AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Retirement | ‘माझ्यातही रोहित आणि विराट इतकीच क्षमता पण धोनीने…’; तगड्या खेळाडूचा निवृत्ती घेत माहीवर गंभीर आरोप

फेब्रुवारी महिन्यात बड्या खेळाडूंनी क्रिकेटला रामराम ठोकलाय. चार खेळाडूंनी निवृत्तीचा निर्णय घेतला असताना आता पाचव्या खेळाडूनेही निवृत्तीचा निर्णय घेतलाय. इतकंच नाहीतर या खेळाडूने धोनीवर गंभीर आरोप केलेत.

Retirement | 'माझ्यातही रोहित आणि विराट इतकीच क्षमता पण धोनीने...'; तगड्या खेळाडूचा निवृत्ती घेत माहीवर गंभीर आरोप
| Updated on: Feb 20, 2024 | 7:39 PM
Share

मुंबई : टीम इंडियाच्या आणखी एका खेळाडूने निवृत्तीची घोषणा केलीये. या खेळाडूने निवृत्ती जाहीर करताना टीम इंडियाचा माजी आणि सर्वात यशस्वी ठरलेला कर्णधार महेंद्र सिंह धोनी याच्यावर गंभीर आरोप केलेत. धोनीने आपल्याला संघात स्थान दिलं नाही. मीपण आज विराट कोहली आणि रोहित शर्मसारखा तगडा खेळाडू असतो, असं म्हणत या खेळाडूने धोनीवर निशाणा साधला आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये केलेल्या चमकदार कामगिरीनंतरही त्याला संघात जागा मिळाली नाही. कोण आहे हा खेळाडू जाणून घ्या.

कोण आहे हा खेळाडू?

हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून मनोज तिवारी आहे. मनोज तिवारी याने फेसबुकवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याने धोनीवर गंभीर आरोप केला आहे. कोलकातामधील स्पोर्ट्स जर्नलिस्ट क्लबमध्ये सत्कार समारंभावेळी त्याने पत्रकारांशी संवाद साधताना हा सवाल केला आहे.

मनोज तिवारी याने 2011 मध्ये वेस्ट इंडिजविरूद्ध नाबाद 104 धावांची दमदार खेळी केली होती. 12 वन डे सामन्यांमध्ये मनोज तिवारी याने 287 धावा केल्या होत्या. माझ्यात रोहित शर्मा आणि विराट कोहली यांसारख्या खेळाडूंप्रमाणे प्रतिभा होती. माझ्यात हिरो बनण्याची तेवढी क्षमता होती. आज जेव्हा तरूण खेळाडूंना संधी दिली जाते तेव्हा मला दु:ख होत असल्याचं मनोज तिवारी याने म्हटलं आहे.

वरूण अॅरोन, सौरभ तिवारी फैज फजल, धवल कुलकर्णी यांनीही निवृत्तीची घोषणा केली आहे. मनोज तिवारी हा पाचवा खेळाडू आहे ज्याने निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. याआधीही मनोज कुमार याने निवृत्ती जाहीर केली होती. मात्र त्याने परत एकदा क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला होता. आता परत एकदा मनोजने क्रिकेटला अलविद म्हटलं आहे.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.