Team India T20i Captain : सूर्याच्या जागी श्रेयस अय्यर हाच कर्णधारपदासाठी प्रबळ दावेदार का? जाणून घ्या 3 कारणं

India vs Afghanistan : श्रेयस अय्यर हा टी 20i टीम इंडियाचा कॅप्टन होणार असल्याची चर्चा क्रीडा वर्तुळात पाहायला मिळत आहे. मात्र इतर खेळाडू असताना श्रेयसच कसा कर्णधारपदासाठी सरस ठरत आहे? जाणून घ्या.

Team India T20i Captain : सूर्याच्या जागी श्रेयस अय्यर हाच कर्णधारपदासाठी प्रबळ दावेदार का? जाणून घ्या 3 कारणं
Team India Shreyas Iyer
Image Credit source: PTI
| Updated on: Jun 05, 2026 | 1:54 AM

टीम इंडियात बदलाचे वारे पाहायला मिळत आहेत. बीसीसीआय निवड समिती टी 20i टीम इंडियाचा कर्णधार बदलण्याच्या तयारीत आहे. बीसीसीआय सूर्यकुमार यादव याच्या जागी श्रेयस अय्यर याला भारताच्या टी 20i संघांच्या नेतृत्वाची जबाबदारी देणार असल्याचं म्हटलं जात आहे. तसेच तिलक वर्मा हा देखील कर्णधारपदाच्या शर्यतीत आहे. मात्र श्रेयस हा टी 20i संघाच्या कर्णधारपदासाठी तगडा दावेदार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआय येत्या काही दिवसांत श्रेयसच्या नावाची घोषणा करु शकते. मात्र श्रेयस तगडा दावेदार असण्याचं कारण काय? हे सविस्तर जाणून घेऊयात.

शांत आणि संयमी नेतृत्व

श्रेयस अय्यर याचा स्वभाव हा त्याला नेतृत्व मिळवून देण्यासाठी निर्णायक ठरणारा आहे. श्रेयस ऑन फिल्ड कायम शांत आणि संयमी असतो. श्रेयस नेतृत्व करताना कधीच आक्रमक किंवा आपल्या खेळाडूंवर संतापत नाही. तसेच श्रेयस बॅटिंग करताना खास कामगिरी केल्यांनतर आक्रमकपणे जल्लोष करत नाही.

श्रेयसची 19 व्या मोसमातील कामगिरी

श्रेयसने नुकत्याच झालेल्या आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात फलंदाज म्हणून जबरदस्त कामगिरी केली. श्रेयसने या हंगामातील 14 सामन्यांमध्ये 55.33 च्या सरासरीने आणि 168.81 च्या स्ट्राईक रेटने एकूण 498 धावा केल्या. श्रेयसने या दरम्यान 1 शतकासह 5 अर्धशतकंही झळकावली आहेत.

कर्णधार म्हणून श्रेयस यशस्वी

श्रेयस अय्यर याने कोलकाता नाईट रायडर्सला त्याच्या नेतृत्वात आयपीएल 2024 साली विजयी केलं होतं. त्यानंतर श्रेयसच्या नेतृत्वात 2025 साली पंजाब किंग्स उपविजेता राहिली होती. श्रेयसने आयपीएल स्पर्धेत एकूण 93 सामन्यांत नेतृत्व केलं आहे. श्रेयसने त्यापैकी 55 सामन्यांमध्ये संघाला विजयी केलं आहे.

श्रेयसची टी 20i कारकीर्द

श्रेयस अय्यर टीम इंडियाकडून आतापर्यंत एकूण 51 टी 20i सामने खेळला आहे. श्रेयसने या दरम्यान 47 डावांमध्ये 811 चेंडूंचा सामना करुन 1 हजार 1104 धावा केल्या आहेत. श्रेयसने या दरम्यान 8 अर्धशतकं झळकावली आहेत.

तिलक वर्मा उपकर्णधार

दरम्यान कर्णधारासह भारतीय टी 20i संघाचा उपकर्णधारही बदलला जाणार असल्याचं म्हटलं जात आहे. बीसीसीआय मिडल ऑर्डरमधील प्रमुख आणि युवा फलंदाज तिलक वर्मा याला उपकर्णधार करणार असल्याची चर्चा आहे. आता बीसीसीआय केव्हा अधिकृत घोषणा करते हे याची प्रतिक्षा क्रिकेट चाहत्यांना आहे.

Follow Us