AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2021: ‘या’ दोन खेळाडूंच्या संघात येण्याने आरसीबीला मोठा फायदा, विराटची ही प्रतिक्रिया नक्की कोणासाठी?

आयपीएलच्या 14 व्या पर्वातील उर्वरीत सामन्यांना आजपासून सुरुवात होत आहे. यंदाच्या हंगामात उत्तम कामगिरी करणाऱ्या आरसीबी संघाने नव्याने घेतलेल्या दोन खेळाडूंचं कौतुक कर्णधार विराट कोहलीने केले आहे.

IPL 2021: 'या' दोन खेळाडूंच्या संघात येण्याने आरसीबीला मोठा फायदा, विराटची ही प्रतिक्रिया नक्की कोणासाठी?
आरसीबी संघ
| Edited By: | Updated on: Sep 19, 2021 | 7:45 PM
Share

मुंबई : इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian premier league) 14 व्या सीजनचे उर्वरीत सामने आजपासून (19 सप्टेंबर)  युएईमध्ये सुरु झाले आहेत. आतापर्यंत झालेल्या सामन्यात उत्तम कामगिरी करणाऱ्या विराट कोहलीच्या (Virat Kohli) रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (RCB) संघाने मोठे बदल करत काही धाकड खेळाडूंना संघात समाविष्ट केलं आहे. यातील दोन बदल हे संघासाठी फार फायदेशीर असल्याचं विराटने सांगितलं दोन खेळाडूंची नावं घेत, त्यांच्या संघात येण्याने संघाचा खेळ आणखी सुधारेल असंही विराटने म्हटलं आहे. हे दोन खेळाडू म्हणजे श्रीलंका दौऱ्यात भारतीय संघाची डोकेदुखी वाढवणारे वनिंदू हसरंगा (Wanindu Hasaranga) आणि दुष्मंथा चमिरा (Dushmantha Chameera).

या दोघांनाही आरसीबीने काही दिवसांपूर्वीच करारबद्ध केलं. ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज अॅडम झाम्पाच्या (Adam Zampa) जागी हसरंगाला  घेण्यात आलं आहे. हसरंगा भारताविरुद्धच्या टी-20 मालिकेत मालिकावीर देखील राहिला होता. हसरंगासह श्रीलंकेचा आणखी एक खेळाडू यासह दुष्मंथा चमिरा याला केन रिचर्डसनच्या (Kane Richardson) बदली खेळवण्यात येणार आहे. नुकतीच आरसीबीने निळ्या रंगाच्या जर्सीचे उद्घाटन केले. यावेळी विराटने झाम्पा आणि केनला आठवत नव्याने सामिल झालेल्या हसरंगा आणि चमिरा यांच्यामुळे संघाला बराच फायदा होणार असल्याचं विधान केलं. आरसीबीने कोरोना काळात फ्रंटलाईन वर्कर्स वापरत असलेल्या पीपीई किटच्या कलरची म्हणजेच निळी जर्सी ही त्यांना सपोर्ट म्हणून तयार केली आहे. सामन्यानंतर ती विकून मोफत लसीकरणासाठी मदत म्हणून त्याचे पैसे आरसीबी संघ देणार आहे.

कोहलीच्या आरसीबीसाठी यंदाची आयपीएल उत्तम

भारताचा कर्णधार विराट कोहलीने आतापर्यंत एकही आयपीएलचे जेतेपद पटकावलेले नाही. मात्र यंदाच्या आयपीएलमध्ये विराटचा संघ रॉयल चँलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bangalore) उत्तम प्रदर्शन करत आहे. त्यांनी उत्तम सुरुवात करत 7 पैकी 5 सामन्यांत विजय मिळवला आहे. यासोबतच ते 10 गुणांसह तिसऱ्या स्थानावर विराजमान आहेत.

रॉयल चँलेजर्स बंगळुरु संघाचे उर्वरीत सामने

– 20 सप्टेंबर (सोमवार): आरसीबी vs केकेआर, सायंकाळी 7:30 वाजता, अबू धाबी – 24 सप्टेंबर (शुक्रवार): आरसीबी vs चेन्‍नई सुपरकिंग्‍स, सायंकाळी 7:30 वाजता, शारजाह – 26 सप्टेंबर (रविवार): आरसीबी vs मुंबई इंडियन्स, सायंकाळी 7:30 वाजता, दुबई – 29 सप्टेंबर (बुधवार): आरसीबी vs राजस्‍थान रॉयल्‍स, सायंकाळी 7:30 वाजता, दुबई – 03 ऑक्टोबर (रविवार): आरसीबी vs पंजाब किंग्‍स, दुपारी 3:30 वाजता, शारजाह – 06 ऑक्टोबर (बुधवार): आरसीबी vs सनरायजर्स हैद्राबाद, सायंकाळी 7:30 वाजता, अबू धाबी – 08 ऑक्टोबर (शुक्रवार): आरसीबी vs दिल्‍ली कॅपिटल्‍स, सायंकाळी 7:30 वाजता, दुबई

हे ही वाचा –

IPL 2021 च्या उर्वरीत सामन्यांसाठी मुंबई इंडियन्स संघात बदल, रणजीमध्ये हॅट्रीक घेणारा धुरंदर अष्टपैलू दाखल

T20 World Cup पूर्वी भारतीय संघ खेळणार दोन सराव सामने, असे असेल वेळापत्रक, BCCI चा मास्टर प्लॅन तयार

IPL च्या इतिहासात सर्वाधिक धावा खाणाऱ्या गोलंदाजांमध्ये दिग्गजांचाही समावेश, ‘ही’ नावं वाचून चकित व्हाल

(RCB captain Virat kohli praises sri lankan players wanindu hasaranga and dushmantha chameera)

Follow Us
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?.
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल.
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?.
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?.
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.