AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2024 : गुजरात टायटन्सचं प्लेऑफचं स्वप्न पावसात गेलं वाहून, कोणाला फायदा? वाचा

आयपीएल 2024 स्पर्धेतील 63 वा सामना गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होता. हा सामना पावसामुळे रद्द झाला. त्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण देण्यात आला. पण यामुळे गुजरात टायटन्सचं प्लेऑफचं स्वप्न भंगलं.

IPL 2024 : गुजरात टायटन्सचं प्लेऑफचं स्वप्न पावसात गेलं वाहून, कोणाला फायदा? वाचा
Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: May 13, 2024 | 10:43 PM
Share

आयपीएल 2024 स्पर्धेतून गुजरात टायटन्सचं प्लेऑफचं स्वप्न भंगलं आहे. पावसामुळे गुजरातचं प्लेऑफचं गणित फिस्कटलं. गुजरातचे साखळी फेरीत दोन सामने शिल्लक होते. त्यामुळे 14 गुण कमवण्याची संधी होती. कोलकाता आणि सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध सामना होता. मात्र कोलकात्याविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. यामुळे प्लेऑफचं स्वप्न भंगलं आहे. हा सामना रद्द केल्याने कोलकाता आणि गुजरातला प्रत्येकी एक गुण देण्यात आला आहे. त्यामुळे पुढचा सामना गुजरातने जिंकला तरी 13 गुण होतील. तर टॉप चारमध्ये असलेल्या संघांचे 14 पेक्षा जास्त गुण आहेत. त्यामुळे मुंबई इंडियन्स, पंजाबनंतर स्पर्धेतून बाद होणारा गुजरात टायटन्स हा तिसरा संघ आहे. कोलकात्याने आधीच प्लेऑफमध्ये स्थान पक्कं केलं आहे. एक गुण मिळाल्याने टॉप 2 मधलं स्थान आता आणखी घट्ट झालं आहे. कोलकात्याला प्लेऑफमध्ये दोन संधी मिळतील. तर उर्वरित तीन संघांसाठी सहा संघांमध्ये चुरस आहे.

राजस्थान रॉयल्स संघाचंही प्लेऑफचं तसं पक्कं आहे. पण एक सामना जिंकला की पात्र ठरणारा दुसरा संघ ठरेल. तर सनरायझर्स हैदराबादचे दोन सामने शिल्लक आहेत. सध्या हैदराबादचा संघ चौथ्या स्थानी असून 14 गुण आहेत. त्यामुळे हैदराबादला 18 गुण करण्याची संधी आहे. तर चेन्नई सुपर किंग्स 14 गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे. चेन्नईचा फक्त एकच सामना शिल्लक असून आरसीबीसोबत आहे. या सामन्यात बंगळुरुने बाजी मारली तर मग चेन्नईचं कठीण होईल. हा सामना बंगळुरुने 18 किंवा त्याहून अधिक धावांनी जिंकावा. तसेच दिलेलं आव्हान 18.1 षटकात पूर्ण केलं तर बंगळुरु प्लेऑफमध्ये पोहोचू शकतो.

दुसरीकडे दिल्ली कॅपिटल्सचा एक सामना शिल्क आहे. दिल्लीला सुद्धा 14 करण्याची संधी आहे. पण दिल्ली कॅपिटल्सचा नेट रनरेट खूपच कमी आहे. त्यामुळे एका सामन्यात कव्हर करणं खूपच कठीण आहे. लखनौ सुपर जायंट्सचे दोन सामने शिल्लक आहेत. दोन्ही सामने जिंकल्यास लखनौला प्लेऑफमध्ये खेळण्याची संधी मिळेल. पण दोनपैकी एक सामना गमवल्यास कठीण होईल. कारण लखनौचा नेट रनरेट खूपच कमी आहे.

Follow Us
पहिला वार करायचा असेल तर माझ्यावर करा', लांडगेंना सुळेंचं थेट आव्हान
Supriya Sule on Mahesh Landge :पहिला वार करायचा असेल तर माझ्यावर करा', लांडगेंना सुळेंचं थेट आव्हान
CM फडणवीसांचा जेन-झींशी संवाद, क्रिकेटपटू तिलक वर्मासह 10 हजार...
Devendra Fadnavis : CM फडणवीसांचा जेन-झींशी संवाद, क्रिकेटपटू तिलक वर्मासह 10 हजारांहून अधिक तरुणांची उपस्थिती
भाजप आमदार संजय उपाध्याय यांची मोठी घोषणा! गणेशोत्सवासाठी कोकण...
भाजप आमदार संजय उपाध्याय यांची मोठी घोषणा! यंदाही गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना मोफत बससेवा
राष्ट्रवादीचा अखेरचा पत्ता उलगडणार? कोअर कमिटीची महत्त्वाची बैठक
राष्ट्रावादी अखेरचा पत्ता उलगडणार? एकाच आठवड्यात सलग बैठका, विलिनिकरणाबाबत....
आयकर विभागाची मोठी कारवाई! 16 नामांकित कंपन्यावर गुन्हा दाखल
आयकर विभागाची मोठी कारवाई! तब्बल 2143 कोटी... 16 नामांकित कंपन्यावर गुन्हा दाखल
तुकाराम मुंढेंच्या भीतीने जुनी परंपरा मोडली! पुण्यातील सुप्रिसिद्ध...
तुकाराम मुंढेंच्या भीतीने जुनी परंपरा मोडली! बऱ्याच काळापासूनची पुण्यातील प्रसिद्ध खाऊगल्ली बंद?
'सातारा जिल्हा बँकेची निवडणूक भाजप स्वबळावर लढणार' गोरेंचं विधान
सातारा जिल्हा बँकेची निवडणूक भाजप स्वबळावर लढणार- जयकुमार गोरे
उत्पादन घट आणि वाहतूक खर्च वाढल्याने सुकामेवा महागला...
उत्पादन घट आणि वाहतूक खर्च वाढल्याने सुकामेवा महागला; बदाम, पिस्त्याच्या दरात ३०० रुपयांपर्यंत वाढ
भोरमध्ये पुणे ट्रान्समिशन थ्री प्रकल्पाविरोधात शेतकऱ्यांचा रास्ता रोको
भोरमध्ये पुणे ट्रान्समिशन थ्री प्रकल्पाविरोधात शेतकऱ्यांचा रास्ता रोको
मनोज जरांगे पाटील यांची जालन्यात 130 गावांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांची जालन्यात 130 गावांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा