AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाचव्या आणि निर्णायक कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराह खेळणार की नाही? शुबमन गिल म्हणाला…

भारत आणि इंग्लंड कसोटी मालिकेतील चार सामन्यांचा खेळ संपला आहे. मालिकेत 2-1 अशी इंग्लंडने आघाडी घेतली आहे. त्यामुळे पाचव्या सामन्याचं महत्त्व वाढलं आहे. कारण दोन्ही संघांकडे संधी आहे.

पाचव्या आणि निर्णायक कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराह खेळणार की नाही? शुबमन गिल म्हणाला...
पाचव्या आणि निर्णायक कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराह खेळणार की नाही? शुबमन गिल म्हणाला...Image Credit source: BCCI
| Updated on: Jul 27, 2025 | 11:01 PM
Share

अँडरसन तेंडुलकर कसोटी मालिकेतील चार सामन्यांचा खेळ संपल्यानंतर रंगत वाढली आहे. कारण मालिका विजयाचं गणित अजून काही सुटलं नाही. चार सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडने 2-1 ने आघाडी आहे. त्यामुळे पाचव्या सामन्याचं महत्त्व वाढलं आहे. इंग्लंडकडे मालिका विजयाचं तर भारताकडे मालिका ड्रॉ करण्याची संधी आहे. इंग्लंडने पाचवा आणि शेवटचा सामना जिंकला किंवा ड्रॉ केला तर मालिका खिशात घालेल. तर भारताने हा सामना जिंकला तर मालिका बरोबरीत सुटेल. त्यामुळे हा सामना दोन्ही संघांसाठी तितकाच महत्त्वाचा आहे. खरं तर चौथ्या कसोटी सामन्यात भारताची स्थिती नाजूक होती. हा सामना भारत गमवेल असंच वाटत होतं. पण भारताने चौथ्या आणि पाचव्या दिवशी कडवी झुंज दिली आणि सामना फिरवला. इंग्लंडच्या तोंडातून विजयाचा घास खेचून आणला आणि सामना ड्रॉ केला. यामुळे इंग्लंडचं मालिका विजयाचं स्वप्न लांबलं आणि भारताला आणखी एक संधी मिळाली आहे. त्यामुळे पाचवा कसोटी सामना सामना हा खूपच महत्त्वाचा आहे. अशा स्थितीत स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह खेळणार की नाही असा प्रश्न आहे. यावर कर्णधार शुबमन गिलने आपलं मत मांडलं.

समालोचकाने जसप्रीत बुमराह पाचव्या कसोटी सामन्यात खेळणार की नाही असा प्रश्न विचारला. त्यावर शुबमन गिलने सांगितलं की, ‘आताच काही सांगू शकत नाही. तुम्हाला ओव्हल कसोटी सामन्यापर्यंत थांबावं लागेल.’ त्यामुळे जसप्रीत बुमराहबाबतचा सस्पेन्स वाढला आहे. कारण मालिका सुरु होण्यापूर्वी बुमराह फक्त तीन कसोटी सामने खेळणार हे स्पष्ट झालं होतं. त्यानुसार, जसप्रीत बुमराह पहिल्या कसोटीत खेळला. दुसऱ्या कसोटीत त्याला आराम दिला गेला. तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीत खेळला. त्यामुळे त्याच्या वर्कलोड मॅनेजमेंटप्रमाणे तो तीन सामने खेळला आहे. मात्र मालिकेची स्थिती आणि गरज पाहून पाचव्या कसोटी सामन्यात खेळू शकतो. आता यासाठी ओव्हल कसोटी सामन्याच्या नाणेफेकीपर्यंत वाट पाहावी लागेल.

शुबमन गिल कसोटी कर्णधार झाल्यापासून एकही नाणेफेक जिंकलेला नाही. आतापर्यंतच्या चारही कसोटी सामन्यात नाणेफेक गमावली आहे. त्यामुळे त्याला नाणेफेकीबाबतही प्रश्न विचारला गेला. तेव्हा शुबमन गिलने सांगितलं की, आम्ही जोपर्यंत सामना जिंकतो आहोत तिथपर्यंत मला खरंच नाणेफेकीबाबत काहीच चिंता नाही. त्याने नाणेफेकीला फार काही महत्त्व दिलं नाही. दरम्यान, चौथ्या कसोटीचा निकाल पाहता पाचव्या कसोटीत फार काही बदल होईल असं वाटत नाही. कुलदीप यादवला संधी मिळेल की नाही हे देखील गुलदस्त्यात आहे.

Follow Us
तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका...
US India War Practice : तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका संयुक्त युद्धाभ्यासात भारतीय लष्कराची दमदार कामगिरी
विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर बन यांचं...
Navnath Ban : विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर, पुढे म्हणाले...
गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
Chhagan Bhujbal : गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
Kalachowki : गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
Mumbai Cha Raja : हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
Sanjay Raut | मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न घाणेरडा; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, पुढे म्हणाले...
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...
महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
Sanjay Raut | महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... संजय राऊतांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल