AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026: सर्वाधिक विकेट घेऊनही 5 दिग्गज खेळाडू पर्पल कॅपपासून वंचित, बुमराहसह या गोलंदाजांचा समावेश

आयपीएल स्पर्धा म्हंटलं तर गोलंदाजांचं करिअर खराब करणारा उत्सव.. कारण या स्पर्धेत पूर्णपणे फलंदाज प्रभावी ठरतात. त्यांचा रोखण्याच मोठं आव्हान गोलंदाजांसमोर असतं. असं असताना काही गोलंदाजांनी या स्पर्धेच्या इतिहासात चांगली कामगिरी केली आहे. पण पर्पल कॅप काही मिळवता आलेली नाही.

| Updated on: Mar 20, 2026 | 5:33 PM
Share
आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या पर्वासाठी आता काही दिवसांचा अवधी शिल्लक राहिला आहे. त्यामुळे मागच्या 18 पर्वात काय झालं? याची आकडेमोड केली जात आहे. आतापर्यंत 18 पर्वात 15 गोलंदाजांनी पर्पल कॅप मिळवली आहे. एका पर्वात सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांना हा मान मिळतो. (Photo- TV9 Network Kannad वरून)

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या पर्वासाठी आता काही दिवसांचा अवधी शिल्लक राहिला आहे. त्यामुळे मागच्या 18 पर्वात काय झालं? याची आकडेमोड केली जात आहे. आतापर्यंत 18 पर्वात 15 गोलंदाजांनी पर्पल कॅप मिळवली आहे. एका पर्वात सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांना हा मान मिळतो. (Photo- TV9 Network Kannad वरून)

1 / 6
जसप्रीत बुमराह जगातील सर्वोत्तम गोलंदाज आहे. टी20 वर्ल्डकप 2024 आणि 2026 स्पर्धेच्या विजयात त्याचं योगदान मोलाचं ठरलं होतं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येच नव्हे, तर आयपीएलमध्येही बुमराहने आपली छाप सोडली आहे. बुमराहने आयपीएल कारकिर्दीत 183 विकेट घेतल्या आहेत. पण बुमराहला कधीही पर्पल कॅप जिंकता आलेली नाही. (Photo- TV9 Network/File)

जसप्रीत बुमराह जगातील सर्वोत्तम गोलंदाज आहे. टी20 वर्ल्डकप 2024 आणि 2026 स्पर्धेच्या विजयात त्याचं योगदान मोलाचं ठरलं होतं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येच नव्हे, तर आयपीएलमध्येही बुमराहने आपली छाप सोडली आहे. बुमराहने आयपीएल कारकिर्दीत 183 विकेट घेतल्या आहेत. पण बुमराहला कधीही पर्पल कॅप जिंकता आलेली नाही. (Photo- TV9 Network/File)

2 / 6
फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि आयपीएलमधून निवृत्ती घेतली आहे. त्याने अनेकदा संघाला कठीण परिस्थितीतून बाहेर काढलं आहे. रविचंद्रन अश्विनने आयपीएलच्या 16 पर्वात 187 बळी घेतले. पण रविचंद्रन अश्विनला कधीही पर्पल कॅप जिंकता आलेली नाही. (Photo- PTI)

फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि आयपीएलमधून निवृत्ती घेतली आहे. त्याने अनेकदा संघाला कठीण परिस्थितीतून बाहेर काढलं आहे. रविचंद्रन अश्विनने आयपीएलच्या 16 पर्वात 187 बळी घेतले. पण रविचंद्रन अश्विनला कधीही पर्पल कॅप जिंकता आलेली नाही. (Photo- PTI)

3 / 6
गेल्या 14 वर्षांपासून सुनील नरीन कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळत आहे. त्याने आतापर्यंत 192 बळी घेतले असून आयपीएलच्या इतिहासातील तिसरा सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. 189 सामने खेळूनही त्याचा इकॉनॉमी रेट 8 पेक्षा कमी आहे. पण पर्पल कॅपपासून वंचित राहिला आहे. (Photo- IPL/BCCI)

गेल्या 14 वर्षांपासून सुनील नरीन कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळत आहे. त्याने आतापर्यंत 192 बळी घेतले असून आयपीएलच्या इतिहासातील तिसरा सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. 189 सामने खेळूनही त्याचा इकॉनॉमी रेट 8 पेक्षा कमी आहे. पण पर्पल कॅपपासून वंचित राहिला आहे. (Photo- IPL/BCCI)

4 / 6
पियुष चावला आयपीएल 2025 नंतर इंडियन प्रीमियर लीगमधून निवृत्त झाला. चावलाने आतापर्यंत आपल्या आयपीएल कारकिर्दीत 192 सामने खेळले असून 192  बळी घेतले आहेत. 2023 च्या पर्वात त्याने 20 पेक्षा जास्त बळी घेतले. पण सातत्यपूर्ण कामगिरी करूनही पियुष चावलाला पर्पल कॅप जिंकता आली नाही. (फोटो-Gurpreet Singh/ HT via Getty Images)

पियुष चावला आयपीएल 2025 नंतर इंडियन प्रीमियर लीगमधून निवृत्त झाला. चावलाने आतापर्यंत आपल्या आयपीएल कारकिर्दीत 192 सामने खेळले असून 192 बळी घेतले आहेत. 2023 च्या पर्वात त्याने 20 पेक्षा जास्त बळी घेतले. पण सातत्यपूर्ण कामगिरी करूनही पियुष चावलाला पर्पल कॅप जिंकता आली नाही. (फोटो-Gurpreet Singh/ HT via Getty Images)

5 / 6
आयपीएलमध्ये 2012 पासून सातत्याने खेळणाऱ्या रशीद खानने 158 बळी घेतले आहेत. गेल्या 3 पर्वात रशीद खानने 20  किंवा त्याहून अधिक बळी घेतले आहेत. त्याने 2023 च्या आयपीएल हंगामात 27 बळी घेतले आहेत. मात्र  पर्पल कॅप जिंकता आलेली नाही. (Photo- IPL/BCCI)

आयपीएलमध्ये 2012 पासून सातत्याने खेळणाऱ्या रशीद खानने 158 बळी घेतले आहेत. गेल्या 3 पर्वात रशीद खानने 20 किंवा त्याहून अधिक बळी घेतले आहेत. त्याने 2023 च्या आयपीएल हंगामात 27 बळी घेतले आहेत. मात्र पर्पल कॅप जिंकता आलेली नाही. (Photo- IPL/BCCI)

6 / 6
Follow Us
6 खासदारांच्या बंडखोरीनंतर ठाकरेंचा मोठा निर्णय; आराखडा तयार आता फक्त.
Uddhav Thackeray | विश्वासू खासदारांच्या बंडखोरीनंतर ठाकरेंचा मोठा निर्णय; आराखडा तयार आता फक्त...
रेवती सुळेंच्या लग्नाला शरद पवार व्हीलचेअरवरून हजर, सुनेत्रा पवारांचीह
रेवती सुळेंच्या लग्नाला शरद पवार व्हीलचेअरवरून हजर, सुनेत्रा पवारांचीही उपस्थिती
कल्याणमध्ये जमीन घोटाळ्याने खळबळ; माजी नगरसेवकांसह 7 जणांवर गुन्हा
kalyan | कल्याणमध्ये जमीन घोटाळ्याने खळबळ; माजी नगरसेवकांसह 7 जणांवर गुन्हा
भर मंचावर झाला मोठा घोळ! कोल्हापूरच्या कार्यक्रमात शिंदेंचं नाव...
भर मंचावर झाला मोठा घोळ! कोल्हापूरच्या कार्यक्रमात शिंदेंचं नाव... मुख्यमंत्र्यांनी सूत्रसंचालकाला मध्येच अडवलं अन्...
6 बंडखोर खासदारांविरोधात ठाकरेंचा मास्टरप्लॅन! थेट मतदारसंघात उतरणार
Uddhav Thackeray | 6 बंडखोर खासदारांविरोधात उद्धव ठाकरेंचा मास्टरप्लॅन! थेट मतदारसंघात उतरणार
ओमराजे निर्णय घेण्याआधीच शिंदेंचे खासदार... शिंदेच्या कार्यकर्त्यांचा
ओमराजे निर्णय घेण्याआधीच शिंदेंचे खासदार... शिंदेच्या कार्यकर्त्यांचा घराबाहेर गराडा; पुण्यातील राजकीय हालचालींना वेग
परभणीच्या हनुमान मंदिरात मोठी दुर्घटना, बांधकाम सुरु असताना छत कोसळला
Parbhani| परभणीच्या हनुमान मंदिरात मोठी दुर्घटना, बांधकाम सुरु असताना छत कोसळला, अनेकजण जखमी
शिंदे गट नाही, आता एकच शिवसेना!; अमित शाहांच्या विधानाने चर्चांना उधाण
Amit Shah | शिंदे गट नाही, आता एकच शिवसेना!; अमित शाहांच्या विधानाने चर्चांना उधाण
शिंदेंच्या शिवसेनेत जाणार? ओमराजेंचं मोठं विधान, 2 दिवसांत अंतिम...
Omraje Nimbalkar | शिंदेंच्या शिवसेनेत जाणार? ओमराजेंचं मोठं विधान, 2 दिवसांत अंतिम निर्णय घेणार!
शिंदेंच्या सेनेतील बडा नेता ओमराजेंच्या भेटीला; पुण्याच्या निवासस्थानी
शिंदेंच्या सेनेतील बडा नेता ओमराजेंच्या भेटीला; पुण्याच्या निवासस्थानी... राजकारणातील घडामोडींना वेग