सचिन, सेहवाग मैदानात परतणार! भारत-पाकिस्तानमध्ये रंगणार सामना

रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजचा दुसरा सीझन सुरू होत असल्याने पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर माजी खेळाडूंना खेळताना पाहण्याची संधी मिळणार आहे. ही लीग भारत आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये खेळवली जाईल.

सचिन, सेहवाग मैदानात परतणार! भारत-पाकिस्तानमध्ये रंगणार सामना
Road-Safety Series
Follow us
| Updated on: Dec 30, 2021 | 2:48 PM

मुंबई : रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजचा दुसरा सीझन सुरू होत असल्याने पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर माजी खेळाडूंना खेळताना पाहण्याची संधी मिळणार आहे. ही लीग भारत आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये खेळवली जाईल. भारतात ही T20 लीग 5 फेब्रुवारी 2022 पासून सुरू होत आहे, तर 1 मार्चपासून ती UAE मध्ये खेळवली जाईल. या मोसमाचा अंतिम सामना 19 मार्च रोजी होणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेले खेळाडू या लीगमध्ये भाग घेतात. या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तानचे संघ आमनेसामने येणार आहेत. (Road Safety World Series T20 Season 2 will be start from Feb 5th 2022 in India and UAE)

गेल्या वर्षी लीगचा पहिला सीझन खेळवण्यात आला होता ज्यात भारतीय संघ विजयी झाला होता. सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, युवराज सिंग, इरफान पठाण, मोहम्मद कैफ, युसूफ पठाण भारताकडून खेळले. भारताशिवाय दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, इंग्लंड, वेस्ट इंडिजचे संघही यात खेळले. या संघांमध्ये जॉन्टी ऱ्होड्स, कार्ल हूपर, ब्रायन लारा, तिलकरत्ने दिलशान हे खेळाडूही खेळले. यावेळीही हे खेळाडू या स्पर्धेत पुन्हा दिसतील अशी अपेक्षा आहे.

अशी असेल स्पर्धा

लीगच्या चालू हंगामात इंडिया लीजेंड्स, इंग्लंड लीजेंड्स, वेस्ट इंडिज लीजेंड्स, दक्षिण आफ्रिका लीजेंड्स, ऑस्ट्रेलिया लीजेंड्स, न्यूझीलंड लीजेंड्स, पाकिस्तान लीजेंड्स, बांगलादेश लीजेंड्स, श्रीलंका लीजेंड्स हे संघ सहभागी होतील. पहिला सामना भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात होणार आहे. भारत आणि पाकिस्तानचे संघ 12 मार्चला यूएईमध्ये आमनेसामने येणार आहेत. स्पर्धेत एकूण 38 सामने खेळवले जातील. लीग टप्पा 15 मार्चपर्यंत चालेल आणि त्यात एकूण 35 सामने खेळवले जातील आणि त्यानंतर दोन उपांत्य फेरीचे सामने होतील. 16 आणि 17 मार्च रोजी हे उपांत्य फेरीचे सामने होणार आहेत. फायनल 19 मार्चला होणार आहे. मात्र, या स्पर्धेसाठीचे संघ अद्याप जाहीर झालेले नाहीत.

त्यामुळेच ही स्पर्धा होत आहे

लोकांमध्ये रस्ते सुरक्षेबाबत जनजागृती करणे हा या स्पर्धेच्या आयोजनामागचा उद्देश आहे. स्पर्धेच्या दुसऱ्या हंगामात 160 हून अधिक निवृत्त क्रिकेटपटू दिसणार आहेत. ही मालिका MSPL आणि ANZA इन्व्हेस्टमेंट ग्रुपतर्फे भव्य पद्धतीने आयोजित केली जाईल. संयुक्त अरब अमिराती क्रिकेट बोर्डाच्या एका अधिकाऱ्याने याला दुजोरा दिला आहे. आयोजकांनी ANZA इन्व्हेस्टमेंट ग्रुपला मेगा इव्हेंटसाठी NOC देखील जारी केली आहे. ANZA इन्व्हेस्टमेंट ग्रुप ही शेख हमदान बिन मोहम्मद अलनायान यांची समूह कंपनी आहे.

इतर बातम्या

Ranji Trophy: मुंबईच्या रणजी संघात अर्जुन तेंडुलकर, पृथ्वी शॉ कर्णधार

Virat Kohli : एकच चूक वारंवार करून Out होतोय विराट कोहली, सोशल मीडियावर Troll

IND VS SA: विराटाच्या शॉट सिलेक्शनवर गावस्करांनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, म्हणाले….

(Road Safety World Series T20 Season 2 will be start from Feb 5th 2022 in India and UAE)

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.