IND vs NZ Final: अंतिम सामन्यात भारत-न्यूझीलंड संघ इतिहास रचणार, क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच असं घडणार
IND vs NZ Final, T20 World Cup 2026: टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारत आणि न्यूझीलंड हे संघ भिडणार आहे. हा अंतिम सामना विशेष असणार आहे. कारण या सामन्यात दोन्ही संघ एक महत्त्वाचा टप्पा गाठणार आहे. यापूर्वी दोन्ही संघांनी असं केलं नव्हतं.

IND vs NZ Final, T20 World Cup 2026: टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारत आणि न्यूझीलंड आमनेसामने येणार आहे. या दोन्ही संघापैकी एक संघ जेतेपदाचा मानकरी ठरणार आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये 8 मार्चला खेळला जाणार आहे. भारताने उपांत्य फेरीच्या सामन्यात इंग्लंडला 7 धावांनी पराभूत केलं. तर न्यूझीलंडने दक्षिण अफ्रिकेला 9 गडी राखून पराभूत करत उपांत्य फेरी गाठली आहे. भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांनी स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे या सामन्याची उत्सुकता आतापासून आहे. कारण भारत न्यूझीलंड हे संघ पहिल्यांदाच अंतिम सामन्यात भिडणार आहेत. त्यामुळे क्रिकेट इतिहासात याची नोंद होणार आहे.
क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडणार
गतविजेत्या भारतीय संघाने सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरी गाठली आहे. त्यामुळे सलग दुसऱ्यांदा जेतेपद मिळवण्याच्या शर्यतीत आहे. दुसरीकडे, न्यूझीलंडचा पहिला टी20 वर्ल्डकप जिंकण्याचा मानस आहे. भारताने सलग दुसऱ्यांदा वर्ल्डकप जिंकला किंवा न्यूझीलंडने पहिल्यांदा वर्ल्डकप जिंकला तरी त्याची नोंद इतिहासात होणार आहे. कारण आतापर्यंत कोणत्याही संघाने सलग दोनदा जेतेपद मिळवलेलं नाही. इतकंच काय तर यजमान संघ कधीच टी20 वर्ल्डकप जिंकलेला नाही. दुसरीकडे, दुसरीकडे आयसीसीच्या तिन्ही फॉर्मेटमध्ये भारत आणि न्यूझीलंड आमनेसामने येण्याचा योग जुळून येणार आहे. यापूर्वी भारत आणि न्यूझीलंड आयसीसी वनडे आणि कसोटी स्पर्धेच्या अंतिम फेरीत भिडले आहेत.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2021 मध्ये भारताचा आयसीसी स्पर्धेत पहिल्यांदाच न्यूझीलंडशी सामना झाला होता. तेव्हा न्यूझीलंडने भारताला धोबीपछाड देत जेतेपदावर नाव कोरलं होतं. त्यानंतर 2025 आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीत दोन्ही संघ भिडले होते. तेव्हा भारताने न्यूझीलंडला 4 विकेटने पराभूत केलं होतं. रोहित शर्माच्या नेतृत्वात भारताने विजय मिळवला होता.
न्यूझीलंडचं कठीण आव्हान
अंतिम फेरीत न्यूझीलंडचं कठीण आव्हान भारतासमोर असणार आहे. कारण या स्पर्धेत न्यूझीलंडने जबरदस्त कामगिरी केली आहे. कारण भारतीय संघ या स्पर्धेच्या इतिहासात न्यूझीलंडविरुद्ध एकही सामना जिंकू शकलेली नाही. टी20 वर्ल्डकप स्पर्धेत दोन्ही संघ तीन वेळा आमनेसामने आले होते. तिन्ही वेळेस न्यूझीलंडने भारताला पराभूत केलं आहे.
