AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2024 : मुंबईच्या स्थितीवर मौन सोडलं, रोहित शर्मा अखेर बोललाच

Rohit Sharma Mumbai Indians Ipl 2024 : मुंबई इंडियन्सची आयपीएलच्या 17 व्या मोसमातील आतापर्यंतची कामगिरी ही त्यांच्या लौकीकाला शोभणारी नाही. मुंबईच्या या अवस्थेबाबत रोहित शर्मा याने प्रतिक्रिया दिलीय.

IPL 2024 : मुंबईच्या स्थितीवर मौन सोडलं, रोहित शर्मा अखेर बोललाच
| Updated on: Apr 18, 2024 | 7:42 PM
Share

आयपीएलच्या इतिहासात 5 वेळा चॅम्पियन ठरलेल्या मुंबई इंडियन्सची 17 व्या मोसमातही निराशाजनक सुरुवात झाली. मुंबई इंडियन्स 2012 पासून ते आतापर्यंत आपला सलामीचा सामना जिंकण्यात अपयशी ठरली. रोहित शर्मा याच्याकडे असलेली कॅप्टन्सी काढून हार्दिक पंड्या याला नेतृत्वाची जबाबदारी दिली. मात्र हार्दिकलाही मुंबईला आपल्या नेतृ्त्वात विजयी सुरुवात करुन देता आली नाही. मुंबईच्या या मोसमातील कामगिरीबाबत मुंबईचा माजी कर्णधार रोहित शर्मा याने मौन सोडलं आहे. क्लब प्रेयरी फायर पॉडकास्टमध्ये रोहितने मुंबईच्या संथ सुरुवातीचं प्रमुख कारण सांगितलं. तसेच रोहितने मुंबईसह कर्णधार म्हणून प्रवास कसा राहिला, हे सुद्धा सांगितलं.

मुंबई इंडियन्सची गेल्या काही वर्षात अशीच स्थिती राहिली असल्याचं रोहित शर्माने म्हटलं. आम्ही हंगामातील सुरुवात फार संथ केलीय, पण स्पर्धा पुढे जाता असताना समीकरणंही बदलली. माझ्या हिशोबाने हे तेव्हाच घडतं जेव्हा टीममध्ये नवे खेळाडू असताता. गेल्या 10 वर्षात टीमचा कर्णधार कायम होता. गेल्या काही वर्षात बदल झाले. ज्यामुळे खेळावर परिणाम झाला.

रोहितनुसार कर्णधार असताना तो एका माईंडसेटने गेम करायचा. या दरम्यान त्याने इतरांचे विचार लक्षात घेतले. मला माहितीय की आयपीएलमध्ये कशाप्रकारे खेळलं जातं आणि टीमला यशस्वी करण्यासाठी काय आवश्यक आहे, असं रोहित म्हणाला. याच कारणांमुळे काही गोष्टी साध्य करण्यासाठी वेळ लागतो.

रोहितने एक बाब स्पष्ट केली की टीममध्ये विदेशी खेळाडूंसह भारतीय खेळाडूही आहेत. मला यापेक्षा जास्त वानखेडे स्टेडियमबाबत माहिती आहे, कारण मी माझ्या क्रिकेट कारकीर्दीची सुरुवातच इथून केलीय. मी इथेच वाढलोय. त्यामुळे मला माहितीय की विकेट कशी आहे आणि स्थितीनुसार काय करायचंय.

दरम्यान रोहित शर्माने मुंबई इंडियन्सचं 2013 ते 2023 पर्यंत नेतृत्व केलं. रोहितने या दरम्यान मुंबईला आपल्या कॅप्टन्सीत एकूण 5 वेळा आयपीएल चॅम्पियन केलं. रोहितने आपल्या कॅप्टन्सीत मुंबईला 2013, 2015, 2017, 2019 आणि 2022 साली ट्रॉफी जिंकून दिली.

मुंबई इंडियन्स टीम : हार्दिक पंड्या (कॅप्टन), रोहित शर्मा, टीम डेव्हिड, इशान किशन, विष्णू विनोद, नेहल वढेरा, सूर्यकुमार यादव, देवाल्ड ब्रेविस, पियुष चावला, श्रेयस गोपाल, अंशुल कंबोज, मोहम्मद नबी, शम्स मुलानी, रोमॅरियो शेफर्ड, तिलक वर्मा, जसप्रीत बुमराह, जेराल्ड कोएत्झी, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल, अर्जुन तेंडुलकर, नुवान तुषारा, नमन धीर, शिवालिक शर्मा, ल्यूक वुड आणि क्वेना माफाका.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.