AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CSK vs LSG : चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने पराभवाचं कारण सांगून टाकलं, नेमकं काय आणि कसं झालं ते

आयपीएल स्पर्धेतील 39 व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने चेन्नई सुपर किंग्सचा 6 गडी राखून पराभव केला. मोठी धावसंख्या असल्याने कोणालाही लखनौचा हा विजय कठीण वाटत होता. पण मार्कस स्टोयनिसने ते खरं करून दाखवलं. 211 धावांचा पाठलाग करताना एकट्याने किल्ला लढवला आणि विजय मिळवून दिला.

CSK vs LSG : चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने पराभवाचं कारण सांगून टाकलं, नेमकं काय आणि कसं झालं ते
Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: Apr 24, 2024 | 12:15 AM
Share

आयपीएल 2024 स्पर्धेत मोठी उलटफेर पाहायला मिळाला आहे. चेन्नई सुपर किंग्सला 211 धावा वाचवता आल्या नाही. लखनौ सुपर जायंट्सची सुरुवात निराशाजनक झाली होती. क्विंटन डी कॉकला आपलं खातंही खोलता आलं नाही. कर्णधार केएल राहुलही स्वस्तात बाद झाला होता. असं असूनही मार्कस स्टोयनिसने एकट्याने किल्ला लढवला. चेन्नई सुपर किंग्सने 20 षटकात 4 गडी गमवून 210 धावा केल्या होत्या. तसेच विजयासाठी 211 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान लखनौ सुपर जायंट्सने 4 गडी गमवून 19.3 षटकात पूर्ण केलं. मार्कस स्टोयनिसने 63 चेंडूत 13 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने नाबाद 124 धाावंची खेळी केली. तर निकोलस पूरनने 15 चेंडूत 34 आणि दीपक हूडाने 6 चेंडूत नाबाद 17 धावा ठोकल्या. या पराभवानंतर चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार ऋतुराज गायकवाड निराश दिसला. त्याने सामन्यानंतर पराभवाचं खापर मैदानात पडलेल्या दवबिंदूवर फोडलं.

“हा पराभव पचवणं खरंच खूप कठीण आहे. पण एक चांगला खेळ झाला. लखनौने खरंच चांगली कामगिरी केली. 14 व्या षटकापर्यंत गेम आमच्या हातात होता. पण स्टोयनिस खरंच खूप चांगला खेळला. मैदानात पडलेल्या दवबिंदूंचा आम्हाला सर्वात जास्त फटका बसला. फिरकीपटूंना आम्हाला व्यवस्थित वापरता आलं नाही. तसं नसतं तर आम्ही सामन्यावर पकड मिळवली असती. पण शेवटी हा खेळ आहे आपल्या हातात काहीच नसतं.”, असं चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार ऋतुराज गायकवाड म्हणाला.

“रवींद्र जडेजा चौथ्या क्रमांकावर आला होता. आमचं ठरलं होतं की पॉवर प्लेनंतर विकेट पडली तर शिवम फलंदाजीला येईल. कारण फलंदाजांना आम्ही नंतर बाहेर पाडण्यास भाग पाडू शकत नाही. खरं सांगायचं तर आम्ही दिलेलं टार्गेट पुरेसं नव्हतं. आम्ही सराव करताना दव अनुभवलं आहे. त्यामुळे त्यांनी घेतलेला निर्णय योग्य होता. या विजयाचं श्रेय पूर्णपणे त्यांच्या फलंदाजीला जातं.”, असं कर्णधार ऋतुराज गायकवाड पुढे म्हणाला.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): अजिंक्य रहाणे, रुतुराज गायकवाड (कर्णधार), डॅरिल मिशेल, मोईन अली, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (विकेटकीपर), दीपक चहर, तुषार देशपांडे, मुस्तफिजुर रहमान, मथीशा पाथीराना.

लखनौ सुपर जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): क्विंटन डी कॉक, केएल राहुल (विकेटकीपर/कर्णधार), मार्कस स्टॉइनिस, दीपक हुडा, निकोलस पूरन, आयुष बडोनी, कृणाल पंड्या, मॅट हेन्री, रवी बिश्नोई, मोहसिन खान, यश ठाकूर.

मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा.
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार.
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा.
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का.
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा...
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा....
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी.
पंकजा मुंडे यांना मोठा झटका, बीड धारुरमध्ये भाजपचे सर्व उमेदवार हरले
पंकजा मुंडे यांना मोठा झटका, बीड धारुरमध्ये भाजपचे सर्व उमेदवार हरले.
30 वर्षांचा वनवास संपला अन् विकास कामांचा... सरोज अहिरेंची प्रतिक्रिया
30 वर्षांचा वनवास संपला अन् विकास कामांचा... सरोज अहिरेंची प्रतिक्रिया.
शिंदे सेनेचे मंत्री गुलाबराव पाटलांना मोठा धक्का, जळगावात मविआचा विजय
शिंदे सेनेचे मंत्री गुलाबराव पाटलांना मोठा धक्का, जळगावात मविआचा विजय.
काय तो विजय... सगळं कसं ओक्के! शहाजीबापू पाटलांनी सांगोल्यात राखला गड
काय तो विजय... सगळं कसं ओक्के! शहाजीबापू पाटलांनी सांगोल्यात राखला गड.