AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA : विराटने 2011 ला दिलेला शब्द केला पूर्ण, नेमकं काय म्हणालेला?

IND vs SA : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या सामन्यात विराटने शतकी खेळी करत सचिनच्या विक्रमाची बरोबरी केली. सोशल मीडियावर 2011 साली विराटने केलेलं वक्तव्य व्हायरल होत आहे.

IND vs SA : विराटने 2011 ला दिलेला शब्द केला पूर्ण, नेमकं काय म्हणालेला?
| Updated on: Nov 06, 2023 | 1:53 PM
Share

मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या सामन्यात बाहुबली संघ असलेल्य भारताने 243 धावांनी विजय मिळवला. भारताला आफ्रिका कडवं आव्हान देईल असं सर्वांना वाटलं होतं, मात्र तसं काही झालं नाही. भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करताना 326 धावांच डोंगर उभारला होता. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताच्या शिलेदारांनी आफ्रिकेला 85 धावांवर गुंडाळलं. या सामन्यामध्ये विराट कोहली याने सचिन तेंडुलकर याच्या सर्वाधिक शतकाच्या विक्रमाची बरोबरी केली. यानंतर 2011 साली विराटने सचिन निवृत्त होताना केलेल्या वक्तव्य व्हायरल होत असून त्याने दिलेला शब्द पाळला आहे.

2011 साली भारताने वर्ल्ड कपवर नाव कोरलं होतं त्यावेळी सचिनला एका युवा स्टार खेळाडूने खांद्यावर घेतलं होतं. आपल्या हिरोला कधी टीव्हीवर पाहणारा हा युवा खेळाडू त्याच्या निवृत्तीवेळी आपल्या खांद्यावर घेत मैदानावर फिरवत होता. तो खेळाडू विराट कोहली होता, त्यावेळी क्रिकेट जाणकारांना पाहणाऱ्यांना कोहली माहित होता. कारण तीन वर्षांआधी पदार्पण केलेला कोहली सर्वांना माहित नव्हता. मात्र आपल्या कामगिरीमुळे आज तो जगाच्या कानाकोपऱ्यात सर्वांना माहिती आहे.

सचिनच्या निवृत्तीनंतर कोहलीने दोन शब्द बोलले होते. ते म्हणजे, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने क्रिकेट विश्वात अनेक विक्रम प्रस्थापित केले आहेत. भारताचं नाव क्रिकेट जगतात उंचावलं आहे. सचिनने आतापर्यंत जे काम आपल्या खांद्यावर घेतल होतं, ते काम आता आपल्याला पुढे न्यायचं आहे.

कोहली हे 2011 मध्ये बोलला होता आज 2023 साल असून त्याने बारा वर्षांमध्ये भारतीय संघाच्या फलंदाजीची धुरा लिलया पेलली. सचिनची जागा विराटने पूर्णपणे भरून काढली, इतकंच नाहीतर कोहलीने ती जबाबदारी सांभाळताना संघाला प्रत्येकवेळी संकटातून बाहेर काढत विजयापर्यंत नेलं. आज त्यानेच सचिनच्या वन डे मधील सर्वाधिक शतकांची बरोबरी साधली आहे.

सचिन तेंडुलकरलाही त्याच्या विक्रमाच बरोबरी केल्याचा आनंद झाला. सचिनने त्याला 50 शतक करत लवकरच माझा रेकॉर्ड मोडून इतिहास रचण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. विराटने त्याची 49 शतकं 277  डावांमध्ये पूर्ण केली आहेत. भारताचा मॉर्डन मास्टर या वर्ल्ड कपमध्ये सचिनचा विक्रम मोडण्यात यशस्वी ठरतो की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Follow Us
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर....
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर.....
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह.
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण.
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?.
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.