विंडिजविरुद्धच्या अतितटीच्या लढतीत रिंकु संजू सॅमसनची बॅट घेऊन गेला, पटकन लक्षात आलं अन्… Video
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात सुपर 8 फेरीचा शेवटचा सामना झाला. या सामन्यात शेवटच्या षटकात भारताने विजय मिळवला. 6 चेंडूत 7 धावांची आवश्यकता असताना संजू सॅमसनने षटकार आणि चौकार मारत संघाला विजयी केलं. पण यापूर्वी एक मजेदार किस्सा घडला.

टी20 वर्ल्डकप सुपर 8 फेरीत वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात रिंकु सिंहला जागा मिळाली नाही. झिम्बाब्वेविरुद्ध खेळलेला संघच वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात उतरला. करो या मरोच्या सामन्यात वेस्ट इंडिजने 196 धावांचं तगडं आव्हान दिलं होतं. हे आव्हान वाटतं तितकं सोपं नव्हतं. त्यात भारताने या धावांचा पाठलाग करताना पावर प्लेमध्ये 2 विकेट गमावल्या होत्या. त्यामुळे टीम इंडियावर प्रेशर वाढलं होतं. पण संजू सॅमसनने टीम इंडियाचा डाव सावरला आणि विजयाच्या वेशीवर आणलं. या सामन्यात धावांचा पाठलाग सुरू असताना एक ब्रेक घेतला. या ब्रेकमध्ये संजू सॅमसनसाठी कुलदीप यादव आणि रिंकु सिंह पाणी आणि टॉवेल घेऊन आला. रिंकुने संजू सॅमसनला पाणी पाजलं. पण त्यानंतर जे काही घडलं ते पाहून तुम्हाला हसू आवरणार हे मात्र खरं.. कारण रिंकु सिंह संजू सॅमसनची बॅट घेऊन तंबूत चालला होता. खरं तर या दोघांच्या हा प्रकार तात्काळ लक्षात आला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडीओनुसार, रिंकु सिंहच्या खांद्यावर टॉवेल होते. त्याने हातातली पाण्याची बाटली संजू सॅमसनकडे दिली. त्याने पाणी प्यायले आणि रिंकुकडून तोंड पुसण्यासाठी टॉवेल घेतला. तोंड पुसताना त्याने हातातली बॅट रिंकुकडे दिली. रिंकुने बॅट खाकेत पकडली. संजूने तोंड पुसल्यानंतर टॉवेल त्याच्या खांद्यावर ठेवला आणि पुढे निघून गेला. रिंकु पण तंबूकडे चालता झाला. पण तेवढ्यात संजूच्या लक्षात आलं की बॅट नाही. त्याने रिंकुला हाक मारली आणि हसतच त्याच्याकडून बॅट घेतली.
Rinku Singh Mistakenly Walks Away With Sanju Samson’s Bat 😂
Reaction Of Kuldeep and Samson Was Priceless 😂 pic.twitter.com/2tDrSokmZd
— CricketSanctum (@SanctumCricket) March 2, 2026
संजू सॅमसनने त्यानंतरही आक्रमक बाणा कायम ठेवला. संजू सॅमसनने नाबाद 97 धावांची खेळी केली. यात त्याने 12 चौकार आणि 4 षटकार मारले. त्याच्या या खेळीमुळे टीम इंडियाचा विजय सोपा झाला. टीम इंडियाने वेस्ट इंडिजविरुद्धचा सामना 5 विकेट राखून जिंकला. यासह टीम इंडियाने उपांत्य फेरीत धडक मारली आहे. उपांत्य फेरीत भारताचा सामना इंग्लंडशी होणार आहे. हा सामना 5 मार्च रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जाणार आहे.
