AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केएल राहुल आणि संजीव गोयंका यांच्यात ‘त्या’ दिवशी नेमकं काय बोलणं झालं? अमित मिश्राने केला खुलासा

आयपीएल 2024 स्पर्धेदरम्यान संजीव गोयंका आणि केएल राहुल यांच्यातील संभाषणाची क्लिप खूपच व्हायरल झाली होती. त्यांच्यात नेमकं काय बोलणं झालं हे कळलं नसलं तरी हावाभावावरून बरंच काही समजून येत होतं. आता अमित मिश्रा याने त्या संभाषणावरील पडदा दूर केला आहे. तेव्हा नेमकं काय बोलणं झालं ते सांगितलं.

केएल राहुल आणि संजीव गोयंका यांच्यात 'त्या' दिवशी नेमकं काय बोलणं झालं? अमित मिश्राने केला खुलासा
| Updated on: Jul 16, 2024 | 4:27 PM
Share

आयपीएल 2024 स्पर्धेदरम्यान लखनौ सुपर जायंट्सचे मालक संजीव गोयंका आणि कर्णधार केएल राहुल यांच्यात वाद झाल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. सनरायझर्स हैदराबादने पराभूत केल्यानंतर संजीव गोयंका यांना राग अनावर झाला असल्याचं तेव्हा सांगण्यात येत होतं. लखनौ सुपर जायंट्सने सनरायझर्स हैदराबादसमोर विजयासाठी 166 धावांचं आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान हैदराबादने फक्त 9.4 षटकात पूर्ण केलं. यामुळे लखनौचं बाद फेरीत जाण्याचं गणित बिघडलं होतं. त्यामुळे संजीव गोयंका यांनी या पराभवानंतर कर्णधार केएल राहुल याला भर मैदानात सुनावल्याचं सांगण्यात येत होतं. आता या वादग्रस्त घटनेबाबत लखनौ सुपर जायंट्सचा फिरकीपटू अमित मिश्रा याने खुलासा केला आहे. केएल राहुल आणि संजीव गोयंका यांच्यात नेमकं काय झालं ते त्याने सांगितलं. अमित मिश्राने सांगितलं की, “गोयंका थोडे निराश होते. मी खोटं बोलणार नाही कारण दोन सामन्यात आम्ही वाईट पद्धतीने हरलो होतो. हैदराबादकडून मिळालेल्या पराभवानंतर आम्ही लाज वाटत होती. मला तर वाटत होती इतरांचं माहिती नाही. मी सरळ ड्रेसिंग रुममध्ये अर्धा तास आधी पॅकअप करून बसलो होतो. मी बोललो चला येथून लवकर.”

“त्या दोघांमध्ये फार काही मोठं बोलणं झालं नाही. पण त्यांनी हे स्पष्ट सांगितलं होतं की, ही काय बॉलिंग होत होती. कमीत कमी फाईट तर करा. आम्ही तर सरेंडरच करून टाकलं. या आणि मारून निघून जा. याला काय अर्थ आहे. काहीतरी प्लानिंगने गोलंदाजी करायला हवी. सामना 14 षटकात संपू द्या किंवा 19व्या किंवा 18व्या..आम्ही याच विकेटवर फलंदाजी केली होती. याच विकेटवर ते फलंदाजी करत होते मग 20 मिनिटात असं काय बदललं?”, असं केएल राहुल आणि संजीव गोयंका यांच्यातील चर्चेबाबत अमित मिश्रा याने सांगितलं.

अमित मिश्राने सांगितलं की, “दोन सामन्यात वाईट पद्धतीने हरलो. केकेआरने 100 धावांनी, जवळपास 98-99 धावांनी हरलो. सनरायझर्सने 9.4 की 9.3 षटकात सामना संपवला. सहा षटकात 91 धावा होत्या. मला स्पष्ट जाणवत होतं की आम्ही त्यांना नेट प्रॅक्टिस देत आहोत. प्रत्येक ठिकाणी षटकार आणि चौकार. मी निराश झालो होतो. जर जी व्यक्ती इतके पैसे लावते आणि असं बघत असेल तर निराश होणार नाही का? इमोशन आहेत.”

Follow Us
8 ते 10 दिवस थांबा, सर्व बाहेर येईल, सतीश सालियांन यांच्या सुचक...
8 ते 10 दिवस थांबा, सर्व बाहेर येईल, सतीश सालियांन यांच्या सुचक विधानाचा अर्थ काय?
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू-बदामावरून संजय शिरसाट संतापले; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदामावरून संजय शिरसाट संतापले; म्हणाले, आम्ही बदनाम...
शेतकऱ्यांची पिकं दुष्काळामुळे करपली अन् आढावा बैठकीत नेत्यांचा बदामावर
शेतकऱ्यांची पिकं दुष्काळामुळे करपली अन् आढावा बैठकीत नेत्यांचा काजु-बदामावर ताव
सर्वोच्च न्यायालयाची NTA ला पेपरफुटीप्रकरणी कडक ताकीद, उपाययोजनांची तप
सर्वोच्च न्यायालयाची NTA ला वरंवार पेपरफुटीप्रकरणी कडक ताकीद, उपाययोजनांची तपासणी
दिशा सालियान प्रकरण अपघात म्हणून मिटलं तरी... संजय राऊतांचां दावा
दिशा सालियान प्रकरण अपघात म्हणून मिटलं तरी... संजय राऊतांच्या मोठ्या दाव्याने खळबळ
गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांचं मोठं विधान, दोन मंत्री...
गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांचं मोठं विधान, दोन मंत्र्यांना तातडीचे आदेश
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी सतीश सालियान...
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी सतीश सालियान थेट वकीलांसह 'मातोश्री'ला जाणार
ममता बॅनर्जींच्या पाठिंब्यानंतर काँग्रेस उमेदवाराला अटक, बंगाल...
ममता बॅनर्जींच्या पाठिंब्यानंतर काँग्रेस उमेदवाराला अटक, नेमकं प्रकरण काय?
विविध ठिकाणी व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध, तीव्र आंदोलनाचा इशारा
विविध ठिकाणी व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध, तीव्र आंदोलनाचा इशारा
निवडणूक आयोगाने TMC चं चिन्ह गोठवताच, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय थेट
निवडणूक आयोगाने TMC चं चिन्ह गोठताच, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय थेट.... बंगालमध्ये राजकीय हालाचाली वाढल्या?