
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील सुपर 8 फेरीत भारताची लढत दक्षिण अफ्रिकेशी झाली. या सामन्यात भारताने नाणेफेकीचा कौल गमावला आणि प्रथम गोलंदाजी आली. भारताची येथेच खऱ्या अर्थाने वाट लागली. कारण कर्णधार सूर्यकुमार यादवलाही प्रथम फलंदाजी करायची होती. पण तसं झालं नाही. दक्षिण अफ्रिकेने 20 षटकात 7 गडी गमवून 187 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघ सर्व गडी बाद 111 धावाच करू शकला. भारताने हा सामना 76 धावांनी गमावला आहे. खरं तर दक्षिण अफ्रिकेने टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेच्या अंतिम फेरीचा वचपा काढला असं म्हणायला हरकत नाही. कारण या सामन्यात भारतीय संघाला कुठेच भारी पडू दिलं नाही. त्यामुळे भारताचा नुसता पराभवच नाही तर नेट रनरेटचाही फटका बसला आहे. भारताने हा सामना मोठ्या फरकाने गमवल्याने -3.800 नेट रनरेट झाला आहे. त्यामुळे भारताची पुढच्या सामन्यात कसोटी लागणार आहे. खरं तर या स्पर्धेतून बाद होईल अशीच स्थिती आहे. कारण भारताला आता दक्षिण अफ्रिका वगळून इतर संघांच्या कामगिरीकडे लक्ष ठेवावं लागणार आहे.
भारताला आता उपांत्य फेरीत पोहोचणं कठीण होणार आहे. कारण भारताला नुसतं जिंकून नाही नेट रनरेटही सुधारावा लागणार आहे. त्यामुळे भारताची खऱ्या अर्थाने कसोटी लागणार आहे. भारतासमोर आता झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिजचं आव्हान असणार आहे. या दोन्ही सामन्यात विजय मिळवून नाही. तर नेट रनरेट सुधारण्यावरही जोर द्यावा लागणार आहे. कारण भारताने तसं केलं नाही तर पदरात 4 गुण असूनही उपांत्य फेरीचं तिकीट मिळणार नाही. त्यामुळे भारतीय संघाला सुपर 8 फेरीतच गाशा गुंडाळावा लागणार आहे. त्यामुळे भारतीय संघाला वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे या संघांना मोठ्या फरकाने पराभूत करणं भाग आहे.
भारत आणि झिम्बाब्वे सामना आता 26 फेब्रुवारीला होणार आहे. या सामन्यात भारताच्या कामगिरीवर सर्व काही अवलंबून असणार आहे. जर भारताने हा सामना मोठ्या फरकाने जिंकला तर आणि तरच स्पर्धेत राहील. अन्यथा सामन्यातून गाशा गुंडाळण्याशिवाय पर्याय उरणार नाही.