AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टीम इंडियाच्या पराभवाला जबाबदार कोण? कर्णधार शुभमन गिलने त्या 25 धावांवर ठेवले बोट

आम्ही चौथ्या दिवशी एक तास आणि पाचव्या दिवशी एक तास चांगला खेळलो नाही. टॉप ऑर्डरने अजिबात चांगली कामगिरी केली नाही. टॉप ऑर्डरने किमान ३०-४० धावा जास्त करायला हव्या होत्या. या मालिकेत पहिल्यांदाच टॉप ऑर्डर अपयशी ठरली.

टीम इंडियाच्या पराभवाला जबाबदार कोण? कर्णधार शुभमन गिलने त्या 25 धावांवर ठेवले बोट
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Jul 15, 2025 | 7:33 AM
Share

लॉर्ड्स येथील ऐतिहासिक मैदानावर झालेल्या कसोटी सामन्यात यजमान इंग्लंडने टीम इंडियाला फक्त २२ धावांनी पराभूत केले. कसोटीत टीम इंडियाला विजय मिळवून देण्यासाठी जसप्रीत बुमराह याने घेतलेल्या ५ विकेट्स, केएल राहुल याचे शतक आणि रवींद्र जडेजा याचे दोन्ही डावातील आक्रमक अर्धशतके पुरेसे ठरले नाही. टीम इंडियाच्या पराभवाचे पोस्टमॉर्टेम केले तर अनेक वेगवेगळी कारणे समोर येऊ शकतात. परंतु भारतीय कर्णधार शुभमन गिल याने दोन चुकांवर बोट ठेवत पराभवाचे विश्लेषण केले.

चौथ्या दिवशी दोन गडी गमावले

लॉर्ड्स येथील कसोटी सामन्यात इंग्लंडकडून टीम इंडियाला १९३ धावांचे सोपे लक्ष्य दिले होते. त्याला उत्तर देताना चौथ्या दिवशी भारताने ४ गडी गमावून केवळ ५८ धावा केल्या. त्यामुळे शेवटच्या दिवशी विजयासाठी भारताला १३५ धावांची गरज होती. सामन्याच्या शेवटच्या दिवशी पहिल्या सेशनमध्ये भारताने आणखी चार गडी गमावून आपला पराभव निश्चित केला. परंतु त्यानंतर रवींद्र जडेजा सोबत जसप्रीत बुमराह आणि नंतर मोहम्मद सिराज यांनी चांगली भागिदारी करुन भारताच्या आशा पल्लवीत केल्या होत्या.

अवघ्या २२ धावांनी झालेल्या पराभवानंतर कर्णधार शुभमन गिल निराश झाला. त्याने या पराभवाच्या कारणांवर उघडपणे वक्तव्य केले. सामन्यानंतर पत्रकार परिषदेत कर्णधार गिलने दोन महत्त्वाचे मुद्दे मांडले. जे या सामन्यात टीम इंडियाच्या पराभवात महत्त्वाचे ठरले. गिल म्हणाला, आम्ही चौथ्या दिवशी एक तास आणि पाचव्या दिवशी एक तास चांगला खेळलो नाही. टॉप ऑर्डरने अजिबात चांगली कामगिरी केली नाही. टॉप ऑर्डरने किमान ३०-४० धावा जास्त करायला हव्या होत्या. या मालिकेत पहिल्यांदाच टॉप ऑर्डर अपयशी ठरली.

दुसऱ्या डावातील त्या धावा…

कर्णधार गिल याने दुसरे वक्तव्य करताना सांगितले की, सामन्यात टीम इंडियाने एकूण ६३ धावा अतिरिक्त म्हणून दिल्या. त्यापैकी ३६ धावा बायच्या होत्या. दुसऱ्या डावात फक्त २५ धावा बायमधून आल्या. भारताचा पराभव २२ धावांमुळे झाला. याउलट इंग्लंडने दोन्ही डावात फक्त ३० अतिरिक्त धावा दिल्या. ज्यामध्ये फक्त ३ धावा बायमधून आल्या. गिल याने यष्टीरक्षकाचा उल्लेख न करता सांगितले, आम्ही क्षेत्ररक्षणात सुधारणा केली आहे, तरीही काही अनावश्यक चुकाही केल्या. आम्ही काही चौकार थांबवू शकलो असतो. तरीही लक्ष्य साध्य करण्यासारखे होते.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...