AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“ज्या खेळाडूंना भूक आहे त्यांनाच खेळवणार…”, कर्णधार रोहित शर्माचा रोख कोणाकडे?

इंग्लंडविरुद्धची पाच सामन्यांची कसोटी मालिका भारताने 3-1 खिशात घातली आहे. पाचवा सामना आता औपचारिक असेल. पण वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने विजय महत्त्वाचा आहे. चौथ्या सामन्यानंतर कर्णधार रोहित शर्मा याने पत्रकार परिषद घेतली आणि अप्रत्यक्षरित्या काही खेळाडूंना सुनावले.

ज्या खेळाडूंना भूक आहे त्यांनाच खेळवणार..., कर्णधार रोहित शर्माचा रोख कोणाकडे?
| Updated on: Feb 26, 2024 | 6:32 PM
Share

मुंबई : इंग्लंड विरुद्धची पाच सामन्यांची कसोटी मालिका खिशात घातल्यानंतर कर्णधार रोहित शर्माने आपलं परखड मत मांडलं आहे. भारताने इंग्लंडला चौथ्या कसोटी सामन्यात पाच गडी राखून पराभूत केलं. तसेच पाच सामन्यांची कसोटी मालिका 3-1 ने खिशात घातली. यासह टीम इंडियाने भारतात सलग 17 वी कसोटी मालिका जिंकली आहे. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत युवा खेळाडूंचं योगदान मोलाचं ठरलं. सरफराज खान, ध्रुव जुरेल, य़सस्वी जयस्वाल आणि आकाशदीप या खेळाडूंनी आपली छाप पाडली. रोहित शर्माने या तरुण खेळाडूंचं कौतुक केलं. त्यांच्यात जिंकण्याची क्षमता असल्याचंही अधोरेखित केलं. तसेच टीम इंडियात पुनरागमनासाठी डोळे लावून बसलेल्या खेळाडूंवर रोहित शर्माने अप्रत्यक्षरित्या टीका केली. विजयाची भूक असलेल्या आणि मेहनती खेळाडूंनाच संधी मिळेल.

“ज्या लोकांना भूक आहे आम्ही त्याच लोकांना संधी देणार.”, असं कर्णधार रोहित शर्मा याने सांगितलं. “जर भूकच नसेल तर त्यांना खेळवून काहीच उपयोग नाही. मला या संघात भूक नसलेल्या एकही खेळाडू पाहायचा नाही. मग तो संघात असो की संघात खेळत नसू दे. कसोटी क्रिकेटमध्ये तुम्हाला खूप कमी संधी मिळतात. जर तुम्ही सिद्ध केलं नाही तर बाहेर फेकले जाल.”, असं कर्णधार रोहित शर्मा म्हणाला.

कर्णधार रोहित शर्मा याने खऱ्या अर्थाने बीसीसीआयची री ओढली. काही खेळाडू रणजी ट्रॉफीकडे कानाडोळा करत आहेत. तसेच आयपीएलला महत्त्व देत असल्याचं दिसलं आहे. 25 वर्षीय इशान किशनने रणजीकडे पाठ फिरवली आहे. तसेच बरोड्यात ट्रेनिंग घेत आहे. तर मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या पुढच्या महिन्यात आयपीएल खेळताना दिसणार आहे. यावरून रोहित शर्माला एक प्रश्न विचारण्यात आला. पैशांच्या हव्यासापोटी युवा खेळाडूंमध्ये कसोटी न खेळण्याची स्थिती दिसते.

“टेस्ट क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थाने खेळाडूची कसोटी लागते. जर तुम्हाला या फॉरमॅटमध्ये यश मिळवायचं असेल तर तुमच्या विजयाची भूक असायला हवी. हे लगेच कळतं की कोणाला भूक नाही आणि कोणाला येथे राहायचं नाही. ज्यांना भूक आहे. कठीण प्रसंगात खेळायचं त्यांना संधी मिळेल. हे अगदी सोपं आहे. आयपीएल चांगलं आहे यात शंका नाही. पण कसोटी एक कठीण फॉरमॅट आहे. मागचे तीन विजय सहज मिळाले नाहीत. दीर्घ गोलंदाजी आणि बॅट्समनला घाम गाळावा लागला आहे. हे खरंच कठीण आहे.”, असंही रोहित शर्मा म्हणाला.

Follow Us
युद्धाचा मोठा फटका गॅस सिलेंडरसाठी नागरिकांची गर्दी विविध शहरांमध्ये..
युद्धाचा मोठा फटका गॅस सिलेंडरसाठी नागरिकांची गर्दी विविध शहरांमध्ये...
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सिंहस्थ कुंभमेळा समितीची बैठक
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सिंहस्थ कुंभमेळा समितीची बैठक.
पिंपरी-चिंचवडमध्ये गॅस टंचाईचा फटका; केटरिंग व्यवसाय अडचणीत
पिंपरी-चिंचवडमध्ये गॅस टंचाईचा फटका; केटरिंग व्यवसाय अडचणीत.
गॅस तुटवड्यावर पेट्रोलियम मंत्रालयाची पत्रकार परिषद
गॅस तुटवड्यावर पेट्रोलियम मंत्रालयाची पत्रकार परिषद.
नागपुरात गॅस सिलेंडरसाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा
नागपुरात गॅस सिलेंडरसाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा.
बीडमध्ये घरगुती गॅस वापरणाऱ्या हॉटेल्सवर छापेमारी; 28 सिलेंडर जप्त
बीडमध्ये घरगुती गॅस वापरणाऱ्या हॉटेल्सवर छापेमारी; 28 सिलेंडर जप्त.
हिंगोलीत गॅस तुटवडा; व्यावसायिक सिलेंडर बंद, स्वीटमार्ट परिणाम
हिंगोलीत गॅस तुटवडा; व्यावसायिक सिलेंडर बंद, स्वीटमार्ट परिणाम.
रमजान महिना सुरु; मुंबईचा मोहम्मद अली रोड खवय्यांनी गजबजला
रमजान महिना सुरु; मुंबईचा मोहम्मद अली रोड खवय्यांनी गजबजला.
भरत जाधव, पुष्कर श्रोत्री आणि केदार शिंदेंसह अनेक कलाकार बनले मनसेचे..
भरत जाधव, पुष्कर श्रोत्री आणि केदार शिंदेंसह अनेक कलाकार बनले मनसेचे...
इराण-अमेरिका-इस्त्रायल युद्धाचा डोंबिवली MIDC उद्योगांना मोठा फटका
इराण-अमेरिका-इस्त्रायल युद्धाचा डोंबिवली MIDC उद्योगांना मोठा फटका.