AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Retirement : धोनीच्या नेतृत्वात पदार्पण करणाऱ्या टीम इंडियाच्या वेगवान गोलंदाजाकडून अचानक निवृत्ती

Team India : टीम इंडियाच्या वेगवान गोलंदाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला आहे. या क्रिकेटरने महेंद्रसिंह धोनी याच्या नेतृत्वात पदार्पण केलं होतं.

Retirement : धोनीच्या नेतृत्वात पदार्पण करणाऱ्या टीम इंडियाच्या वेगवान गोलंदाजाकडून अचानक निवृत्ती
m s dhoni team indiaImage Credit source: tv9 bharatvarsh
| Updated on: Jan 10, 2025 | 3:45 PM
Share

टीम इंडिया मायदेशात इंग्लंडविरुद्ध टी 20i आणि वनडे सीरिज खेळणार आहे. तर त्यानंतर आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेला सुरुवात होणार आहे. त्याआधी टीम इंडियाच्या गोटातून मोठी बातमी समोर आली आहे. आर अश्विन याच्यानंतर टीम इंडियाच्या आणखी एकाने तडकाफडकी निवृत्ती जाहीर केली आहे. टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज वरुण एरॉन याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. वरुण काही महिन्यांपूर्वी फेब्रुवारी 2024 मध्ये रेड बॉल क्रिकेटमधून रिटायर झाला होता. त्यानंतर आता गोलंदाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला आहे.

वरुण एरॉन याने 2011 साली महेंद्रसिंह धोनी याच्या नेतृत्वात पदार्पण केलं होतं. वरुणने टीम इंडियाचं 9 वनडे आणि 9 टेस्ट मॅचमध्ये प्रतिनिधित्व केलं. वरुणने या एकूण 18 सामन्यांमध्ये 29 विकेट्स घेतल्या होत्या. वरुण त्याच्या वेगासाठी परिचित होता. मात्र वरुणला दुखापतीमुळे सातत्याने खेळता आलं नाही. वरुणचं दुखापतीमुळे टीममधून इन-आऊट सुरुच असायचं. वरुणने 2010-2011 या हंगामात विजय हजारे ट्रॉफीत सर्वांचं लक्ष वेधलं होतं. वरुणने तेव्हा 153 किमी वेगाने बॉल टाकला होता.

वरुणची आंतरराष्ट्रीय कारकीर्द

वरुणने मुंबईतील वानखेडे स्टेडियममधूनच एकदिवसीय आणि कसोटी पदार्पण केलं. वरुणने 23 ऑक्टोबर 2011 रोजी इंग्लंडविरुद्ध वनडे डेब्यू केला. तर 2 नोव्हेंबर 2014 साली अखेरचा एकदिवसीय सामना खेळला.वरुणने 9 एकदिवसीय सामन्यांमध्ये 11 विकेट्स घेतल्या. तर 8 धावा केल्या.

तसेच वरुणने 22 नोव्हेंबर 2011 रोजी विंडीज विरुद्ध कसोटी पदार्पण केलं. तर 14 नोव्हेंबर 2015 ला वरुणने अखेरचा कसोटी सामना खेळला. वरुणच्या कसोटी कारकीर्दीतील हे शेवटचा सामना ठरला. वरुणने टेस्टमध्ये 18 विकेट्स घेण्यासह 35 धावाही केल्या.

वरुण एरॉनचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा

दुखापतीमुळे कारकीर्दीला ब्रेक!

वरुणला त्याच्या कारकीर्दीत अनेकदा दुखापत आडवी आली. त्यामुळे वरुणला सातत्याने फार सामने खेळता आले नाहीत. मात्र वरुणने देशांतर्गत क्रिकेटमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली. वरुणने देशांतर्गत क्रिकेटमध्ये झारखंडसाठी चमकदार कामगिरी केली. वरुणने 66 फर्स्ट क्लास सामन्यांमध्ये 173 विकेट्स घेतल्या. तर लिस्ट ए क्रिकेटमधील 87 सामन्यांमध्ये 141 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तसेच वरुणने 95 टी 20 सामन्यांमध्ये 93 विकेट्स मिळवल्या.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.