AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2023 Playoff Scenario : चेन्नई आणि मुंबईचा प्लेऑफमधून पत्ता कापू शकतात ‘या’ 2 टीम्स

IPL 2023 Playoff Scenario : सगळ्यांना वाटतय मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्सची टीम प्लेऑफमध्ये आरामात पोहोचेल. पण आयपीएलमधल्या दोन टीम्स मुंबई आणि चेन्नईचा खेळ बिघडवू शकतात.

IPL 2023 Playoff Scenario : चेन्नई आणि मुंबईचा प्लेऑफमधून पत्ता कापू शकतात 'या' 2 टीम्स
mumbai indians
| Updated on: May 16, 2023 | 1:18 PM
Share

मुंबई : हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सची टीम IPL 2023 मध्ये शानदार प्रदर्शन करत आहे. गुजरात टायटन्स प्लेऑफमध्ये क्वालिफाय करणारा पहिला संघ ठरलाय. गुजरात टायटन्सने सोमवारी रात्री सनरायजर्स हैदराबादच्या टीमला 34 धावांनी हरवलं. या विजयासह गुजरातने प्लेऑफसाठी क्वालिफाय केलं. गुजरात टायटन्सनंतर आयपीएलच्या प्लेऑफमध्ये क्वालिफाय करणाऱ्या अन्य 3 टीम्स कुठल्या असणार? त्याची उत्सुक्ता आहे.

IPL 2023 मध्ये दोन टीम्स चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्सचा प्लेऑफमधून पत्ता कापू शकतात. चेन्नई सुपर किंग्सला प्लेऑफमध्ये क्वालिफाय करायच असेल, तर काहीही करुन शेवटचा सामना जिंकावा लागेल. IPL 2023 मध्ये चेन्नई सुपर किंग्सचे 13 मॅचमध्ये 15 पॉइंट्स आहेत.

मुंबईचे शेवटचे दोन सामने कोणाबरोबर ?

तेच मुंबई इंडियन्सचे 12 मॅचमध्ये 14 पॉइंट्स आहेत. चेन्नई सुपर किंग्सला आपला शेवटचा लीग सामना 20 मे रोजी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध खेळायचा आहे. तेच मुंबई इंडियन्सला आपले शेवटचे दोन लीग सामने लखनऊ सुपर जायंट्स आणि सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध खेळायच आहेत.

चेन्नईला जिंकावच लागेल

IPL 2023 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचे 12 मॅचमध्ये 12 पॉइंट आहेत. पंजाब किंग्सचे सुद्धा 12 सामन्यात 12 पॉइंट आहेत. चेन्नई सुपर किंग्स टीमने 20 मे रोजी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध आपला शेवटचा सामना गमावला, तर ते प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर होऊ शकतात. मुंबई इंडियन्सची टीम सुद्धा लखनौ सुपर जायंट्स आणि सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध हरली, तर त्यांची सुद्धा तीच हालत होईल. त्यांचाही प्लेऑफमधून पत्ता कट होऊ शकतो. मुंबई, चेन्नईच्या जागी प्लेऑफमध्ये पोहोचणाऱ्या दोन टीम्स कुठल्या?

रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने आपले शेवटचे दोन सामने जिंकले, तर त्यांचे 14 मॅचमध्ये 16 पॉइंट्स होतील. पंजाब किंग्सने सुद्धा शेवटचे दोन सामने जिंकले, तर त्यांचे सुद्धा 14 सामन्यात 16 पॉइंट्स होतील. अशी स्थितीत 16-16 पॉइंट्ससह पंजाब आणि बँगलोरची टीम प्लेऑफमध्ये पोहोचेल.

Follow Us
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून....
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.