England Tour India 2021 | टीम इंडियाविरोधातील कसोटी मालिका इंग्लंडच्या फिरकीपटू जोडीसाठी आव्हानात्मक : जयवर्धने

इंग्लंडच्या भारत दौऱ्याची सुरुवात 5 फेब्रुवारीपासून (england tour india 2021) कसोटीने मालिकेने होणार आहे.

England Tour India 2021 | टीम इंडियाविरोधातील कसोटी मालिका इंग्लंडच्या फिरकीपटू जोडीसाठी आव्हानात्मक : जयवर्धने
इंग्लंड क्रिकेट टीम
Follow us
| Updated on: Jan 26, 2021 | 4:23 PM

कोलंबो : श्रीलंकेला दुसऱ्या कसोटी सामन्यात पराभूत करुन इंग्लंडने 2-0 अशा एकतर्फी फरकाने मालिका जिंकली. या मालिकेत इंग्लंडच्या डॉमनिक बेस (dom bess) आणि जॅक लीच (jack leach) या फिरकीपटू जोडीने धमाकेदार कामगिरी केली. या दोघांनी या मालिकेत प्रत्येकी अनुक्रमे 12 आणि 10 विकेट्स घेतल्या. श्रीलंकेला नमवल्यानंतर इंग्लंड भारत दौऱ्यावर (England Tour India 2021) येणार आहे. “टीम इंडियाविरोधातील कसोटी मालिका या फिरकीपटू जोडीसाठी आव्हानात्मक असेल”, अशी प्रतिक्रिया श्रीलंकेचा माजी कर्णधार महेला जयवर्धनने (Mahela jayawardene) दिली आहे. (Test series against Team India will be challenging for the spin duo of Dominic Bess and Jack Leach said Mahela Jayawardene)

जयवर्धने काय म्हणाला?

“ही कसोटी मालिका फार चुरशीची असेल. लीच आणि बेस या दोघांसाठी ही टेस्ट सीरिज चॅलेंजिग असेल. परदेशात जावून कसोटी मालिका जिंकायची असते, यालाच क्रिकेट म्हणतात”, अशी प्रतिक्रिया जयवर्धनने दिली. तो स्काय स्पोर्ट्ससोबत बोलत होता.

“या फिरकीपटू जोडीला श्रीलंकेविरोधातील कसोटी मालिकेत अनुभव मिळाला. पण भारतात या दोघांना तगडं आव्हान असेल. तसेच बेन स्टोक्स आणि जोफ्रा आर्चरच्या पुनरागमन झाले आहे. हे दोन्ही खेळाडू अनुभवी आहेत. स्टोक्सच्या रुपात इंग्लंडकडे गोलंदाज आणि फलंदाज अशा दोन्ही भूमिका सार्थपणे बजावणारा खेळाडू आहे. तर जोफ्रा आर्चर आपल्या गोलंदाजीच्या वेगाने नक्कीच इंग्लंडसाठी विकेट्स घेईल. या दोघांची एंट्री इंग्लंडसाठी फायदेशीर ठरेल”, असा विश्वास जयवर्धनेने व्यक्त केला. स्टोक्स आणि आर्चर या दोघांना श्रीलंकाविरोधातील कसोटी मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली होती.

इंग्लंडचा भारत दौरा

इंग्लंडच्या भारत दौऱ्याची सुरुवात 5 फेब्रुवारीपासून कसोटीने मालिकेने होणार आहे. एकूण 4 सामन्यांची ही कसोटी मालिका असणार आहे. या सीरिजमधील पहिल्या 2 सामन्यांसाठी दोन्ही संघाची घोषणा करण्यात आली आहे. कसोटी मालिकेनंतर 5 मॅचेसची टी 20 सीरिज खेळण्यात येणार आहे. तर 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेने इंग्लंडच्या भारत दौऱ्याची सांगता होणार आहे.

“टीम इंडिया कसोटी मालिका जिंकणार”

इंग्लंडविरोधातील कसोटी मालिका टीम इंडिया 3-1 किंवा 3-0 अशा एकतर्फी फरकाने जिंकेल, अशी भविष्यवाणी ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू ब्रॅड हॉगने केली आहे.

संबंधित बातम्या :

Maiden Over | बापू नाडकर्णींकडून सलग 21 ओव्हर मेडन, सर्वाधिक मेडन टाकणारा गोलंदाज कोण?

England Tour India 2021 | इंग्लंडच्या या खेळाडूचा भारताला धोका, चष्मा घालून दांडी गुल करण्यात माहिर!

Sri Lanka vs England, 2nd Test | जो रुटची विक्रमाला गवसणी, 16 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड ब्रेक

(Test series against Team India will be challenging for the spin duo of Dominic Bess and Jack Leach said Mahela Jayawardene)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.