AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rohit Sharma बांगलादेश विरुद्धच्या पराभवानंतर संतापला, म्हणाला गिल-शुबमन…

Rohit Sharma IND vs BAN | टीम इंडियाला आशिया कप 2023 मध्ये स्पर्धेतून बाहेर पडलेल्या बांगलादेश क्रिकेट टीमकडून अखेरच्या टप्प्यात पराभव स्वीकारावा लागला. टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा पराभवानंतर काय म्हणाला?

Rohit Sharma बांगलादेश विरुद्धच्या पराभवानंतर संतापला, म्हणाला गिल-शुबमन...
| Updated on: Sep 16, 2023 | 2:24 AM
Share

कोलंबो | टीम इंडियाचा आशिया कप 2023 मध्ये पहिला पराभव झाला आहे. बांगलादेशने टीम इंडियावर सुपर 4 फेरीतील शेवटच्या सामन्यात 6 धावांनी विजय मिळवला आहे. बांगलादेशने टीम इंडियाला विजयासाठी 266 धावांचे आव्हान दिले होते. या धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाचा डाव गडगडला. मात्र शुबमन गिल आणि अक्षर पटेल या दोघांनी केलेल्या खेळीच्या जोरावर सामना शेवटच्या ओव्हरपर्यंत गेला. मात्र टीम इंडिया विजय मिळवण्यात अपयशी ठरली आलं. बांगलादेशच्या गोलंदाजांनी टीम इंडियाला 266 धावांचा पाठलाग करताना 259 धावांवरच गुंडाळलं.

टीम इंडियाच्या पराभवामुळे शुबमन गिल याची 121 धावांची शतकी खेळी वाया गेली. तर अक्षर पटेल याने अखेरच्या टप्प्यात 42 धावांची दिलेली झुंज अपयशी ठरली. बांगलादेश आधीच स्पर्धेतून बाहेर पडलीय. त्यामुळे या विजय पराभवाचा तसा काही फरक या संपूर्ण स्पर्धेवर झालेला नाही. मात्र या विजयामुळे बांगलादेशचा वर्ल्ड कपआधी विश्वास चांगलाच वाढीस लागू शकतो. तर टीम इंडियावर पुन्हा एकदा आपल्यात काय कमी आहे, हे पाहण्याची वेळ आहे.

दरम्यान या पराभवानंतर टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा याने प्रतिक्रिया दिली. रोहित शर्मा याने बांगलादेशच्या गोलंदाजीचं कौतुक केलं. तसेच रोहित शर्मा याने शुबमन गिल आणि अक्षर पटेल या दोघांच्या खेळीचा उल्लेख करत प्रतिक्रिया दिली आहे. रोहित नक्की काय म्हणाला हे आपण जाणून घेऊयात.

रोहित शर्मा काय म्हणाला?

“अक्षर पटेल याने शानदार बॅटिंग केली. मात्र सामना संपवू शकला नाही. याचं संपूर्ण श्रेय हे बांगलादेशच्या गोलंदाजांचं आहे. आम्ही हा सामना कसा खेळला, याबाबत निश्चितच तडजोड होणार नाही. अक्षरने आपली ताकद दाखवली. मात्र त्याला सामना आपल्या बाजूने झुकवता आला नाही. शुबमन गिल याची शतक दमदार होतं. शुबमनला कसं खेळायचं गे माहिती आहे. टीमसाठी काय करायला हवं, याबाबत शुबमनची भूमिका स्पष्ट आहे. शुबमनचे गेल्या वर्षांपासूनचे आकडे पाहा. शुबमन नव्या बॉलचा सामना पद्धतशीर करतोय. शुबमन कठोर परीश्रम करतो. शुबमनसाठी कोणताच पर्यायी सराव नाही. आम्ही आमच्या योजनेनुसार काही खेळाडूंना पर्याप्त वेळ देऊ इच्छितो”, असं रोहित सामन्यानंतर म्हणाला.

टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, केएल राहुल (विकेटकीपर), ईशान किशन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी आणि प्रसिद्ध कृष्णा.

बांगलादेश प्लेईंग ईलेव्हन | शाकिब अल हसन (कॅप्टन), लिटॉन दास (विकेटकीपर), तांझिद हसन, अनमूल हक, तॉहिद हृदॉय, शमीम होसेन, मेहदी हसन मिराज, मेहदी हसन, नसुम अहमद, तांझिम हसन शाकिब आणि मु्स्तफिजुर रहीम.

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.