AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आयपीएलमध्ये नव्या फ्रेंचायझीचे वेध! वैभव सूर्यवंशी आणि इशानचा खेळ पाहून अब्जाधीश उद्योगपतीची इच्छा

आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात आतापर्यंत राज्यांचं प्रतिनिधित्व करणारे संघ आहेत. त्यामुळे प्रत्येक राज्यातील चाहत्यांचं आपला संघ स्पर्धेत असावं असं स्वप्न आहे. असंच एक स्वप्न अब्जाधीश उद्योगपती अनिल अग्रवाल यांनी बोलून दाखवलं आहे.

आयपीएलमध्ये नव्या फ्रेंचायझीचे वेध! वैभव सूर्यवंशी आणि इशानचा खेळ पाहून अब्जाधीश उद्योगपतीची इच्छा
आयपीएलमध्ये नव्या फ्रेंचायझीचे वेध! वैभव सूर्यवंशी आणि इशानचा खेळ पाहून अब्जाधीश उद्योगपतीची इच्छाImage Credit source: IPL/BCCI
| Updated on: May 22, 2026 | 8:17 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेत बिहारच्या क्रिकेटपटूंनी आपल्या खेळीने छाप सोडली आहे. या स्पर्धेत 15 वर्षीय वैभव सूर्यवंशी आणि सनरायझर्स हैदराबादचा विकेटकीपर फलंदाज असलेल्या इशान किशनने आपल्या खेळीने प्रभावित केलं आहे. या दोघांनी फलंदाजीत आक्रमक बाणा दाखवत चौकार आणि षटकारांचा वर्षाव केला आहे. या दोघांचा खेळ पाहून भारताचे अब्जाधीश उद्योगपती असलेल्या वेदांता समुहाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांनी बिहार संघ उतरवण्याची मागणी केली आहे. बिहारचा संघ आयपीएल स्पर्धेत असावा अशी त्यांची मागणी आहे. बिहार देशातील सर्वाधिक लोकसंख्या असलेलं राज्य आहे. त्यामुळे आयपीएल स्पर्धेत सहभागी होण्याचा हक्क असल्याचं त्यांनी सांगितलं.

आयपीएल स्पर्धेत बिहारला संधी मिळणार?

अनिल अग्रवाल यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित इशान किशन, वैभव सूर्यवंशी आणि साकिब हुसैनच्या खेळाची स्तुती केली. त्याने लिहिलं की, ‘चेन्नई सुपर किंग्स, मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यासारखा एक महान संघ बिहारला मिळायला हवा, असे तुम्हाला वाटत नाही का? बिहारने देशाला अनेक असाधारण क्रिकेटपटू दिले आहेत. पाटणा येथे जन्मलेल्या ईशान किशनने सर्वात कमी चेंडूंचा सामना करत सर्वात जलद एकदिवसीय द्विशतक झळकावले. समस्तीपूरचा वैभव सूर्यवंशी आयपीएलमध्ये पदार्पण करणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला. गोपालगंजमधील एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या शकिब हुसेनच्या उत्कृष्ट गोलंदाजीने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. ‘

अनिल अग्रवाल यांनी पुढे लिहिलं की, ‘एक गोष्ट मला नेहमी खटकते. क्रिकेटमध्ये आपल्या बिहारला जी ओळख आणि मान्यता मिळायला हवी, ती का मिळाली नाही? बिहारच्या तरुणांना प्रत्येक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करण्याची पूर्ण संधी मिळावी आणि आपल्या खेळाडूंना इथेच बिहारमध्ये जागतिक दर्जाच्या सुविधा मिळाव्यात, हे सुनिश्चित करणे हे माझे नेहमीच स्वप्न आणि प्रयत्न राहिले आहेत.’

अनिल अग्रवाल यांनी बिहार राज्याचा अभिमान बाळगत पुढे लिहिलं की, ‘मला पूर्ण विश्वास आहे की, जर आपल्या मुलांना योग्य प्रेरणा आणि सुविधा मिळाल्या, तर आपल्या बिहारमधून उदयास येणारा संघ जगातील सर्वोत्तम संघ बनेल. आणि या प्रयत्नात मी बिहारच्या तरुणांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. बिहारच्या क्रिकेट संघाला आणि येथील खेळाडूंना पुढे नेण्यासाठी मी माझ्या बाजूने बिनशर्त पाठिंबा देईन. माझ्यासाठी बिहार हे केवळ एक राज्य नाही, तर ती एक भावना आहे. आता आपल्या मातीतील प्रतिभेला मैदानावर चमकण्याची वेळ आली आहे.’

Follow Us
अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं
Andheri Accident | अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं, रिक्षांचा चुराडा
अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Devendra Fadnavis on Ajit Pawar Accident | अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर CM फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Devendra Fadnavis | कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... मुख्यमंत्री फडणवीस नेमकं काय म्हणाले?
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून शिंदेंचा ठाकरे गटावर...
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून उपमुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल
रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही..
Ramesh Mhatre | डॉक्टर मारहाण प्रकरणात रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही कारवाईचे संकेत?
सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
Sudhir Mungantiwar | सत्ता आली की वचन विसरलात?; सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू...
Pandharpur Wari Chori News | पालखी सोहळ्यात चोरट्यांचा सुळसुळाट! खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू अनावर
सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
Beed kej Morcha | विलास घुले हत्या प्रकरण पेटलं! सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात काय घडतंय?
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात मोठं काय घडतंय? चर्चांना वेग
नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील... ठाकरे गटाची मोठी पोलखोल
Nashik Thackeray Nagarsevak | नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील त्यांना... ठाकरे गटाची पत्रकार परिषदेत मोठी पोलखोल