AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup : संजू सॅमसनची संघात निवड कशी झाली? अजित आगरकरने सांगितलं नेमकं काय ते

आयपीएल स्पर्धा सुरु असताना टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी मोर्चेबांधणी करण्यात आली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात 15 खेळाडूंची घोषणा करण्यात आली आहे. या संघातून रिंकू सिंहला डावलण्यात आलं आहे. तर संजू सॅमसनची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे संजू सॅमसनच्या निवडीबाबत अजित आगरकरने सांगितलं की...

T20 World Cup : संजू सॅमसनची संघात निवड कशी झाली? अजित आगरकरने सांगितलं नेमकं काय ते
| Updated on: May 02, 2024 | 5:52 PM
Share

टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा झाली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडिया अमेरिका वेस्ट इंडिजमध्ये होणारा वर्ल्डकप खेळणार आहे. या संघात अनेक खेळाडू असे आहेत की, जे आयपीएलमध्ये ओपनिंग करत आहेत. त्यामुळे प्लेइंग 11 मध्ये कॉम्बिनेशन कसं असेल? याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. संजू सॅमसन, यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा, विराट कोहली हे चार खेळाडू आयपीएलमध्ये ओपनिंग करत आहेत. त्यामुळे संजू सॅमसनला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळणार की नाही या बाबतही चर्चा रंगली आहे. असं असताना संघ जाहीर झाल्यानंतर दोन दिवसांनी कर्णधार रोहित शर्मा आणि निवड समिती अध्यक्ष संजू सॅमसन यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत दोघांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. यावेळी त्यांना संजू सॅमसनच्या निवडीबाबत आणि रोलबाबत प्रश्न विचारला. तेव्हा अजित आगरकरने त्या प्रश्नाचं उत्तर देत त्या मागचं गणित समजावून सांगितलं. तसेच केएल राहुलला टीममधून वगळल्याचं कारणंही सांगितलं.

“केएल राहुल आयपीएलमध्ये ओपनिंग करत आहे. आम्ही प्रामुख्याने मधल्या फळीतील पर्याय शोधत होतो. त्यामुळे आम्हाला वाटले की सॅमसन आणि पंत यासाठी अधिक योग्य आहेत. सॅमसन लाईनअपमध्ये कुठेही फलंदाजी करू शकतो. त्यामुळे संघाला जी गरज आहे ती निवड योग्य ठरली. कोण चांगले आहे यावरून निवड करता येत नाही,” असं निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर यांनी सांगितलं.

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारताचा पहिला सामना आयर्लंडशी होणार आहे. हा सामना 5 जूनला होणार आहे. त्यानंतर 9 जूनला भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना न्यूयॉर्कमध्ये होईल. त्यानंतर कॅनडा आणि अमेरिकाशी सामना होईल. या गटातून टॉप 2 संघ पुढच्या फेरीत खेळतील. एकूण 20 संघ स्पर्धेत सहभागी असून त्याची चार गटात 5 संघात विभागणी करण्यात आली आहे.

टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग , जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.. राखीव खेळाडू:  शुबमन गिल, रिंकू सिंग, खलील अहमद, आवेश खान.

Follow Us
बुलढाण्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का
बुलढाण्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का.
इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग,महिलांमध्ये...
इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग,महिलांमध्ये....
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले.
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त.
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?.
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला.
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान.
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग.
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह.
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम.