AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs AUS : भारताने वनडे सामना कुठे गमावला? कर्णधार गिलने एका वाक्यात सांगितलं

भारताने ऑस्ट्रेलिया विरुद्धची वनडे मालिका 2-0 ने गमावली. खरं तर दुसऱ्या वनडे सामन्यात विजयाची स्थिती होती. मात्र भारताला या सामन्यात कमबॅक करता आलं नाही. भारताने हा सामना कुठे गमावला याबाबत कर्णधार शुबमन गिलने स्पष्ट काय सांगितलं.

IND vs AUS : भारताने वनडे सामना कुठे गमावला? कर्णधार गिलने एका वाक्यात सांगितलं
IND vs AUS : भारताने वनडे सामना कुठे गमावला? कर्णधार गिलने एका वाक्यात सांगितलंImage Credit source: BCCI Twitter
| Updated on: Oct 23, 2025 | 5:53 PM
Share

भारत ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका सुरु आहे. या मालिकेतील दुसरा सामना जिंकून ऑस्ट्रेलियाने वनडे मालिका 2-0 ने खिशात घातली. ऑस्ट्रेलियाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात भारताने 50 षटकात 9 गडी गमवून 264 धावा केल्या आणि विजयासाठी 265 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान ऑस्ट्रेलियाने 46.2 षटकात 8 गडी गमवून पूर्ण केलं. खरं तर या सामन्यात भारताला विजय मिळवण्याची संधी होती. पण सुरुवातीला मोठी धावसंख्या उभारण्यात आणि त्यानंतर गोलंदाजीतही भारताने सुमार कामगिरी केली. त्यात गचाळ क्षेत्ररक्षणाची भर पडली. त्यामुळे ऑस्ट्रेलियन फलंदाजांना संधी मिळाली. त्या संधीचं सोनं करत त्यांनी विजयाच्या वेशीवर आणून सोडलं. भारताने या सामन्यात एक दोन नाही तर तीन झेल सोडले.

कर्णधार शुबमन गिलने याने पराभवासाठी गचाळ क्षेत्ररक्षणाला जबाबदार धरलं. जर हातातले सोपे झेल सोडले तर सामना हातून जाणारच ना? असं स्पष्टपणे सांगितलं. सामन्यानंतर समालोचकाशी बोलताना शुबमन गिल म्हणाला की, ‘आमच्याकडे फक्त पुरेशा धावा होत्या. अशा धावसंख्येचा बचाव करण्यासाठी दोन-तीन संधी सोडल्या तर ते कधीच सोपे नसते. पहिल्या सामन्यात पावसामुळे नाणेफेक अधिक महत्त्वाची होती. पण या सामन्यात मी जास्त काही सांगणार नाही कारण दोन्ही संघ जवळजवळ 50 षटके खेळले. सुरुवातीला खेळपट्टी थोडी जास्त होती. पण मला वाटते की 15-20 षटकांनंतर खेळपट्टी चांगली स्थिरावली.’

चौथ्या षटकात अर्शदीप सिंग गोलंदाजी करण्यासाठी आला होता. या षटकात ट्रेव्हिस हेडचा झेल सोडला. ट्रेव्हिस हेड किती महागात पडू शकतो याचा अंदाज आहे. ट्रेव्हिस हेड तेव्हा 7 धावांवर खेळत होता. अर्शदीप सिंगच्या या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर हा झेल सुटला. नितीश कुमार रेड्डीने ही संधी सोडली. त्यानंतर ट्रेव्हिस हेड 28 धावा करून बाद झाला. 16 व्या षटकात पुन्हा एकदा झेल सुटला. नितीश कुमार रेड्डीच्या गोलंदाजीवर मॅथ्यू शॉर्टचा सोपा झेल सोडला. 23 धावांवर असताना अक्षर पटेलने त्याचा झेल सोडला. त्यानंतर वॉशिंग्टन सुंदरच्या गोलंदाजीवर शॉर्टला पुन्हा जीवदान मिळालं. यावेळी सिराजने हातातला झेल सोडला. तेव्हा तो 55 धावांवर होता. त्यानंतर 78 चेंडूत 74 धावा करून बाद झाला.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.