AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WTC Final सामन्यात दक्षिण अफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूनी हाताला बांधली काळी पट्टी, कारण की…

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेचा निकाल आता अंतिम टप्प्यात आला आहे. ऑस्ट्रेलियाने दक्षिण अफ्रिकेसमोर विजयासाठी 282 धावांचं आव्हान ठेवलं आहे. आता कसोटी क्रिकेटला नवा चॅम्पियन्स मिळणार की ऑस्ट्रेलिया दुसऱ्यांदा जेतेपदावर नाव कोरणार? हे तिसऱ्या दिवसाच्या शेवटी किंवा चौथ्या दिवशी स्पष्ट होणार आहे.

WTC Final सामन्यात दक्षिण अफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूनी हाताला बांधली काळी पट्टी, कारण की...
दक्षिण अफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूनी हाताला बांधली काळी पट्टीImage Credit source: ICC
| Updated on: Jun 13, 2025 | 7:10 PM
Share

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात ऑस्ट्रेलियाचे फलंदाज फलंदाजीला उतरले. तेव्हा दोन्ही संघांच्या खेळाडूंच्या हाताला काळ्या पट्ट्या बांधल्या होत्या. त्यामुळे नेमकं असं का केलं याबाबत चर्चा रंगली होती. पण बहुतांश लोकांना माहिती होतं की दोन्ही संघाच्या खेळाडूंनी विमान दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे.सर्व खेळाडू लवकर मैदानावर पोहोचले. तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु होण्याआधी दोन्ही देशाच्या खेळाडूंनी एक मिनिट मौन पाळत मृत आत्म्यांना श्रद्धांजली वाहिली. दुसरीकडे, इंग्लंड दौऱ्यावर गेलेले भारतीय खेळाडूही काळ्या पट्ट्या घालून मैदानावर आले होते.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने अधिकृत एक्स हँडलवर लिहिलं की, “बेकेनहॅम येथे सुरू असलेल्या संघाच्या अंतर्गत सामन्यादरम्यान खेळाडू आणि सपोर्ट स्टाफने हातांना काळ्या पट्ट्या बांधल्या आहेत. अहमदाबाद विमान अपघातातील मृतांच्या स्मृतीप्रित्यर्थ आज एक मिनिट मौन पाळण्यात आले. हे मृतांच्या आदराचे आणि पीडित कुटुंबांसोबत असल्याचं दर्शविणारे प्रतीक आहे.” भारतीय संघ आणि भारत-अ यांच्यातील इंस्ट्रा स्क्वॉड सामना 13 जून रोजी बेकेनहॅम काउंटी मैदानावर सुरू झाला. 20 जूनपासून इंग्लंडविरुद्ध सुरू होणाऱ्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेपूर्वी, भारतीय खेळाडू या सामन्याद्वारे स्वतःला परिस्थितीशी जुळवून घेऊ इच्छितात.

गुरुवारी दुपारी 1 वाजून 38 मिनिटांनी बोईंग 787-8 ड्रीमलाइनर विमानाने अहमदाबाद विमान तळावरून उड्डाण घेतलं. पण अवघ्या 10 सेकंदात विमान कोसळलं. या विमानात 230 प्रवासी आणि 12 क्रू मेंबर होते. प्रवाशांमध्ये 169 भारतीय, 53 ब्रिटीश, 7 पोर्तुगाल आणि एक कॅनडाचा नागरीक होता. या दुर्घटनेत 242 पैकी 241 जणांचा मृत्यू झाला तर एकच नागरिक बचावला आहे. तर जमिनीवरील 25 जणही या अपघातात दगावले. या अपघातात एकूण 265 जणांचा मृत्यू झाला आहे.

Follow Us
मृत्युदंड की जन्मठेप... वकिलांनी काय सांगितलं? पुण्यातील नसरापूर केस
Nasrapur case | मृत्युदंड की जन्मठेप... वकिलांनी काय सांगितलं? पुण्यातील नसरापूर प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर
आधी फुटले, आता म्हणतात, उद्धव ठाकरेंचं परभणीत स्वागत करू...
Shivsena | आधी फुटले, आता म्हणतात, उद्धव ठाकरेंचं परभणीत स्वागत करू; खासदार संजय जाधवांचं मोठं विधान; नेमकं काय म्हणाले?
ओमराजे आणि जगजितसिंह पाटीलांमध्ये Cold War? दोन पोस्ट अन् दोन्हीमध्ये
ओमराजे आणि जगजितसिंह पाटीलांमध्ये Cold War? दोन पोस्ट अन् दोन्हीमध्ये शिंदेंचा फोटो, पुढे...
अजित पवारांनी उद्घाटन केलेलं NCP कार्यालय तुटणार?
मोठा झटका! अजित पवारांनी उद्घाटन केलेलं NCP कार्यालय तुटणार? नगरविकास विभागाचा मोठा निर्णय!
आता आमदारही फुटणार? ठाकरेंच्या सेनेचा बडा नेता धरणार महायुतीची वाट
मोठी घडामोड! खासदारांनंतर आता आमदारही फुटणार? ठाकरेंच्या सेनेचा बडा नेता धरणार महायुतीची वाट
मोठी बतामी! ठाकरेंच्या खासदारांनंतर आता राष्ट्रवादीचे... शरद पवारांनी
मोठी बतामी! ठाकरेंच्या खासदारांनंतर आता राष्ट्रवादीचे... शरद पवारांनी एका वाक्यातच सांगितलं, आमचा...
एकीचा संदेश, पण 24 आमदार गायब! महाविकास आघाडीच्या बैठकीत नेमकं काय घडल
MVA Meeting | एकीचा संदेश, पण 24 आमदार गायब! महाविकास आघाडीच्या बैठकीत नेमकं काय घडलं?
5 जणांना मारलं, बॉम्ब... राऊतांचा संजय दिना पाटलांवर लेटर बॉम्ब...
मोठी बातमी! 5 जणांना मारलं, बॉम्ब... राऊतांचा संजय दिना पाटलांवर लेटर बॉम्ब; थेट पोलीस आयुक्तांकडे तक्रार
दिल्ली ते मुंबई...ऑपरेशन टायगरचा मास्टरमाइंड कोण?
Operation Tiger | दिल्ली ते मुंबई...ऑपरेशन टायगरचा मास्टरमाइंड कोण?; खासदारांच्या प्रवेशामागे भाजपच्या त्या सर्वात मोठ्या नेत्याची शिष्टाई मोलाची
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोप
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोपांनी खळबळ!