AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Icc Champions Trophy 2025 : टीम इंडियाचा चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी मोठा निर्णय, रोहितसेनेचा प्लान काय?

Indian Cricket Team : टीम इंडिया इंग्लंडविरुद्धच्या मालिकेनंतर चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी दुबईला रवाना होणार आहे. टीम इंडिया या स्पर्धेआधी दुबईत सराव सामना खेळणार असल्याचं म्हटलं जात आहे.

Icc Champions Trophy 2025 : टीम इंडियाचा चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी मोठा निर्णय, रोहितसेनेचा प्लान काय?
mohammed siraj and rohit sharmaImage Credit source: PTI
| Updated on: Jan 10, 2025 | 7:06 PM
Share

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेला 19 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. त्यानुसार स्पर्धेसाठी लगबग सुरु आहे. या स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी होणार आहेत. त्यापैकी इंग्लंडने स्पर्धेसाठी संघ जाहीर करत आघाडी घेतली आहे. तर इतर 7 संघानी अद्याप खेळाडूंची नावं जाहीर केलेली नाहीत. या स्पर्धेच्या यजमानपदाचा मान हा पाकिस्तानकडे आहे. त्यामुळे टीम इंडिया या स्पर्धेतील सर्व सामने सुरक्षिततेच्या कारणामुळे दुबईत खेळणार आहे. टीम इंडिया या स्पर्धेआधी इंग्लंडविरुद्ध टी 20i आणि वनडे सीरिज खेळणार आहे. टीम इंडियासाठी इंग्लंडविरुद्धची एकदिवसीय मालिका ही चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दृष्टीने निर्णायक असणार आहे. मात्र या मालिकेआधी टीम इंडिया दुबईत आणखी एक सामना खेळणार असल्याचं म्हटलं जात आहे. टीम इंडियासाठी हा सराव सामना आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

मीडिया रिपोर्टनुसार, टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीआधी दुबईत पोहचल्यानंतर सराव सामना खेळणार आहे. टीम इंडिया कुणाविरुद्ध सराव सामना खेळणार? या प्रश्नाचं उत्तर अद्याप मिळू शकलेलं नाही. तसेच हा सराव सामना आयसीसीकडून आयोजित करण्यात येणार आहे? की टीम इंडियाचा सराव व्हावा, या उद्देशाने बीसीसीआय प्रॅक्टीस मॅचचं आयोजन करणार आहे? याबाबतही स्पष्टता नाही.

एकदिवसीय मालिका आणि रंगीत तालीम

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात चॅम्पियन्स ट्रॉफीआधी एकदिवसीय मालिका खेळवण्यात येणार आहे. दोन्ही संघांसाठी ही मालिका चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दृष्टीने निर्णायक असणार आहे. या 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला 6 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. दुसरा सामना हा 9 फेब्रुवारीला खेळवण्यात येईल. तर 15 फेब्रुवारीला अंतिम सामना पार पडेल.

चॅम्पियन्स ट्रॉफीआधी टीम इंडियाची दुबईत टेस्ट!

चॅम्पियन्स ट्रॉफी

दरम्यान टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीतील मोहिमेची सुरुवात 20 फेब्रुवारीपासून करणार आहे. टीम इंडिया शेजारी बांगलादेशविरुद्ध 2 हात करणार आहे. तर टीम इंडियाच्या दुसर्‍या सामन्याकडे साऱ्या क्रिकेट विश्वाचं लक्ष असणार आहे. दुसऱ्या सामन्यात टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान आमनेसामने असणार आहेत. तर साखळी फेरीतील तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात टीम इंडियासमोर न्यूझीलंडचं आव्हान असणार आहे.

Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक