AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BCCIच्या पैशावरच पाकिस्तान क्रिकेट बोर्ड टिकून, PCB अध्यक्ष रमीज राजा यांनी सांगितली खरी परिस्थिती, व्हिडीओ व्हायरल

Ramiz Raja: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या 50 टक्के बजेट हे ICCच्या आर्थिक अनुदानातून मिळतं, आणि ICCच्या कमाईचा मोठा हिस्सा हा भारतीय क्रिकेट बोर्ड म्हणजेच BCCIकडून मिळतो.

BCCIच्या पैशावरच पाकिस्तान क्रिकेट बोर्ड टिकून, PCB अध्यक्ष रमीज राजा यांनी सांगितली खरी परिस्थिती, व्हिडीओ व्हायरल
पाकिस्तान बोर्ड हे ICC ने दिलेल्या 50 टक्के निधीवर चालतं, आणि ICC ला 90 टक्के फंडिग हे BCCI म्हणजेच भारताकडून होतं- रमीज राजा
| Edited By: | Updated on: Oct 08, 2021 | 11:56 AM
Share

पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (Pakistan Cricket Board) हा भारताच्याच पैशांवर चालतो, हे आता खुद्द पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षांनीच कबुल केलं आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे नवे अध्यक्ष रमीज राजा (Ramiz Raja) यांना एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे, यामध्ये ते BCCI मुळेच कशाप्रकारे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (Pakistan Cricket) अजूनही आपलं अस्तित्त्व टीकून आहे हे सांगत आहे. एवढंच नाही तर जगाच्या क्रिकेटवर आज BCCIचं राज्य आहे, ICC देखील BCCI मुळेच सुरु असल्याचं खुद्द रमीज राजा यांनी मान्य केलं आहे. (Ramiz Raja says Pakistan Cricket Board ruin if BCCI stop funding of ICC)

PCB चे नवे अध्यक्ष रमीज राजा सध्या त्यांना स्वावलंबी होण्याचं स्वप्न दाखवत आहेत, त्याच्य पार्श्वभूमीवर त्यांनी क्रिकेट बोर्डाची बैठक घेतली, त्यात त्यांनी जे काही वास्तव आहे, ते सगळं सांगून टाकलं. रमीज राजा म्हणाले,”पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या 50 टक्के बजेट हे ICCच्या आर्थिक अनुदानातून मिळतं, आणि ICCच्या कमाईचा मोठा हिस्सा हा भारतीय क्रिकेट बोर्ड म्हणजेच BCCIकडून मिळतो. त्यामुळेच पाकिस्तानला ICC वरील परावलंबित्त्व कमी करण्याची गरज आहे.” भाजप नेते अमित मालवीय यांनी हा व्हिडीओ ट्विट केला आहे.

रमीज राजा यावरच थांबत नाहीत, तर पाकिस्तान सरकारला अजून स्वच्छपणे आरसा दाखवतात. ते म्हणतात की, ” भारताने जर निधी थांबवला तर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड कोसळेल,” पत्रकार त्यांना प्रश्न विचारतात की, पाकिस्तान आयसीसीला किती फंडिंग करतो, त्यावर रमीज राजा शुन्य असं उत्तर देतात. रमीज राजा म्हणतात की, पाकिस्तान बोर्ड हे ICC ने दिलेल्या 50 टक्के निधीवर चालतं, आणि ICC ला 90 टक्के फंडिग हे BCCI म्हणजेच भारताकडून होतं, जर उद्या भारताच्या पंतप्रधानांनी निर्णय घेतला की, आयसीसीचं फंडिंग थांबवायचं, तर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची अवस्था वाईट होईल.

रमीज राजा काय म्हणाले, पाहा व्हिडीओ:

सध्या अशी परिस्थिती आहे की, कोणत्याही देशाला पाकिस्तानात जाऊन क्रिकेट खेळायचं नाही. अलीकडेच, न्यूझीलंड आणि इंग्लंडनेही त्यांचा पाकिस्तान दौरा रद्द केला, त्यानंतर पाकिस्तान क्रिकेटला मोठं आर्थिक नुकसानंच झालं नाही तर, त्याचा मोठा मनस्तापही सहन करावा लागला.

भारत पाकिस्तान 24 ऑक्टोबर रोजी लढेल

लवकरच T20 वर्ल्डकप सुरु होणार आहे, त्यात 24 ऑक्टोबरला भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना आहे. दुबईमध्ये दोन्ही संघांमध्ये हा सामना रंगणार आहे. या सामन्यात पाकिस्तानने भारताला हरवलं, तर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला एक उद्योजक कोरो चेक देणार असल्याचं रमीज राजा यांनी या बैठकीत सांगितलं.

हेही वाचा:

MI vs SRH: मुंबईला आज फक्त धुंवाधार बॅटिंगची गरज, 171 च्या फरकाने हैदराबादला हरवलं तरच नशीब पालटणार, हे 4 फलंदाज महत्त्वाचे!

PHOTO: दीपकने प्रपोज केलेली मुलगी कोण?, बॉलिवुडशी आहे खास नातं

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.