AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026 स्पर्धेत हा संघ पहिल्यांदा जेतेपद पटकावणार? स्पर्धेपूर्वीच कर्णधाराचा दावा

आयपीएल 2026 स्पर्धेत जेतेपदाचा मानकरी कोण असणार? याची उत्सुकता लागून आहे. दहाही संघ कसून सराव करत आहेत. पण या स्पर्धेला सुरूवात होण्यापू्र्वीच जेतेपदाचं भाकीत वर्तवलं जात आहे.

IPL 2026 स्पर्धेत हा संघ पहिल्यांदा जेतेपद पटकावणार? स्पर्धेपूर्वीच कर्णधाराचा दावा
IPL 2026 स्पर्धेत हा संघ पहिल्यांदा जेतेपद पटकावणार? स्पर्धेपूर्वीच कर्णधाराचा दावाImage Credit source: IPL/BCCI
| Updated on: Mar 20, 2026 | 10:39 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेला 28 मार्चपासून सुरूवात होणार आहे. या स्पर्धेचं पहिल्या टप्प्याचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. असं असताना जेतेपदाचा मानकरी कोण? याबाबत आतापासूनच खलबतं सुरू आहेत. मागच्या वर्षी आरसीबीने जेतेपद पटकावलं होतं. 18 वर्षानंतर जेतेपदाचा मान रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला मिळाला होता. मात्र यंदा नवा मानकरी असेल की जुना याबाबत काही सांगता येत नाही. कारण दहाही संघांनी मजबूत बांधणी केली आहे. त्यामुळे या स्पर्धेचं जेतेपद कोण मिळवणार हे काही आता सांगता येणार नाही. असं असताना पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यर म्हणाला की, त्याला आव्हानं आवडतात आणि त्याची नजर यावेळी चषकावर असणार आहे. मागच्या वर्षी पंजाब किंग्सने अंतिम फेरी गाठली होती. पण जेतेपदाचं स्वप्न भंगलं होतं.

आयपीएल 2026 स्पर्धेपूर्वी पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यर याने मोहालीत संघाची नवी जर्सी लाँच केली. यावेळी त्याने स्पष्ट सांगितलं की, पंजाब किंग्स संघाकडून यंदा खूप अपेक्षा आहेत. ते मजेशीर असणार आहे. श्रेयस अय्यर म्हणाला की, ‘आशा खूप जास्त आहेत आणि यातच खरी मजा आहे. मला आव्हानं आवडतात. पण सर्वात महत्त्वाची गोष्टी अशी की जेव्हा आम्ही मैदानात उतरतो तेव्हा जिंकायचंच असतं. माझी नजर फक्त ट्रॉफीवर आहे.’ दुखापतीनंतर श्रेयस अय्यरने कमबॅक केलं आहे. त्यावर श्रेयस अय्यर म्हणाला की, माझं वजन जवळपास 7 किलोने घटलं होतं. त्यामुळे वजन वाढवण्यासाठी मला मेहनत घ्यावी लागली. मला आव्हान आवडतात आणि मी माझ्या आयुष्यातील कठीण काळ पार केला आहे. आता मी आत्मविश्वासाने संघाचं नेतृत्व करण्यास परतलो आहे.

कर्णधार श्रेयस अय्यरसोबत या कार्यक्रमात अर्शदीप सिंगही होता. त्याने सांगितलं की, ‘जेव्हा तुमच्यावर दबाव असतो तेव्हा आपलं भाग्यच असतं. तेव्हा चाहत्यांकडून अधिक समर्थन मिळतं. त्यामुळे आनंद वाढतो. जेव्हा चाहते तुम्हाला प्रोत्साहन देतात तेव्हा असं वाटतं की 30 हजार लोकं एकत्र धावत आहेत. आम्ही या वर्षी सर्व होम मॅचेस जिंकण्याचा पुरेपूर प्रयत्न करू.’

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा