AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वैभव सूर्यवंशीमुळं अभिषेक शर्माचं करिअर संपणार, पाकिस्तानी क्रिकेटरच्या विधानामुळे आता नवा वाद; बोलून गेला असं काही की…

अवघ्या 15 वर्षांचा दिग्गज क्रिकेटर वैभव सूर्यवंशी याची आयपीएलमधील फलंदाजी पाहून अेकजण चकित झाले आहेत. त्याने अवघ्या 4 सामन्यांत 200 धावा केल्या आहेत. आता एका पाकिस्तानी माजी क्रिकेटरने त्याच्याविषयी केलेलं एक विधान जगभरात चर्चेत आलं आहे.

वैभव सूर्यवंशीमुळं अभिषेक शर्माचं करिअर संपणार, पाकिस्तानी क्रिकेटरच्या विधानामुळे आता नवा वाद; बोलून गेला असं काही की...
vaibhav suryavanshi and tariq ahmedImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 12, 2026 | 3:09 PM
Share

Vaibhav Suryavanshi Controversy : यंदाच्या आयपीएलमध्ये 15 वर्षांचा वैभव सूर्यवंशी सगळीकडे चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. तो मैदावर बॅट घेऊन आला की धावांचा पाऊसच पडतो. त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाविरोधात फक्त 26 चेंडूमध्ये 78 धावा केल्या होत्या. त्याची ही खेळी पाहून अनेकजण थक्क झाले. त्यामुळे त्याा लवकरात लवकर भारतीय क्रिकेट संघात स्थान द्यावे, अशी मागणी क्रिकेटच्या चाहत्यांकडून केली जात आहे. दरम्यान, आता एका पाकिस्तानी माजी क्रिकेटपटूने एक अजब विधान केले आहे. वैभव सूर्यवंशीमुळे इतर काही खेळाडूंना लोक विसरून जातील, असं तो म्हणाला आहे.

वैभव सूर्यवंशीचे तोंडभरून कौतुक

पाकिस्तानाच वेगवान गोलंदाज तनवीर अहमद यांनी वैभव सूर्यवंशीच्या फलंदाजीविषयी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या या प्रतिक्रियेमुळे आता नव्या चर्चेला हवा मिळाली आहे. त्यांनी वैभव सूर्यवंशीचे तोंडभरून कौतुक केले आहे. वैभव सूर्यवंशी आगामी काळात अभिषेक शर्मा यासारख्या खेळाडूंना मागे टाकेल, अशा आशयाचे विधान तनवीर अहमद यांनी केले आहे. वैभव सूर्यवंशी जेव्हा भारतीय संघाकडून खेळेल तेव्हा त्याच्या खेळण्याची पद्धतच त्याला सगळ्यांपेक्षा वेगळं बनवेल, असंही मत त्यांनी व्यक्त केलं.

ते दोघेही फलंदाजी करत असतील तर…

‘वैभव सूर्यवंशी जेव्हा भारताकडून खेळेल तेव्हा लोक अभिषेक शर्माला विसरून जातील. जेव्हा हे दोघेही सोबत फलंदाजी करतील तर अभिषेक शर्मा वैभव सूर्यवंशीच्या आसपासही नसेल. लोक वैभव सूर्यवंशीच्या खेळावर एवढे प्रभावित होतील की लोक अभिषेक शर्मा मैदानात खेळतोय हे विसरूनही जातील,’ असेही विधान अहमद यांनी केले.

चार सामन्यांत 200 पेक्षा जास्त धावा

दरम्यान, कोणताही वाद होऊ नये म्हणून त्यांनी नंतर एखादा खेळाडू एवढा जास्त काळा यशस्वी ठरेल, याबाबत अंदाज लावणेही तसे मुश्कील आहे, असेही म्हटले. दरम्यान, वैभव सूर्यवंशीने अवघ्या चार सामन्यांत 200 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. आरसीबीविरोधात खेळताना त्याने अवघ्या 26 चेंडूंमध्ये 78 धावा केल्या होत्या. राजस्थान रॉयल्स या संघातील त्याचे स्थान खूपच बळकट झाले आहे. त्यामुळे आगामी सामन्यांत तो काय कमाल करणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
आशा भोसले यांना अशोक सराफ यांनी वाहिली आदरांजली, म्हणाले त्यांचा आवाज
आशा भोसले यांना अशोक सराफ यांनी वाहिली आदरांजली, म्हणाले त्यांचा आवाज.
सुरांचा अमर आवाज हरपला... आशा भोसलेंच्या निधनावर देवेंद्र फडणवीसांचं भ
सुरांचा अमर आवाज हरपला... आशा भोसलेंच्या निधनावर देवेंद्र फडणवीसांचं भ.
संगीत क्षेत्रातला जादूई स्वर हरपला! ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं निध
संगीत क्षेत्रातला जादूई स्वर हरपला! ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं निध.
संजय राऊतांनी केले पाकिस्तानचे कौतुक, नेमकं काय म्हणाले? पाहा
संजय राऊतांनी केले पाकिस्तानचे कौतुक, नेमकं काय म्हणाले? पाहा.
मुंबईसह उपनगरात CNG च्या किमती वधारल्या, किती रुपयांवर पोहोचले दर?
मुंबईसह उपनगरात CNG च्या किमती वधारल्या, किती रुपयांवर पोहोचले दर?.
नाशिकमध्ये महिलांशी गैरवर्तन करणाऱ्या संशयितांचे मोबाईल जप्त, सापडलेल्
नाशिकमध्ये महिलांशी गैरवर्तन करणाऱ्या संशयितांचे मोबाईल जप्त, सापडलेल्.
'विभागत महिला नको म्हणून डावललं' मनिषा म्हैसरांचा महायुतीतील मंत्र्याव
'विभागत महिला नको म्हणून डावललं' मनिषा म्हैसरांचा महायुतीतील मंत्र्याव.
इराण- अमेरिकेचं आणखी बिनसलं? इस्लामाबादमधील भेटीत नेमकं काय -काय घडलं?
इराण- अमेरिकेचं आणखी बिनसलं? इस्लामाबादमधील भेटीत नेमकं काय -काय घडलं?.
भारताकडून इराणला मदतीचा हात, वैद्यकीय साहित्याची दुसरी खेप रवाना
भारताकडून इराणला मदतीचा हात, वैद्यकीय साहित्याची दुसरी खेप रवाना.
वारकरी संप्रदायाने बहुजन समाजाला धार्मिक अधिकार दिला - हर्षवर्धन सपकाळ
वारकरी संप्रदायाने बहुजन समाजाला धार्मिक अधिकार दिला - हर्षवर्धन सपकाळ.