AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2024, Playoff : प्लेऑफमध्ये आरसीबीचा संघ कसा पोहोचणार? जाणून घ्या उर्वरित सामन्यांचं गणित

आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स हे दोनच संघ अधिकृरित्या स्पर्धेबाहेर पडले आहेत. तर कोलकाता आणि राजस्थानचं स्थान जवळपास पक्कं आहे. या व्यतिरिक्त इतर सहा संघांना प्लेऑफची संधी आहे. सहा पैकी दोन संघ प्लेऑफमध्ये स्थान मिळवू शकतात.

IPL 2024, Playoff : प्लेऑफमध्ये आरसीबीचा संघ कसा पोहोचणार? जाणून घ्या उर्वरित सामन्यांचं गणित
| Updated on: May 11, 2024 | 5:36 PM
Share

आयपीएल 2024 स्पर्धेत प्लेऑफसाठी आता जोरदार रस्सीखेच सुरु झाली आहे. प्लेऑफसाठी तंगड्या एकमेकांमध्ये अडकल्या आहेत असं म्हणालं वावगं ठरणार नाही. सहा संघांना प्लेऑफमध्ये खेळण्याची संधी आहे. पण आता आपण सातव्या क्रमांकावर असलेल्या विराट कोहलीच्या आरसीबीचा विचार करणार आहोत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 14 पैकी 12 सामने खेळले आहेत. त्यापैकी 7 सामन्यात पराभव, तर 5 सामन्यात विजय मिळवला आहे. आरसीबीचे 10 गुण असून गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहे. म्हणजेच प्लेऑफमध्ये संधी मिळवण्यासाठी तीन संघांना मागे टाकावं लागेल. तरच टॉप 4 मध्ये स्थान मिळू शकतं. कोलकाता आणि राजस्थानचं गणित आरसीबीला लागू पडत नाही. तर मुंबई आणि पंजाबचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. त्यामुळे उर्वरित संघांपैकी हैदराबाद, चेन्नई, दिल्ली, लखनौ आणि गुजरात या संघांची कामगिरी महत्त्वाची आहे.

आरसीबीचे पुढचे दोन सामने दिल्ली आणि चेन्नई सुपर किंग्ससोबत आहेत. हे दोन्ही सामने काहीही करून आरसीबीला जिंकायचे आहेत. एका सामन्यात पराभव झाला की आव्हान संपुष्टात येईल. म्हणजेच आरसीबीचे दोन सामने जिंकले की 14 गुण होतील. तर दिल्ली आणि चेन्नईला पराभूत केली त्यांची वाट बिकट होईल.

सनरायझर्स हैदराबाद 14 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. उर्वरित सामने गुजरात आणि पंजाबशी आहेत. हे दोन्ही सामने गमवल्यास आरसीबीला नेट रनरेटच्या आधारे संधी मिळू शकते. कारण दोघांचे समान 14 गुण होतील. पण एका सामन्यात विजय मिळवला तर प्लेऑफमध्ये स्थान मिळवणारा तिसरा संघ ठरेल. हैदराबादने विजय मिळवलाच तर तो गुजरात विरुद्ध मिळवला तर आरसीबीला सर्वाधिक फायदा होईल.

चेन्नई सुपर किंग्स संघ 12 गुणांसह चौथ्या स्थानी आहे. दोनपैकी एक सामना आरसीबीसोबत आहे. तर दुसरा सामना राजस्थानसोबत आहे. आरसीबीच्या दृष्टीने विचार करायचा तर या दोन्ही सामन्यात चेन्नईने पराभूत होणं फायद्याचं आहे. आरसीबीने पराभूत केलं आणि राजस्थान हरलं तर मात्र गणित नेट रनरेटवर येईल.

दिल्ली कॅपिटल्सचंही चेन्नईसारखंच आहे. एक सामना आरसीबी आणि दुसरा सामना लखनौ सुपर जायंट्ससोबत आहे. आरसीबीच्या दृष्टीने हा दिल्लीला पराभूत केलं पाहीजे. पण दिल्ली आणि लखनौ सामन्यात दोघंही प्लेऑफच्या रेसमध्ये आहे. यात आरसीबीपेक्षा नेट रनरेट कमी असलेला संघ जिंकला तर फायदेशीर ठरेल.

लखनौ सुपर जायंट्सचे पुढील सामने दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्ससोबत आहे. वरील गणिताप्रमाणे दिल्ली आणि लखनौपैकी आरसीबीपेक्षा नेट रनरेट कमी असलेला संघ जिंकावा. तर मुंबई इंडियन्सने काहीही करून लखनौला पराभूत करणं गरजेचं आहे.

गुजरात टायटन्सचा पुढील सामना कोलकाता आणि सनरायझर्स हैदारबाद सोबत आहे. हे दोन्ही सामन्यापैकी कोलकात्याने गुजरातला पराभूत करावं. त्यामुळे हा संघ रेसमधून बाहेर पडेल. तर गुजरातने हैदराबादला पराभूत केल्यास आरसीबीला संधी मिळेल.

Follow Us
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील.
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?.
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद...
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद....
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी.
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?.
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?.
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे.
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद.
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये...
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये....
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप.