AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताने लंकेला लोळवलं, धवन-द्रविडने विजयाचं खातं उघडलं, लोक म्हणाले, ‘आता रवी शास्त्रीला हटवा!’

पहिल्या विजयासह शिखर धवनने पदार्पणाच्या पहिल्या सामन्यात विजय मिळवून आपल्या कॅप्टन्सी कारकीर्दीचा श्रीगणेशा केला. तर प्रशिक्षक राहुल द्रविडने देखील सिनिअर संघाचं प्रशिक्षकपद सांभाळताना पहिल्या विजयाची नोंद केली.

भारताने लंकेला लोळवलं, धवन-द्रविडने विजयाचं खातं उघडलं, लोक म्हणाले, 'आता रवी शास्त्रीला हटवा!'
शिखर धवन-राहुल द्रविड-रवी शास्त्री
| Edited By: Akshay Adhav | Updated on: Jul 19, 2021 | 9:34 AM
Share

मुंबई : पहिल्याच एकदिवसीय सामन्यात भारताच्या नवोदित खेळाडूंनी श्रीलंकेला हिसका दाखवला (India vs Sri lanka). सलामीवीर शिखर धवन-पृथ्वी शॉ यांची झंझावाती सुरुवात आणि त्यानंतर इशान किशनने केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर भारताने लंकेला 7 विकेट्स आणि 80 चेंडू राखून लोळवलं. या विजयासह शिखर धवनने पदार्पणाच्या पहिल्या सामन्यात विजय मिळवून आपल्या कॅप्टन्सी कारकीर्दीचा श्रीगणेशा केला. तर प्रशिक्षक राहुल द्रविडने देखील सिनिअर संघाचं प्रशिक्षकपद सांभाळताना पहिल्या विजयाची नोंद केली. टीम इंडियाच्या धडाकेबाज कामगिरीनंतर आता भारताच्या मुख्य प्रशिक्षकपदी राहुल द्रविडची निवड करण्यात यावी, त्यासाठी रवी शास्त्रींना हटवा, अशी मागणी होऊ लागली आहे. सोशल मीडियावर हजारो नेटकरी ही मागणी करु लागले आहेत.

द्रविड-धवनची शानदार सुरुवात

द्रविड-धवनने आपल्या नव्या इनिंगला झोकात सुरुवात केली. पहिल्यात सामन्यात लंकेला 7 विकेट्सने नमवून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. याचसोबत शिखर धवनने आपल्या कॅप्टन्सी करिअरमधील पहिल्या विजयाची नोंद केली. तर सिनिअर संघाचं प्रशिक्षकपद सांभाळताना द्रविडने देखील विजयाने खातं उघडलं. यानंतर आता रवी शास्त्रींना ह़टवून राहुल द्रविडकडे मुख्य प्रशिक्षपदाची जबाबदारी द्यावी, अशी मागणी नेटकरी करु लागले आहेत.

काय झालं मॅचमध्ये?

या सामन्यात श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना 262 घावांचे लक्ष्य दिले होते. भारताच्या फलंदाजांनी हे लक्ष्य 7 गडी आणि 80 चेंडू राखून पूर्ण केले. कर्णधार शिखर धवन (86) आणि इशान किशनच्या (59) अर्धशतकांच्या जोरावर भारताने हे आव्हान पूर्ण केले. तसेच सलामीवीर पृथ्वी शॉ याने 24 चेंडूत 43 धावांची खेळी करत भारताला चांगली सुरुवात करुन दिली होती. तर शेवटी सूर्यकुमार यादवने 20 चेंडूत 31 धावा करत भारताला विजय मिळवून दिला.

तत्पूर्वी, या सामन्यात श्रीलंका संघाने प्रथम फलंदाजी करत एका संयमी खेळीच्या जोरावर 262 धावा स्कोरबोर्डवर लावल्या होत्या. ज्यामुळे भारतासमोर 263 धावांचे लक्ष्य होते. सामन्यात भारतीय फिरकीपटूंनी कमालीची गोलंदाजी करत श्रीलंकेची वरची फळी नेस्तनाबूत केली. पण कर्णधार शनाका (39) याची उत्कृष्ट खेळी सोबत करुनारत्ने याने अखेरच्या दोन ओव्हरमध्ये चौकार-षटकारांचा पाऊस पाडत केलेल्या नाबाद 43 धावा यामुळे श्रीलंका संघाने 262 धावांपर्यंत मजल मारली होती. भारताकडून युजवेंद्र चहल, कुलदीप यादव आणि दिपक चाहरने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. तर हार्दीक आणि कृणाल पंड्या बंधूंनी प्रत्येकी एक विकेट मिळवली.

भारतीय फिरकीपटूंची कमाल

कोलंबोच्या मैदानात सुरु असलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने तीन फिरकीपटूंना संधी दिली. यामध्ये बऱ्याच काळानंतर भारताची ‘कुल्चा’ अर्थात कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल यांची जोडी मैदानात अवतरली होती. भारतीय संघाचा तीन फिरकीपटू खेळवण्याचा प्लॅन यशस्वी झाला. कारण सामन्यात पहिले महत्त्वाचे चार फलंदाज फिरकीपटूनीच बाद केले. दरम्यान संपूर्ण सामन्याचा विचार करता चहल, कुलदीप यादव आणि दिपक चहरने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. तर हार्दिक आणि कृणाल यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

(Rahul Dravid Should Be Appointed Full time Coach of india removed Ravi Shastri After india Defeat Srilanka By 8 Wicket)

हे ही वाचा :

‘ठरवूनच गेलो होतो, कुणीही असो, पहिल्या बॉलवर षटकारच मारायचा’, चहलच्या मुलाखतीत इशानची सिक्रेट गोष्ट

पृथ्वीचा लंकेला तडाखा, धमाकेदार खेळीनंतर सेहवागचं ‘ते’ ट्विट व्हायरल, रवी शास्त्रींची घेतली मजा!

टीम इंडियासमोर श्रीलंकेची हाराकिरी, भारताचा लंकेवर 7 गडी आणि 80 चेंडू राखून मोठा विजय

Follow Us
एका हाताने पोलिस व्हॅन रोखली! मुंबईच्या तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल
Viral Video | एका हाताने पोलिस व्हॅन रोखली! मुंबईच्या तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल
मंत्रीपदासाठी थेट पक्षच बदलता येत नाही; CM फडणवीसांचं नाव घेत...
मंत्रीपदासाठी थेट पक्षच बदलता येत नाही; CM फडणवीसांचं नाव घेत शिंदेंचा नेता स्पष्टच म्हणाला
MPSC कडून निवड पद्धतीत मोठा बदल, अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होण्याआधी..
MPSC कडून निवड पद्धतीत मोठा बदल, आता अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होण्याआधी...काय बदलणार?
राहुल गांधींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं थेट आव्हान, तुम्ही....
Devendra Fadnavis| राहुल गांधींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं थेट आव्हान, तुम्ही पळकुटेपणा...
विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर लक्ष द्यायला हवं! शरद पवारांची...
Sharad Pawar | विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर लक्ष द्यायला हवं! शरद पवारांची पंतप्रधान मोदींना थेट विनंती
लंचपर्यंत निर्णय नाही तर... 16 मेट्रो स्टेशन्स बंदबाबत न्यायाधीशांचं..
लंचपर्यंत निर्णय नाही तर... 16 मेट्रो स्टेशन्स बंदबाबत न्यायाधीशांचं मोठं विधान
वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र बंदला अनेक शहरांतून मोठा प्रतिसाद,
वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र बंदला अनेक शहरांतून मोठा प्रतिसाद, व्हिडीओ आले समोर
50 ग्रॅमची पावडर टाकेन.. आंदोलकाला धमकी देणाऱ्या पोलिसाचं अखेर निलंबन
50 ग्रॅमची पावडर टाकेन.. आंदोलकाला धमकी देणाऱ्या पोलिसाचं अखेर निलंबन; व्हिडिओ व्हायरल
आंदोलन मोडायला पाकिस्तानातून गुंड आणलेत का? ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
Uddhav Thackeray | आंदोलन मोडायला पाकिस्तानातून गुंड आणलेत का? उद्धव ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
त्यालाच जंतर मंतर म्हणतात; दोन बड्या नेत्यांच्या भेटीबाबत राज ठाकरे...
त्यालाच जंतर मंतर म्हणतात; दोन बड्या नेत्यांच्या भेटीबाबत राज ठाकरेंचं विधान तुफान चर्चेत