AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वैभव सूर्यवंशीमुळं अभिषेक शर्माचं करिअर संपणार, पाकिस्तानी क्रिकेटरच्या विधानामुळे आता नवा वाद; बोलून गेला असं काही की…

अवघ्या 15 वर्षांचा दिग्गज क्रिकेटर वैभव सूर्यवंशी याची आयपीएलमधील फलंदाजी पाहून अेकजण चकित झाले आहेत. त्याने अवघ्या 4 सामन्यांत 200 धावा केल्या आहेत. आता एका पाकिस्तानी माजी क्रिकेटरने त्याच्याविषयी केलेलं एक विधान जगभरात चर्चेत आलं आहे.

वैभव सूर्यवंशीमुळं अभिषेक शर्माचं करिअर संपणार, पाकिस्तानी क्रिकेटरच्या विधानामुळे आता नवा वाद; बोलून गेला असं काही की...
vaibhav suryavanshi and tariq ahmedImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 12, 2026 | 3:09 PM
Share

Vaibhav Suryavanshi Controversy : यंदाच्या आयपीएलमध्ये 15 वर्षांचा वैभव सूर्यवंशी सगळीकडे चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. तो मैदावर बॅट घेऊन आला की धावांचा पाऊसच पडतो. त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाविरोधात फक्त 26 चेंडूमध्ये 78 धावा केल्या होत्या. त्याची ही खेळी पाहून अनेकजण थक्क झाले. त्यामुळे त्याा लवकरात लवकर भारतीय क्रिकेट संघात स्थान द्यावे, अशी मागणी क्रिकेटच्या चाहत्यांकडून केली जात आहे. दरम्यान, आता एका पाकिस्तानी माजी क्रिकेटपटूने एक अजब विधान केले आहे. वैभव सूर्यवंशीमुळे इतर काही खेळाडूंना लोक विसरून जातील, असं तो म्हणाला आहे.

वैभव सूर्यवंशीचे तोंडभरून कौतुक

पाकिस्तानाच वेगवान गोलंदाज तनवीर अहमद यांनी वैभव सूर्यवंशीच्या फलंदाजीविषयी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या या प्रतिक्रियेमुळे आता नव्या चर्चेला हवा मिळाली आहे. त्यांनी वैभव सूर्यवंशीचे तोंडभरून कौतुक केले आहे. वैभव सूर्यवंशी आगामी काळात अभिषेक शर्मा यासारख्या खेळाडूंना मागे टाकेल, अशा आशयाचे विधान तनवीर अहमद यांनी केले आहे. वैभव सूर्यवंशी जेव्हा भारतीय संघाकडून खेळेल तेव्हा त्याच्या खेळण्याची पद्धतच त्याला सगळ्यांपेक्षा वेगळं बनवेल, असंही मत त्यांनी व्यक्त केलं.

ते दोघेही फलंदाजी करत असतील तर…

‘वैभव सूर्यवंशी जेव्हा भारताकडून खेळेल तेव्हा लोक अभिषेक शर्माला विसरून जातील. जेव्हा हे दोघेही सोबत फलंदाजी करतील तर अभिषेक शर्मा वैभव सूर्यवंशीच्या आसपासही नसेल. लोक वैभव सूर्यवंशीच्या खेळावर एवढे प्रभावित होतील की लोक अभिषेक शर्मा मैदानात खेळतोय हे विसरूनही जातील,’ असेही विधान अहमद यांनी केले.

चार सामन्यांत 200 पेक्षा जास्त धावा

दरम्यान, कोणताही वाद होऊ नये म्हणून त्यांनी नंतर एखादा खेळाडू एवढा जास्त काळा यशस्वी ठरेल, याबाबत अंदाज लावणेही तसे मुश्कील आहे, असेही म्हटले. दरम्यान, वैभव सूर्यवंशीने अवघ्या चार सामन्यांत 200 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. आरसीबीविरोधात खेळताना त्याने अवघ्या 26 चेंडूंमध्ये 78 धावा केल्या होत्या. राजस्थान रॉयल्स या संघातील त्याचे स्थान खूपच बळकट झाले आहे. त्यामुळे आगामी सामन्यांत तो काय कमाल करणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
सामान्यांच्या खिश्याला कात्री! 15 दिवसांत चौथ्यांदा इंधनाच्या दरात वाढ
सामान्यांच्या खिश्याला कात्री! 15 दिवसांत चौथ्यांदा इंधनाच्या दरात वाढ.
भाजीपाला घेऊन परतताना काळाचा घाला! भाजी विक्रेत्यांची बोट गंगा नदीत...
भाजीपाला घेऊन परतताना काळाचा घाला! भाजी विक्रेत्यांची बोट गंगा नदीत....
आर या पार? मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे आज मोठी घोषणा करणार
आर या पार? मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे आज मोठी घोषणा करणार.
उकाड्याने मुंबई बेहाल; नागरिक घामाघूम, मान्सूनचा पत्ता नाही....
उकाड्याने मुंबई बेहाल; नागरिक घामाघूम, मान्सूनचा पत्ता नाही.....
कांद्यावर दिल्ली दरबारात मोठा फैसला! अमित शाहांचा 10 लाख टन खरेदीला...
कांद्यावर दिल्ली दरबारात मोठा फैसला! अमित शाहांचा 10 लाख टन खरेदीला....
आयटी कंपनीनंतर आता मुंबईच्या नामांकित बँकेत धर्मपरिवर्तन? पतीचा...
आयटी कंपनीनंतर आता मुंबईच्या नामांकित बँकेत धर्मपरिवर्तन? पतीचा....
शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी खूश खबर... अखेर कांदा प्रश्नावर तोडगा निघणार
शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी खूश खबर... अखेर कांदा प्रश्नावर तोडगा निघणार.
कोणाला सुगावा लागू नये म्हणून चक्क... कसून चौकशी केल्यानंतर तेजस शाह..
कोणाला सुगावा लागू नये म्हणून चक्क... कसून चौकशी केल्यानंतर तेजस शाह...
पंतप्रधान मोदींवर सपकाळांची जहरी टीका; पनोती वक्तव्याने महाराष्ट्रात..
पंतप्रधान मोदींवर सपकाळांची जहरी टीका; पनोती वक्तव्याने महाराष्ट्रात...
EDच्या कारवाईनंतर CPI(M) कार्यकर्ते आक्रमक; अधिकाऱ्यांच्या गाड्यांवर..
EDच्या कारवाईनंतर CPI(M) कार्यकर्ते आक्रमक; अधिकाऱ्यांच्या गाड्यांवर...