोचिंग क्लासेस, वंचितच्या ‘महाराष्ट्र बंद’ला नेमका कोणाचा पाठिंबा, प्रकाश आंबेडकरांनी A टू Z सांगितलं!

49 वर्षांपूर्वी आलेल्या या गाण्याची आजही तूफान क्रेझ, अवघ्या 9 वर्षांच्या मुलीने दिला होता आवाज.

49 वर्षांपूर्वी आलेल्या या गाण्याची आजही तूफान क्रेझ, अवघ्या 9 वर्षांच्या मुलीने दिला होता आवाज