AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 WC 2026: श्रीलंकेने पाकिस्तानचा केला गेम, आता सामना 64 धावांमध्ये संपणार

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात सामना होत आहे. हा सामना पाकिस्तानसाठी खूपच महत्त्वाचा आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा श्रीलंकेच्या बाजूने लागला आणि पाकिस्तानचा गेम केला.

T20 WC 2026: श्रीलंकेने पाकिस्तानचा केला गेम, आता सामना 64 धावांमध्ये संपणार
T20 WC 2026: श्रीलंकेने पाकिस्तानचा केला गेम, आता सामना 64 धावांमध्ये संपणारImage Credit source: Icc X account
| Updated on: Feb 28, 2026 | 6:52 PM
Share

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील सुपर 8 फेरीत गट 2 मधील शेवटचा सामना पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात होत आहे. हा सामना पाकिस्तानसाठी खूपच महत्त्वाचा आहे. कारण उपांत्य फेरी गाठायची तर हा सामना जिंकणं भाग आहे. इतकंच काय तर नेट रनरेटचं गणित सोडवणंही तितकंच महत्त्वाचं आहे. खरं तर नेट रनरेटचं गणित सोडवायचं तर 64 धावांनी विजय किंवा दिलेलं टार्गेट 13.1 षटकात पूर्ण करणं भाग होतं. पण नाणेफेकीचा कौल श्रीलंकेच्या बाजूने लागला आणि पाकिस्तानला पहिला धक्का बसला. कारण श्रीलंकेने खेळपट्टीचा अंदाज घेऊन प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आता पाकिस्तानला श्रीलंकेला 64 धावांनी पराभूत करण्याचं आव्हान असणार आहे. त्यासाठी मोठी धावसंख्या उभारावी लागेल. तर आणि तरच हे गणित सुटू शकतं. पण श्रीलंका त्यांना कमी धावांवर रोखू शकते. तर दुसऱ्या डावात आरामात धावाही गाठू शकते. कारण दव फॅक्टर महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे पाकिस्तानी गोलंदाजांचा खऱ्या अर्थाने कस लागणार आहे.

श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाका म्हणाला की, आम्ही प्रथम गोलंदाजी करू. खेळपट्टी चांगली आहे आणि नंतर दव पडण्याची शक्यता आहे. आपल्या संघात काही चांगले खेळाडू आहेत आणि अर्थातच, आपल्याला आपले मूलभूत काम योग्यरित्या करावे लागेल. गेल्या दोन सामन्यांमध्ये विजय मिळवण्यासाठी आपण पुरेसे मूलभूत काम केले नाही. पण इथे, आपल्याला माहित आहे की आपल्याला तिन्ही विभागांमध्ये ते योग्यरित्या करावे लागेल. आपण जिंकलो किंवा हरलो तरीही चाहते नेहमीच आपल्यावर प्रेम करतात, म्हणून मला वाटते की ही चांगली प्रेरणा आहे. येथील सर्व चाहत्यांचे खूप खूप आभार.

पाकिस्तानचा कर्णधार सलमान आगा म्हणाला की, मोठी संधी आहे. आपल्याला चांगली फलंदाजी, चांगली गोलंदाजी आणि चांगले क्षेत्ररक्षण करावे लागेल आणि सर्व काही ठीक होईल. आपल्याला चांगली धावसंख्या उभारावी लागेल आणि त्यांना रोखण्याचा प्रयत्न करावा लागेल. कधीकधी ते कठीण असू शकते तर कधीकधी ते सोपे असू शकते, आपल्याला काय करावे लागेल हे जाणून घेणे ही एक संमिश्र भावना आहे.

Follow Us
सावंतवाडी-दोडामार्ग पट्ट्यातील 25 गावांना इको सेन्सिटिव्ह झोनचा दर्जा
सावंतवाडी-दोडामार्ग पट्ट्यातील 25 गावांना इको सेन्सिटिव्ह झोनचा दर्जा.
इराणचे 6 देशांवर प्रतिहल्ले मध्यपूर्वेतील अमेरिकन तळांना केले लक्ष्य
इराणचे 6 देशांवर प्रतिहल्ले मध्यपूर्वेतील अमेरिकन तळांना केले लक्ष्य.
अमेरिका-इराण युद्धातले 10 महत्त्वाचे मुद्दे कोणते?
अमेरिका-इराण युद्धातले 10 महत्त्वाचे मुद्दे कोणते?.
अजितदादांच्या विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल आज संध्याकाळी येणार
अजितदादांच्या विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल आज संध्याकाळी येणार.
इराणवर अमेरिका-इस्त्रायलचा मोठा हल्ला; इस्रायलमध्ये आणीबाणी
इराणवर अमेरिका-इस्त्रायलचा मोठा हल्ला; इस्रायलमध्ये आणीबाणी.
इराणवर अमेरिका-इस्त्रायलचा मोठा हल्ला
इराणवर अमेरिका-इस्त्रायलचा मोठा हल्ला.
मी अब्रू नुकसानीच्या दाव्याला भीक घालत नाही; अंबादास दानवेंची टीका
मी अब्रू नुकसानीच्या दाव्याला भीक घालत नाही; अंबादास दानवेंची टीका.
रोहित पवार आणि सुनेत्रा पवारांना ईडी गुन्ह्यात दिलासा मिळणार
रोहित पवार आणि सुनेत्रा पवारांना ईडी गुन्ह्यात दिलासा मिळणार.
राऊतांचे आरोप बिनबुडाचे, फडणवीसांची माफी मागा! नवनाथ बन संतापले
राऊतांचे आरोप बिनबुडाचे, फडणवीसांची माफी मागा! नवनाथ बन संतापले.
केजरीवाल-सिसोदियांची निर्दोष मुक्तता होताच राऊतांचा सरकारवर हल्ला
केजरीवाल-सिसोदियांची निर्दोष मुक्तता होताच राऊतांचा सरकारवर हल्ला.