AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेआधीच भारताचा सुपर 8 फेरीचा मार्ग सोपा! पाकिस्तानचं गणित बिघडलं

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेसाठी अवघ्या दिवसांचा अवधी शिल्लक आहे. पाकिस्तानने आता नाटकी बॉम्ब टाकला आहे. भारताविरूद्धचा सामना खेळणार नाही अशी माहिती समोर येत आहे. त्यामुळे भारताला फायदा आणि पाकिस्तानला फटका बसला आहे.

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेआधीच भारताचा सुपर 8 फेरीचा मार्ग सोपा! पाकिस्तानचं गणित बिघडलं
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेआधीच भारताचा सुपर 8 फेरीचा मार्ग सोपा! पाकिस्तानचं गणित बिघडलंImage Credit source: Asian Cricket Council
| Updated on: Feb 01, 2026 | 9:03 PM
Share

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेचं यजमानपद भारत आणि श्रीलंकेकडे आहे. त्यामुळे पाकिस्तानला पोटदुखी झाली आहे. काही नाही काही कारणं पुढे करत पाकिस्तान कुरापती करत आहे. आता बांगलादेशवर अत्याचार झाल्याचं कारण पुढे करत भारताविरूद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकल्याचं सांगण्यात येत आहे. खरं तर मल्टीनेशन स्पर्धेतच भारत पाकिस्तान सामने होतात. तसेच दोन्ही देश एकमेकांच्या देशात खेळत नाहीत. त्यामुळे या सामन्यांसाठी तटस्थ ठिकाण निवडलं जातं. त्यामुळेच पाकिस्तानच्या सर्व सामन्यांचं आयोजन श्रीलंकेत केलं आहे. असं असताना पाकिस्तानने नाटकं सुरू केली आहेत. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने सरकार निर्णय घेईल असा पवित्रा घेतला. त्यानंतर सरकारने भारताविरुद्ध खेळू नका असा निर्णय दिल्याचं बोललं जात आहे. म्हणजेच पाकिस्तान भारत वगळून इतर सर्वच देशांसोबत सामने खेळेल. त्यामुळे भारताचा फायदा झालाच आहे. सुंठीवाचून खोकला गेला असंच म्हणावं लागेल.

भारत पाकिस्तानविरुद्ध आशिया कप स्पर्धेत खेळला. त्यावेळी भारताने हँडशेक केलंच नाही. उलट पाकिस्तानला त्यांची जागा दाखवून दिली होती. तसेच पीसीबी अध्यक्ष आणि एशियन क्रिकेट असोसिएशनचे प्रमुखपदी असलेल्या पाकिस्तानी मोहसिन नक्वीच्या हातून ट्रॉफी घेण्यास नकार दिला. त्यामुळे पाकिस्तानची जगभर नाचक्की झाली. इतकंच काय तर मोहसिन नक्वींनी ट्रॉफी चोरून नेली. अद्याप ती भारतीय संघाला मिळाली नाही. खरं तर ती ट्रॉफी मिळाली नाही तरी जेतेपदाचा मान काही जात नाही. उलट पाकिस्तान ट्रॉफी चोर आहे असा ठपका लागला. आता पाकिस्तानने उचलेल्या पावलामुळे भारताला फायदा झाला आहे. भारताची सुपर 8 फेरीतील वाट सोपी झाली आहे.

पाकिस्तानने खरंच भारताविरूद्धचा सामना खेळणार नाही यावर ठाम राहिले तर टीम इंडियाचा फायदा आहे. भारताच्या खात्यात फुकटचे 2 गुण येतील. तसेच पाकिस्तानची पुढची वाट बिकट होईल. भारत असलेल्या अ गटात अमेरिका, नामिबिया, नेदरलँड आणि अमेरिका हे संघ आहे. त्यामुळे यापैकी तीन सामने जिंकले भारत सुपर 8 फेरीत जागा पक्की करेल. पण पाकिस्तानला चार पैकी तीन सामने काहीही करून जिंकावेच लागतील. अन्यथा पाकिस्तानचं सुपर 8 फेरीचं गणित चुकलंच समजा. मागच्या वर्ल्डकप 2024 स्पर्धेत असंच झालं होतं. अमेरिकेने पराभवाची धूळ चारली होती. सुपर 8 फेरीत जागा मिळाली नव्हती. पाकिस्तान चार पैकी 2 सामन्यात विजयी झाला होता. तर अमेरिकेने दोन सामने जिंकत आणि एक सामना ड्रॉ झाल्याने बाजी मारली होती.

पाकिस्तान सुपर 8 फेरीत पोहोचला तर…

पाकिस्तान सुपर 8 फेरीत पोहोचला तर भारत पाकिस्तान लढत काही होणार नाही. कारण दोन्ही संघ एका गटात येणार नाहीत. त्यामुळे सामना होण्याचा प्रश्न येणार नाही. पण उपांत्य फेरीत किंवा अंतिम फेरीत आमनेसामने येऊ शकतात. जर पाकिस्तानने हाच पवित्रा तेथेही कायम ठेवला तर भारताला फायदा होणार आहे.

Follow Us
मोठी बातमी! CJI सुर्यकांत यांचे पुन्हा 'कॉक्रोच'बाबतच्या वक्तव्यावर...
मोठी बातमी! CJI सुर्यकांत यांचं पुन्हा 'कॉक्रोच'बाबतच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण, अखेर म्हणाले...
विकसित भारताच्या वाटचालीत महाराष्ट्र ठरणार गेमचेंजर; स्वातंत्र्यदिन...
विकसित भारताच्या वाटचालीत महाराष्ट्र ठरणार गेमचेंजर; स्वातंत्र्यदिनाच्या भाषणादरम्यान CM नेमकं काय म्हणाले?
पंतप्रधानांचं नागरिकांना मोठं आवाहन! जागतिक स्तरावर निर्यात वाढीसाठी..
पंतप्रधानांचं नागरिकांना मोठं आवाहन! जागतिक स्तरावर निर्यात वाढीसाठी...
लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा! तरुणांसाठी...
लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा! तरुणांसाठी... 'या' क्षेत्रात होणार बदल
पंतप्रधान मोदींकडून राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण
Independence Day 2026 | पंतप्रधान मोदींकडून राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण
स्वप्न मोठी असतील तर आपलं सामर्थ्यही वाढतं - पंतप्रधान मोदी
PM Narendra Modi : स्वप्न मोठी असतील तर आपलं सामर्थ्यही वाढतं, पंतप्रधान मोदींकडून भारताच्या प्रगतीवर भर
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवानाच रद्द केला
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवाना रद्द केला, नेमकं कारण काय?
काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात
Eknath shinde | काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात, 45 सरकारांचा दाखला देत म्हणाले...
शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल
Nagpur Farmer | शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! नागपूरच्या शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल चर्चेत, व्हिडिओ होतोय व्हायरल
राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे...
Rahul Gandhi | राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे परराष्ट्र धोरण नाही म्हणत मोदींवर निशाणा