AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Arjun Tendulkar | बाप बाप असतो! अर्जुन तेंडुलकर याच्या आयपीएल डेब्यूनंतर सचिन तेंडुलकर याचं ते ट्विट व्हायरल

सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याने आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून 2 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अखेर कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पदार्पण केलं. लेक अर्जुनच्या डेब्यूनंतर बाप सचिन तेंडुलकर याने खासं ट्विट केलं आहे.

Arjun Tendulkar |  बाप बाप असतो! अर्जुन तेंडुलकर याच्या आयपीएल डेब्यूनंतर सचिन तेंडुलकर याचं ते ट्विट व्हायरल
| Updated on: Apr 16, 2023 | 11:55 PM
Share

मुंबई | तेंडुलकर कुटुंबियांसाठी आजचा दिवस हा ऐतिहासिक ठरला. क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याला गेल्या 2 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अखेर मुंबई इंडियन्सकडून पदार्पणाची संधी मिळाली. अर्जुनने कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यातून आयपीएल कारकीर्दीची सुरुवात केली. अर्जुनने कोलकाताच्या डावातील पहिली ओव्हरही टाकली. अंजली, सचिन आणि सारा या तिघांनी आपल्या लेकाला-भावाला पहिल्या सामन्यात चिअरअप करण्यासाठी हजेरीही लावली. योगायोग म्हणा किंवा आणखी काही, सचिन ज्या स्टेडियममध्ये क्रिकेटचे असंख्य सामने खेळला, जिथे आपला कारकीर्दीतील 200 वा कसोटी सामना खेळला, वर्ल्ड कप जिंकला त्याच स्टेडियममध्ये अर्जुनने आयपीएल पदार्पण केलं. त्यामुळे अर्जुनचं पदार्पण हे सचिनसाठी एक क्रिकेटर आणि बाप म्हणून कायम लक्षात राहिल. अर्जुनच्या या पदार्पणानंतर सचिनने ट्विट केलं आहे.

अर्जुनने आयपीएल पदार्पण करताच अनोखा विक्रमाची नोंद आपल्या नावावर केली आहे. आयपीएलच्या इतिहासात बाप-बेट्याची जोडी खेळल्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे. सचिन तेंडुलकर याने याआधी आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचं प्रतिनिधित्व आणि नेतृत्वही केलं आहे. सचिनने एकूण 78 सामन्यांमध्ये मुंबईचं प्रतिनिधित्व केलं आहे. मुंबई इंडियन्सने पहिल्यांदा 2013 मध्ये आयपीएल ट्रॉफी जिंकली होती. या ऐतिहासिक विजयासह सचिनने आयपीएलला रामराम केला होता. त्यानंतर आता तब्बल 10 वर्षांनी अर्जुन क्रिकेटमध्ये परतला आहे.

सचिन तेंडुलकर काय म्हणाला?

सचिन तेंडुलकर याने लेकाच्या पदार्पणानंतर ट्विट करत मनातील भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे. “अर्जुन, आज तू क्रिकेटपटू म्हणून तुझ्या प्रवासात आणखी एक महत्त्वाचं पाऊल टाकलं आहेस.तुझा वडील या नात्याने, तुमच्यावर प्रेम करणारे आणि खेळाबद्दल उत्कट प्रेम करणारे, मला माहित आहे की तु खेळाला योग्य तो आदर देत राहशील आणि क्रिकेटकडूनही तुला तसाच आदर मिळेल”, अशी आशा सचिनने व्यक्त केली.

“तु इथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. मला खात्री आहे की तु अशीच मेहनत करत राहशील. एका सुंदर प्रवासाची ही सुरुवात आहे. ऑल द बेस्ट”, अशा शब्दात सचिनने लेकाला क्रिकेटमधील नव्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

सचिन तेंडुलकर याचं ट्विट

मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन | सूर्यकुमार यादव (कॅप्टन), इशान किशन, कॅमरन ग्रीन, टिळक वर्मा, नेहल वढेरा, टिम डेविड, अर्जुन तेंडुलकर ऋतिक शौकीन, पियूष चावला, रिले मेरेडिथ आणि ड्वेन जॉनसन.

कोलकाता नाइट रायडर्स प्लेइंग इलेव्हन | नितीश राणा (कर्णधार), रहमानुल्लाह गुरबाज, नारायण जगदीशन, रिंकू सिंह, आंद्रे रसेल, सुनील नरेन, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, लॉकी फर्ग्युसन, वरुण चक्रवर्ती आणि सुयश शर्मा.

Follow Us
मध्यपूर्वेतील युद्धाचा इंधन पुरवठ्यावर परिणाम; ESMA कायदा लागू
मध्यपूर्वेतील युद्धाचा इंधन पुरवठ्यावर परिणाम; ESMA कायदा लागू.
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.