AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वनडे मालिकेसाठी संघ जाहीर, रोहित शर्मा आणि विराट कोहलीचा संघातून पत्ता कट

आशिया कप स्पर्धा सुरु असताना ऑस्ट्रेलिया ए संघाविरुद्ध भारत ए संघाची घोषणा केली आहे. तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी संघ जाहीर करण्यात आला आहे. पण या संघात रोहित शर्मा आणि विराट कोहलीचं नाव नाही.

वनडे मालिकेसाठी संघ जाहीर, रोहित शर्मा आणि विराट कोहलीचा संघातून पत्ता कट
वनडे मालिकेसाठी संघ जाहीर, रोहित शर्मा आणि विराट कोहलीचा वनडे संघातून पत्ता कट Image Credit source: PTI
| Updated on: Sep 14, 2025 | 9:38 PM
Share

आशिया कप 2025 स्पर्धा सुरु असून सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारतीय संघ खेळत आहे. जेतेपदासाठी भारतीय प्रबळ दावेदार मानला जात आहे. त्यानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी जाणार आहे. तत्पूर्वी ऑस्ट्रेलिया ए संघाविरुद्ध रंगीत तालीम पार पडणार आहे. तीन सामन्यांची वनडे मालिका 30 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबरपर्यंत रंगणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. पण या संघात रोहित शर्मा आणि विराट कोहलीचं नाव नाही. त्यामुळे क्रीडाप्रेमींची धाकधूक वाढली आहे. कारण या दोघांनी टी20 आणि कसोटीतून निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे आता फक्त वनडे मालिका खेळणार आहेत. अशा स्थितीत दोघांची ऑस्ट्रेलिया ए विरूद्धच्या संघात नाव नसणं हा मोठा धक्का मानला जात आहे. कारण दोघंही 9 मार्च 2025 नंतर एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेले नाहीत. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत न्यूझीलंडला पराभूत केल्यापासून दोघंही क्रिकेटपासून दूर आहेत.

बीसीसीआय निवड समितीने पहिल्या वनडेसाठी आणि दुसऱ्या-तिसऱ्या वनडेसाठी वेगळी टीम निवडली आहे. पहिल्या वनडे सामन्यात रजत पाटीदार कर्णधार असणार आहे. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यासाठी संघात तिलक वर्मा, हर्षित राणा आणि अर्शदीप सिंग यांची निवड केली आहे. हे तिन्ही खेळाडू आशिया कप स्पर्धेचा भाग आहेत. तर दुसऱ्या तिसऱ्या वनडे सामन्यात कर्णधारपदाची धुरा तिलक वर्माच्या खांद्यावर असणार आहे.

पहिल्या सामन्यासाठी टीम इंडिया ए : रजत पाटीदार (कर्णधार), प्रभसिमरन सिंह (विकेटकीपर), रियान पराग, आयुष बडोनी, सूर्यांश शेडगे, विप्रज निगम, निशांत सिंधु, गुरजापनीत सिंह, युद्धवीर सिंह, रवि बिश्नोई, अभिषेक पोरेल (विकेटकीपर), प्रियांश आर्य, सिमरजीत सिंह.

दुसऱ्या आणि तिसऱ्या वनडेसाठी टीम इंडिया : तिलक वर्मा (कर्णधार), रजत पाटीदार (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, प्रभसिमरन सिंह (विकेटकीपर), रियान पराग, आयुष बदोनी, सूर्यांश शेडगे, विप्रज निगम, निशांत सिंधु, गुरजापनीत सिंह, युद्धवीर सिंह, रवि बिश्नोई, अभिषेक पोरेल (विकेटकीपर), हर्षित राणा, अर्शदीप सिंह.

असं असेल सामन्यांचं वेळापत्रक

  • पहिला सामना 30 सप्टेंबर 2025 रोजी, दुपारी 1.30 वाजता कानपूरच्या ग्रीन पार्क मैदानात होईल.
  • दुसरा सामना 3 ऑक्टोबर 2025 रोजी, दुपारी 1.30 वाजता कानपूरच्या ग्रीन पार्क मैदानात होईल.
  • तिसरा सामना 5 ऑक्टोबर 2025 रोजी, दुपारी 1.30 वाजता कानपूरच्या ग्रीन पार्क मैदानात होईल.

Follow Us
मराठा आरक्षण आंदोलन: मनोज जरांगेंची ५८ लाख कुणबी प्रमाणपत्रांची मागणी
मराठा आरक्षणावर जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा: ५८ लाख कुणबी प्रमाणपत्रांची मागणी, सत्ता जाण्याची शक्यता
तुमचं सरकार पाडणार, मराठ्यांचा तळतळाट... मनोज जरांगे काडाडले,
तुमचं सरकार पाडणार, मराठ्यांचा तळतळाट... मनोज जरांगे काडाडले, पुर्ण 58 लाख...
रस्त्याच्या दुरवस्थेचा व्हिडिओ बनवणाऱ्या मुली राज ठाकरेंच्या भेटीला
रस्त्याच्या दुरावस्थेचा व्हिडिओ बनवणाऱ्या मुली राज ठाकरेंच्या भेटीला
देशातील राजकारणाचे 3 Idiots कोण? राऊतांनी एकदमच सांगितलं... व्हिडीओ
Sanjay Raut | देशातील राजकारणाचे 3 Idiots कोण? राऊतांनी एकदमच सांगितलं... व्हिडीओ तुफान व्हायरल
सिंहगड हाणामारीचे नवे व्हिडीओ: १५ ऑगस्टची घटना, पोलिसांचा तपास सुरू
सिंहगडावरील हाणामारीचे नवे व्हिडीओ समोर. १५ ऑगस्टच्या घटनेने सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
दक्षिणेकडे भाजपला मोठा धक्का, पक्षातील बड्या नेत्याचा अचानक राजीनामा
दक्षिणेकडे भाजपला सर्वात मोठा धक्का, पक्षातील बड्या नेत्याने अचानक दिला राजीनामा अन्...
एसआयआर मोहिमेत विरोधी पक्षांची बीएलए नियुक्तीत उदासीनता
एसआयआर मोहिमेत विरोधी पक्षांची उदासीनता. बीएलए नियुक्तीत राजकीय पक्षांचे दुर्लक्ष
आमच्या पक्षात या... रामदास आठवलेंनी अभिजीत दीपकेला खुली ऑफर, थेट...
आमच्या पक्षात या... रामदास आठवलेंनी अभिजीत दीपकेला खुली ऑफर, थेट म्हणाले...
OBC मंत्र्यांची गोंडस मुलं अन् पैसा पाहून मराठी मुली... मोठी खळबळ
OBC मंत्र्यांची गोंडस मुलं अन् पैसा पाहून मराठी मुली... नवनाथ वाघमारांचे वादग्रस्त विधान; मराठा समाज आक्रमक, थेट...
वैद्यनाथ मंदिरात पहिल्या श्रावण सोमवारी भाविकांची अलोट गर्दी
श्रावण सोमवार आणि नागपंचमीनिमित्त वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिर उजळून निघाले, भक्तांकडून जलाभिषेक