AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2024 : हे संघ जिंकले तर आरसीबी, चेन्नई सुपर किंग्सचं आव्हान येणार संपुष्टात; जाणून घ्या संपूर्ण समीकरण

आयपीएल 2024 स्पर्धेत प्रत्येक सामन्यानंतर प्लेऑफचं चित्र बदलताना दिसत आहे. आतापर्यंत साखळी फेरीतील 62 सामने पार पडले असून 63वा सामना गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होत आहे. तत्पूर्वी गुणतालिकेत कोलकात्यानेच क्वॉलिफाय केलं आहे. तर इतर संघांचं अजूनही काही निश्चित झालेलं नाही.

IPL 2024 : हे संघ जिंकले तर आरसीबी, चेन्नई सुपर किंग्सचं आव्हान येणार संपुष्टात; जाणून घ्या संपूर्ण समीकरण
| Updated on: May 13, 2024 | 2:49 PM
Share

आयपीएल 2024 स्पर्धेत प्लेऑफसाठी कोलकाता नाईट रायडर्सने क्वॉलिफाय केलं आहे. दुसरीकडे, राजस्थान रॉयल्स हा संघ 16 गुणांसह प्लेऑफच्या वेशीवर आहे. असं असताना सहा संघांमध्ये उर्वरीत दोन जागांसाठी खऱ्या अर्थाने चुरस आहे. प्लेऑफमध्ये पात्र होण्यासाठी सर्वाधिक मोठी संधी राजस्थान रॉयल्सकडे आहे. दोन पैकी एका सामन्यात विजय मिळवला की प्लेऑफचं तिकीट पक्कं होईल. दुसरीकडे, सनरायझर्स हैदराबादकडे तितकीच संधी आहे. उर्वरित दोन पैकी दोन सामन्यात विजय मिळवल्यास प्लेऑफचा मार्ग मोकळा होईल. आता चौथ्या जागेसाठी बराच संघर्ष पाहायला मिळणार आहे. चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात सामना होणार आहे. या सामन्यात विजयी संघ प्लेऑफच्या शर्यतीत राहील. त्याचबरोबर दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांचेही 12 गुण आहेत. तर गुजरात टायटन्सचे 10 गुण प्लेऑफच्या शर्यतीत आहे. मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स अधिकृतरित्या प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले आहे.

सनरायझर्स हैदराबाद आणि लखनौ सुपर जायंट्स यांचे प्रत्येकी दोन सामने शिल्लक आहेत. या दोन सामन्यात दोन्ही संघांना 16 गुण कमवण्याची संधी आहे. कोलकात्यानंतर राजस्थान रॉयल्सने एका सामन्यात विजय मिळवला तर 18 गुणांसह प्लेऑफमध्ये पोहोचेल. तर सनरायझर्स हैदराबाद आणि लखनौ सुपर जायंट्स 16 गुणांसह तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर राहू शकतात. सनरायझर्स हैदराबादचा पुढील सामना गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्सशी होणार आहे. तर लखनौ सुपर जायंट्सचा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्सशी होणार आहे.

सनरायझर्स हैदराबाद आणि लखनौ सुपर जायंट्सने पुढील दोन्ही सामने जिंकले तर आरसीबी प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडेल. म्हणजेच आरसीबीला पुढचा सामना जिंकूनही या दोन संघांच्या कामगिरीवर लक्ष ठेवावं लागेल. दुसरीकडे, चेन्नई सुपर किंग्सने हा सामना जिंकला तर 16 गुण होतील. मात्र मग सर्वकाही नेट रनरेटवर येऊन थांबेल. त्यामुळे हैदराबाद आणि लखनौ यांच्या सामन्यांच्या निकालावर आरसीबी विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामन्याचं महत्त्व असणार आहे. हैदराबाद आणि लखनौ पुढच्या सामन्यात मोठ्या फरकाने विजय मिळवला तर आरसीबीसोबत चेन्नई सुपर किंग्सला बाहेर पडावं लागेल.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.